Saturday 25 February 2012

परिवर्तनवादी युवक संमेलनाचे आग्रहपूर्वक निमंत्रण


माझ्या प्रिय मित्रांनो,

आज बर्‍यात कालावधीनंतर आपल्याशी संवाद साधत आहे. अनेक कामांमध्ये व्यग‘ होतो. आज सर्व मित्रांना अत्यंत आग‘हाचे निमंत्रण देत आहे. रविवार दिनांक २६ फेब्रुवारी २०१२ रोजी, सकाळी १० ते सायं. ०५ या वेळात परिवर्तनवादी युवक संमेलन आयोजित केले आहे. स्थळः महाराष्ट्र गांधी स्मारक निधी, गांधीभवन परिसर, कोथरूड, पुणे.

माझे आपणा सर्वांना आवाहन आहे की, आपण मोठ्या सं‘येने या कार्यक‘मास उपस्थित रहावे. यामागील माझी भुमिका येथे देत आहे.
गेल्या काही वर्षांपासून राजकीय क्षेत्रात रोज घसरण चालू आहे. भ‘ष्टाचारी व गुंड माणसांनी राजकीय पक्षांचा ताबा घेतला आहे. राजकीय नेत्यांचा हा भ‘म आहे की ते गुंडांना मुठीत ठेवत आहेत. वास्तविक परिस्थिती उलटी आहे. ते त्यांना आज ना उद्या कळून येईल पण तो पर्यंत वेळ गेलेली असेल. यावर उपाय एकच आहे, तो म्हणजे समाजातील सत्याग‘ही शक्तीचे जोमाने संघटन करणे आणि तरूणांच्या उर्जेला योग्य दिशेने वळन लावणे. काही महिन्यांपासून अण्णा हजारे यांचा बोलबाला वाढला त्यामुळे समाज बदलतोय असा आभासही झाला. तरूण रस्त्यावर आले. पण ऐवढे मोठे आंदोलन कालांतराने भुसभुसीत ठरले. त्यामुळे जनतेमध्ये घोर निराशा पसरली. हे होणारच होते असे मी अनेक प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगत होतो. युक्रांदने बरीच सत्याग‘ही आंदोलने केली. त्यापैकी प्रत्येक आंदोलनात यश मिळाले. त्यावरून युक्रांद या संघटनेजवळ सत्याग‘ही जनआंदोलनाचे संचित किती असेल याचा आपण अंदाज घेवू शकता. मला स्वतः ला सत्याग‘ही आंदोलनात ३८ वेळा अटक झाली. कधी १ दिवसाचा तर दीड दोन वर्षाचा कारावास भोगावा लागला. कधी ना कधी, कोणत्या तरी सत्याग‘हात अटक झालेले सुमारे एक लाख युक‘ांदिय महाराष्ट्रात आहेत. म्हणून माझी अशी धारणा आहे की, समाज व्यवस्थेत परिवर्तन करण्यासाठी तरूणांची उर्जा गोळा करावी आणि तिला सत्याग‘ही जनआंदोलनाची माहिती द्यावी. गेल्या ४८ वर्षाच्या सार्वजनिक जीवनात ज्याला राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या विचारांचा स्पर्श झाला नाही असा माणूस राजकीयदृष्टया बरोबर असू शकत नाही असा अनुभव आला आहे. मग गांधींना तरूणांकडे का नेऊ नये असा मला प्रश्‍न पडला.
महाराष्ट्र गांधी स्मारक निधी या संस्थेचा मी गेल्या पाच वर्षांपासून अध्यक्ष आहे. ही महाराष्ट्रातील गांधीवाद्यांची थोरली संस्था आहे. त्यामुळे प्रयोग करून त्यातून निष्कर्ष काढून समस्त गांधीवाद्यांचे त्यावर एकमत घडवून आणणे ही माझ्यावर नैतीक जबाबदारी आहे. माझे असे मत झाले आहे की, तरूणांनी खादी घालावी की न घालावी, चहा प्यावा की न प्यावा हे प्रश्‍न अत्यंत गौण असून त्यांनी सत्य, अहिंसा व प्रामाणिकणाची कास धरावी की नाही हा खरा वर्तमानकाळातील ऐरणीवरचा प्रश्‍न आहे. राष्ट्रपित्याने एवढे विचारधन आपल्याला दिले आहे आणि आपल्या आचरणाने आपल्यात बिंबविले आहेत. त्याचा विचार करून प्रचलित परिस्थितीवर उपाय काढता येतो.
लोकनायक हे युक्रांदचे फिलोसोफर व मार्गदर्शक होते. ते नेहमी सांगत की, लोखंड तापविले तरच त्याला नवा आकार देता येतो. देश तापविणे म्हणजे तरूणांना भ‘ष्टाचार आणि अन्यायाविरूध्द संघर्ष करण्यासाठी प्ररित करणे. आताची तरूण पिढी खूपच हुशार आहे. तिला आंतरराष्ट्रीय दृष्टीकोण आहे. तिच्या संवाद संपर्काची साधणे प्रचंड सं‘येने आहेत. पण त्यांना पोकळ बुध्दीचे ठेवून आपल्या स्वार्थासाठी त्यांचा वापर करण्याचा धंदाही जोरात चालू आहे. परिवर्तनवादी युवकांचे संमेलन घेतल्याने पुढील गोष्टी सङ्गल होतील अशी अपेक्षा व आशा आहे.
०१. गडचिरोली ते कोल्हापूर, विदर्भ, मराठरावाडा, पश्‍चिम महाराष्ट्र व कोकण या विभागातील तरूणांचा एकमेकांशी संपर्क आला व त्यांचा संवाद सुरू झाला तर त्यांचे आत्मबल वाढेल.
०२. या प्रयत्नातून एक लाख सत्यवादी व अहिंसावादी तरूणांची डिरेक्टरी तयार करावयाची आहे. त्याचा उपयोग महाराष्ट्रातील सर्व प्रामाणिक नागरिकांना करता येईल. त्यामुळे महाराष्ट्रावर पसरलेले निराशेचे सावट दूर होईल.
०३. राष्ट्रपित्याच्या महानतेचे मर्म आकलन करण्याची तरूणांची शक्ती वाढेल.

तरी माझे आपणास कळकळीचे आवाहन आहे की, आपण रविवार दिनांक २६ फेब्रुवारी 2012 रोजी गांधीभवन, कोथरूड येथे आयोजित केलेल्या परिवर्तनवादी युवक संमेलनास अवश्य उपस्थित रहावे. आपली उपस्थिती हेच आमचे आत्मबळ!

आपला,

डॉ. कुमार सप्तर्षी
 

No comments:

Post a Comment