Wednesday 14 December 2011

वैचारिक स्पष्टतेने जुळले धागे




(15-12-2011 : 21:42:18)

दैनिक लोकमत, (सखी पुरवणी) 

जीवनाच्या संध्याकाळी हसत-खेळत एकमेकांशी चर्चा करत, गप्पा मारत आपलं आयुष्य काढावं, एवढीच माफक अपेक्षा ठेवून आम्ही एकमेकांचे जोडीदार व्हायचं ठरवलं. ‘युक्रांद’चे संस्थापक कुमार सप्तर्षी आणि त्यांच्या पत्नी ऊर्मिलाताई सांगताहेत त्यांच्या सहजीवनाच्या प्रवासाविषयी..


‘वैचारिक स्पष्टता असेल, तर नातं अलवार फुलत जातं. जीवनाच्या संध्याकाळी एकमेकांशी चर्चा करत, गप्पा मारत, हसत-खेळत आपलं आयुष्य काढावं, एवढीच माफक अपेक्षा ठेवून आम्ही एकमेकांचे जोडीदार व्हायचं ठरवलं. तेही असंच एके दिवशी गप्पा मारताना. त्या वेळी एका संघटनेत आम्ही एकत्र काम करत होतो. आम्ही दोघंही ‘युक्रांद’चे संस्थापक.


‘लग्न करायचंच आहे, मग ते अनोळखी, कधीही न पाहिलेल्या व्यक्तीबरोबर कसं करणार? तुझ्याशी केलं, तर चालेल मला. बोल, तुला काय वाटतं?’ म्हणत कुमारजींना प्रश्न विचारणार्‍या ऊर्मिलाताई ‘..माझं आयुष्य म्हणजे वादळाशी झुंज आहे. विचार कर,’ असं सांगणार्‍या कुमारजींविषयी बोलत स्वत:च्या संसाराचा पट उलगडत होत्या.


त्या सांगतात, की स्वत:च्या आयुष्याची दिशा स्पष्ट असणारे कुमारजी ‘हो’ म्हणाले तो दिवस होता- २0 मार्च १९६५. प्रत्यक्ष लग्नाची तारीख वेगळी असूनही आम्ही आजही याच दिवशी लग्नाचा वाढदिवस साजरा करतो. हे सांगताना ऊर्मिलाताई मागे मागे थेट ४0-४५ वर्षांपूर्वीच्या त्या दिवसांत जाऊन पोहोचल्या.


तो काळ होता १९६४-६५ चा. ऊर्मिलाताईंच्या घरात गांधीवादी विचारांचा प्रभाव. आई-वडील दोघेही स्वातंत्र्यसैनिक. त्यामुळे घरातील वातावरण चळवळ, विधायक काम करण्यास अनुकूल. ऊर्मिलाताई सांगतात, ‘‘मुलगी म्हणून तुला हे करता येणार नाही, असं माझ्या घरात कधी झालं नाही. मी फग्यरुसन महाविद्यालयात शिकत होते त्याचबरोबर समाजासाठी काही विधायक काम करण्यासाठीच्या ग्रुपमध्येही हिरिरीने भाग घेत होते. ‘मनोहर’ मासिकाने आयोजित केलेल्या एका सर्वेक्षणानंतर पुण्यातील महाविद्यालयांतून ४0-५0 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. त्यांना एकत्र आणून विविध विषयांवर वाद-विवाद, चर्चा यांतून सामाजिक काम करणारी एक टीम उभी राहावी अशी कल्पना. यात ऊर्मिलाताई सहभागी झाल्या होत्या आणि येथेच त्यांची कुमार सप्तर्षी या तरुणाशी ओळख झाली. 


त्या सांगतात, ‘‘त्या वेळी व्यवसायाने डॉक्टर होणारा, जातपात न मानणारा, विविध चळवळी आणि विधायक काम करायचं म्हणजे नक्की काय करायचं, याबाबत वैचारिक स्पष्टता असणारा हा तरुण मला जीवनसाथी म्हणून योग्य वाटला. खेडेगावात जाऊन दवाखाने, रस्ते, आरोग्य, शेतीचे प्रश्न आदि कामांत आम्ही सहभागी होऊ लागलो. त्यापैकी चार ते पाच जणांचा ग्रुप बनला.’’ सारे ऊर्मिलाताईंच्या घरी जमत. चर्चा होत. ऊर्मिलाताई सांगतात, ‘‘आपल्या वाक्चातुर्याने सर्वांची मने जिंकणार्‍या कुमारने आमच्या घरातल्यांचे विशेषत: माझ्या आईचे मन कधीच जिंकले होते; पण आंतरजातीय विवाह असल्याने कुमारजींच्या घरून लग्नाला विरोध झाला. त्या वेळी गाजावाजा व कोणतीही उधळपट्टी न करता म्हणजे १0 मे १९६९ मध्ये आम्ही रजिस्टर पद्धतीने लग्न केले. घरी गेलो, आशीर्वाद घेतला. सुखी राहा म्हणत घरच्यांनी निरोप दिला. लग्न केले त्याच रात्री घराचा प्रश्न निर्माण झाला. त्या रात्री मित्राकडे राहिलो. एकमेकांना पूर्णपणे वैचारिक आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य देत छोटेखानी जागेत आमचा स्वतंत्र संसार सुरू झाला.’’ 


कुमारजी सांगतात, लग्नाचा निर्णय घेण्यापूर्वी आम्ही एस. एम. जोशी यांना कल्पना दिली होती. त्यांनी सांगितले, की तू डॉक्टर आहेस. स्वत:च्या पैशातून तुम्हा दोघांना पुरेसे होईल असे घर घे. नंतर खुशाल समाजकार्यासाठी स्वत:ला वाहून घे. सुरुवातीला भाड्याच्या जागेत एकाच ठिकाणी पार्टिशन करून घर आणि दवाखाना सुरू केला. प्रॅक्टिस जोरात सुरू होती; पण मन समाज आणि विधायक कामांकडे धाव घेत होते. जे गरजेचं नाही ते घ्यायचं नाही, याबाबत आम्हा दोघांमध्ये एकमत होतं. अखेरीस त्याकाळी ४0 हजार रुपये किमतीचं स्वत:चं घर घेतलं. ते ऊर्मिलाच्या नावे केलं. त्यानंतर मी समाजकार्यासाठी पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून वाहून घेतलं. ‘उंबर्‍याच्या बाहेरचा पैसा घरात आणायचा नाही आणि घरातील पैसा बाहेर न्यायचा नाही,’ या विचाराशी पक्के राहून काम केले. 


मी एम.एस्सी., एल.एल.बी., पीएच.डी.(टिश्यू कल्चर) आहे. तेव्हा मी नोकरी करत होते. ‘रांधा, वाढा, उष्टी काढा’ यापुरती मी कधीच र्मयादित राहिले नाही. कुमारजींनीही, ‘तुला ठरवायचंय मूल कधी होऊ द्यायचंय ते ठरवं असं सांगून मला मातृत्वाचं स्वातंत्र्य दिलं. लग्नानंतर दहा वर्षांनी मी आई होण्याचा निर्णय घेतला. मुलाला वाढवतानाही आम्ही निकोप दृष्टिकोन ठेवला. त्याला त्याच्या वयाच्या १८व्या वर्षी जात-धर्म स्वीकारण्याचं स्वातंत्र्य दिलं. 


युथ ऑर्गनायझेशन, ‘युक्रांद’ची स्थापना, त्यानंतर आमदार, सत्याग्रही मासिकाचा संपादक, ग्रामीण भागातील शिक्षण संस्थेचा प्रमुख, वक्ता, लेखक अशा विविध टप्प्यांवर प्रवास सुरू होता. या काळात अनेक वेळा संघर्षमय परिस्थिती निर्माण झाली. घरावर हल्लेही झाले; पण नेहमीच एकमेकांचा आदर जपल्याने आणि वैचारिक बैठक पक्की असल्याने सहजीवनाचा प्रवास आनंदमय झाला आहे. - उर्मिलाताई सांगतात.


- पल्लवी धामणे-रेखी

Saturday 10 December 2011

भारत महान देश आहे!


संसदीय लोकशाहीची वैशिष्ठे समजून घेणे प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे. लोकशाही प्रणालीत दुसर्याला वैरी मानणे, दुसर्याचा सन्मान ना कबूल करणे, धमक्या, शिवीगाळ, आक्रमक भाषा या गोष्टी वर्ज असतात. मानवी विकासाचा वा मानवाच्या संस्कृतीच्या उत्क्रांतीमध्ये सर्वाधिक उत्क्रांत झालेली राजकीय प्रणाली म्हणजे लोकशाही! भविष्यात लोकशाही पेक्षाही अधिक सुसंस्कृत व उन्नत राजकीय प्रणाली उदयाला येवू शकेल पण आज मात्र लोकशाही हीच केवळ उन्नत प्रणाली आहे. लोकशाही व्यवस्था कितीही बिघडली तरी तिला उपचार म्हणून लोकशाहीचाच अधिक डोस द्यावा लागतो. उदा. पं. इंदिरा गांधी यांनी देशातली लोकशाही रद्दबातल केली होती, परंतु ५ लाख लोकांनी सत्याग्रह करून कारावास भोगला, क्लेश सहन करून जनतेला लोकशाहीचे महत्व पटवून दिले त्यामुळे १९७७ साली लोकशाहीची पुन्हा स्थापना झाली. हुकुमशाहीच्या प्रणालीत असे घडत नाही. हुकुमशाही घालविण्यासाठी रक्तपात करणे अपरिहार्य असते. हुकुमशाहीचा अंत हुमुंशाहाचा अंत झाला तरच होतो. लोकशाहीची गम्मत हि आहे कि, इंदिरा गांधीच्या विरोधकांनी तिच्यावर हिंसक हल्ला केला नाही आणि इंदिरा गांधींनी देखील सत्ता सोडताना हिंसाचाराचा मार्ग अवलंबला नाही. विरोधकांना गोळ्या घातल्या नाहीत. हि लोकशाहीच्या सभ्यतेची कीर्ती आहे. जगातल्या प्रत्येक हुकुमाशाहाचा मृत्यू झाल्यानंतरच हुकुमशाहीचा अंत झाला आहे.

जो कोणी अन्य लोकांचा सन्मान मनोमनी कबूल करतो, तोच लोकशाही मध्ये सन्मानास पात्र होतो. आण्णा हजारे अन्य कोणाचाच सन्मान काबुल करीत नाहीत. प्रत्येक विरोधकाला वैरी मानतात, स्वतःच्या काम्पुमधील गुंड व भ्रष्ट प्रवृत्तीच्या लोकांवर पांघरून घालतात. मी त्यांचा मान ठेवून त्यांनी या दोषातून मुक्त व्यावे अशी त्यांना विनंती करतो. त्यांनी आक्रोश करून देशामध्ये वैरात्वाचे वातावरण वाढवू नये. त्यांना भ्रष्टाचाराचे निर्मुलन करायचे आहे कि कोणाच्या वतीने कोणाला गारद करायचे आहे कि काय अशी शंका येते. अण्णा हजारे यांचा मी मन: पूर्वक सन्मान करतो; पण  त्यांच्या चुका दाखविण्यात मी कचरलो तर तो माझा दोष असेल असे मला वाटते. लोकशाही मध्ये सर्वांना अभय वाटले पाहिजे. 

लोकपाल बिल लोकसभेत येणारच नाही असा आक्रोश चालू होता. पण ते बिल संसदेमध्ये मांडण्यात आले आहे. आता भाजप सारख्या विरोधी पक्षाने आपल्या बौद्धिक कौशल्याने सभागृहाला पटवून त्या कायद्याला आकार द्यायचा आहे. पण ते जबाबदारीपासून पलायन करीत आहेत. संसदेवर रोज बहिष्कार टाकल्याने भाजप लोकप्रिय होत आहे असे मानण्याचे कारण नाही. 

जुन्या जमान्यात 'सिकंदर दि ग्रेट' असा एक विक्प्रचार होता. सध्या 'अण्णा दि ग्रेट' असा वाक्प्रचार रुजू लागला आहे. अण्णांच्या मागे भाजप जय्यत तयारीनिशी उभा आहे. व्यापारी वर्गांच्या हातातला अण्णा हा 'थ्रो बॉल' आहे. त्यासाठी व्यापारी वर्ग कितीही पैसा खर्च करायला तयार आहे. फक्त त्यांना भेसळ, मापात गडबड, शेतकऱ्यांचे दलालांमार्फत शोषण आणि ग्राहकांची फसवणूक या बाबतीत अण्णांनी वरदान दिले पाहिजे. अण्णांनी म. गांधीना सोडले आणि शिवाजी महाराजांना पकडले तर ते मराठ्यांपेक्षा ब्राह्मणांमध्ये अधिक प्रिय होतील. कारण ते आपली लढाई शिवाजी महाराजांच्या आडूनच करीत असतात. शिवाजी महाराज आणि म. गांधी आपापल्या काळातले महापुरुष आहेत. अण्णांच्या बोलण्यामुळे संभ्रम निर्माण होत आहे. म. गांधी आणि शिवाजी महाराज एकाच काळाची अपत्ये आहेत असे वाटू लागते. काळाचे संधर्भ महत्वाचे असतात. रा, स्व. संघाचे लोक म्हणतात कि "शिवाजी महाराज विचार - विनिमय अश्या भानगडीत पडत नसत. ते सरळ शाहिस्तेखानची बोटे कापत आणि अफजल खानाचा कोथळा बाहेर काढत." संघाला भूतकाळ वर्तमान काळावर लादायचा आहे. नथुराम गोडसेचा हिंसाचार आणि नरेंद्र मोदीचा नरसंहार याचे समर्थन करायचे आहे. अण्णा शिवाजीचे अवतार आहेत हा भ्रम पसरविल्या नंतर मराठा समाज हिंदुत्ववादी होण्याची शक्यता वाढते. आणि मराठा समाज हिंदुत्ववादी होणे म्हणजे ब्राह्मणांचे वर्चस्व मान्य करणे आहे. म्हणूनच अण्णा ब्राह्मण प्रिय होत आहेत आणि ते गो ब्राह्मण प्रतिपालक आहेत असा गोड गैरसमज ब्राह्मणांनी करून घेतला आहे. पण आता शिवाजी महाराजांवर संसदीय लोकशाही आणि म. गांधीचे विचार याचा परिणाम होवून त्यांनी त्या काळात तसे वर्तन केले असते असा विचार हे बालबुद्धीचे लक्षण आहे. याचा अर्थ शिवाजी महाराजांनी संसदेमध्ये शाहिस्तेखान व अफजल खान यांच्या विरोधात अगदी जन लोकपाल बिलाच्या शैलीत कायदा संमत केला असे म्हनाण्याचेही लोक धाडस करतील. त्याचप्रमाणे म. गांधी तालावर घेवून, घोड्यावर बसून ब्रिटीश राज्यकर्ते अंधारात, गाढ निद्रेत असतात गांधी सपासप वार करीत आहेत. आणि ब्रिटीश जागे होण्याच्या आधी निघून जात आहेत असेही संघवाले उद्या सांगू शकतील. त्यांच्या व अण्णांच्या दुर्दैवाने अनंत लोक बाल बुद्धीचे नाहीत म्हणूनच म्हणायचे आहे कि, भारत महान देश आहे! 

Tuesday 29 November 2011

व्यापारी विरुद्ध भारत देश :


व्यापारी मनोवृत्ती शेकडो वर्षात तयार झालेली आहे. मनुस्मृतीने चातुर्वर्ण्य सांगितल्यामुळे व्यापार्यांच्या देशभरच्या नेट्वर्किंग ला पारंपारिक वर्णीय आणि वर्गीय मनोवृत्तीचा पाया आहे. चातुर्वर्ण्य व्यवस्थेत व्यापार्यांनी जनतेबरोबर समाजात कसे वागायचे या विषयी जन्म - बारसे, मरणोत्तर विधी या सर्व गोष्टींचे संहितीकरण केले आहे. उदा. वैश्याच्या घरी मुल जन्माला आले तर बाराव्या दिवशी त्याचे बारसे करताना त्याचे नाव काय ठेवावे, याविषयी अखिल भारतीय नियम तयार केलेले आहेत. या नियमांचे शेकडो वर्षांपासून चालू आहे. उदा. बारसे करताना वैश्य मुलाचे नाव हिरे, माणिक, रूपे, लक्ष्मी, संपत्ती या गोष्टींशी संबंधित असावे. म्हणजे त्या मुलाला कुणीही हाक मारली तरी त्याला आपल्या जीवन कार्याची व मिशन चे स्मरण व्हावे हि कल्पना होती. म्हणून आजही हिराचंद , माणिकचंद, लक्ष्मीकांत, रुपचंद, हिरालाल अशी नावे असतात. व्यापारी मुलाला असे वाटते कि, देवाने आपला जन्मच मुली लोकांच्या खिशातील पैसे आपल्या खिशात येतील यासाठी घातलेला आहे. याउलट ज्यांच्या कडून शोशानाद्वारे पैसे कमवायचे असतात त्या शुद्रांची नावे, त्यात काहीतरी न्यून आहे अशी असतात. उदा. केरू, कचरू, दगडू, धोंडू, बारकू, लहानू वगैरे . विशेष म्हणजे गरिबांच्या नावात 'दास' हा शब्द हमखास येतो. दास याचा अर्थ गुलाम असा होतो. व्यक्तीला लोक हाक मारताना दरवेळी त्या व्यक्तीची मानसिक धारणा आपल्या नावानुरूप पक्की होत जाते. 

भारतीय अर्थव्यवस्थेतील एकूण भांडवलापैकी ८० टक्के भांडवल मारवाडी लोकांच्या नियंत्रणात आहे. कोणत्या जाती बद्दल कधीच बोलू नये, पण एक समूह वर्तन नावाची गोष्ट असते. जागतिकी करणानंतर आंतरराष्ट्रीय भांडवलशाहीचा सर्व देशांमध्ये संचार होऊ लागला आहे. त्यामुळे स्थानिक व्यापारी संस्कृती व त्या त्या देशाबाहेरील संस्कृती याचा टकराव चालू आहे. तसाच भारतामध्येही मारवाडी संस्कृती आणि ज्युईश संस्कृती यांचा आपल्या अर्थव्यवस्थेत टकराव चालू आहे. त्याचेच पडसाद भारतीय संसदेत उमटत आहेत. वालमार्ट हि आंतरराष्ट्रीय रिटेल व्यापार करणारी कंपनी आहे. त्यांची शिस्त, प्रशिक्षण, सेवा तत्परता, चोख व्यवहार हि भारतीय व्यापार्यांपेक्षा कितीतरी अधिक चांगली आहे. आपल्या व्यापार्यांना जनतेला लुटायची सवय झाली आहे. सेवा देण्याची बिलकुल इच्च्या नाही, त्यांना फक्त नफा दिसतो. वाल मार्ट कंपनीचा राक्षस भारतात आला कि भारतीय व्यापार्यांना एकतर सुधारावे लागेल किंवा संपावे लागेल. व्यापारी वर्ग राहील, पण त्यांच्या मधील अप्प्रवृत्तींचे समूळ उच्चाटन होईल. व्यापारी वाल मार्ट ला जो विरोध करतात तो स्वार्थामुळे करीत आहेत, त्यामागे देश हिताचा विचार नाही.

भारतीय व्यापारी आमने सामने लढाई करीत नसतात. कोणालातरी पुढे करून ते मागे राहून डावपेच आखत राहतात. केंद्र सरकारने परदेशी कंपन्यांना रिटेल व्यापार खुला केल्यामुळे आपले व्यापारी खवळले आहेत. आता ते नक्कीच पुन्हा आण्णाला उपोषणाला बसवतील. अण्णा हजारे यांची दोरी सध्या व्यापारी वर्गाच्या हातात आहे. अण्णांच्या उपोषणाला मागच्या उपोशानापेक्षा ते अधिक पैसा पणाला लावतील. अण्णा उपोषणाने दमत नाहीत. आणि स्वार्थासाठी व्यापारी हात आखडता घेणार नाहीत, म्हणून घराघरामध्ये अण्णा आणि त्यांचा उपवास आक्रमण करणार हे नक्की. 

अरविंद केजरीवाल हे व्यापारी वर्गातर्फे नेमलेले सेनापती आहेत. अर्थात व्यापारी वर्गाचे सेनापती हे दलाल असतात. संसदेला वाकविण्याचा प्रयत्न भाजपला पुढे करून व्यापारी वर्ग करतोय असे दिसते. एक तर भांडवलशाही अर्थव्यवस्थेला कट्टर विरोध करून समाजवादी अर्थव्यवस्था मान्य करावी. एकदा जागतिकीकरणाच्या नावाखाली भांडवलशाही मान्य केल्यानंतर तांत्रिक दृष्ट्या अधिक प्रगत, अधिक सेवातत्पर व कार्यक्षम भांडवलशाही देशी व्यापारी भांडवलशाही पेक्षा  वरचढ असते. दिक्षित, बाबा रामदेव, स्वदेशी जागरण मंच याच मनोवृत्तीचे आहेत. हिंदुत्ववाद नावाचे तत्वज्ञान देखील देशी भांडवलशाही आपत्य आहे, या उलट कार्पोरेट भांडवलशाही शोषक असली तरी जाती धर्म निरपेक्ष असते. 

व्यापारी मनोवृत्ती शेकडो वर्षात तयार झालेली आहे. मनुस्मृतीने चातुर्वर्ण्य सांगितल्यामुळे व्यापार्यांच्या देशभरच्या नेट्वर्किंग ला पारंपारिक वर्णीय आणि वर्गीय मनोवृत्तीचा पाया आहे. चातुर्वर्ण्य व्यवस्थेत व्यापार्यांनी जनतेबरोबर समाजात कसे वागायचे या विषयी जन्म - बारसे, मरणोत्तर विधी या सर्व गोष्टींचे संहितीकरण केले आहे. उदा. वैश्याच्या घरी मुल जन्माला आले तर बाराव्या दिवशी त्याचे बारसे करताना त्याचे नाव काय ठेवावे, याविषयी अखिल भारतीय नियम तयार केलेले आहेत. या नियमांचे शेकडो वर्षांपासून चालू आहे. उदा. बारसे करताना वैश्य मुलाचे नाव हिरे, माणिक, रूपे, लक्ष्मी, संपत्ती या गोष्टींशी संबंधित असावे. म्हणजे त्या मुलाला कुणीही हाक मारली तरी त्याला आपल्या जीवन कार्याची व मिशन चे स्मरण व्हावे हि कल्पना होती. म्हणून आजही हिराचंद , माणिकचंद, लक्ष्मीकांत, रुपचंद, हिरालाल अशी नावे असतात. व्यापारी मुलाला असे वाटते कि, देवाने आपला जन्मच मुली लोकांच्या खिशातील पैसे आपल्या खिशात येतील यासाठी घातलेला आहे. याउलट ज्यांच्या कडून शोशानाद्वारे पैसे कमवायचे असतात त्या शुद्रांची नावे, त्यात काहीतरी न्यून आहे अशी असतात. उदा. केरू, कचरू, दगडू, धोंडू, बारकू, लहानू वगैरे . विशेष म्हणजे गरिबांच्या नावात 'दास' हा शब्द हमखास येतो. दास याचा अर्थ गुलाम असा होतो. व्यक्तीला लोक हाक मारताना दरवेळी त्या व्यक्तीची मानसिक धारणा आपल्या नावानुरूप पक्की होत जाते. 

भारतीय अर्थव्यवस्थेतील एकूण भांडवलापैकी ८० टक्के भांडवल मारवाडी लोकांच्या नियंत्रणात आहे. कोणत्या जाती बद्दल कधीच बोलू नये, पण एक समूह वर्तन नावाची गोष्ट असते. जागतिकी करणानंतर आंतरराष्ट्रीय भांडवलशाहीचा सर्व देशांमध्ये संचार होऊ लागला आहे. त्यामुळे स्थानिक व्यापारी संस्कृती व त्या त्या देशाबाहेरील संस्कृती याचा टकराव चालू आहे. तसाच भारतामध्येही मारवाडी संस्कृती आणि ज्युईश संस्कृती यांचा आपल्या अर्थव्यवस्थेत टकराव चालू आहे. त्याचेच पडसाद भारतीय संसदेत उमटत आहेत. वालमार्ट हि आंतरराष्ट्रीय रिटेल व्यापार करणारी कंपनी आहे. त्यांची शिस्त, प्रशिक्षण, सेवा तत्परता, चोख व्यवहार हि भारतीय व्यापार्यांपेक्षा कितीतरी अधिक चांगली आहे. आपल्या व्यापार्यांना जनतेला लुटायची सवय झाली आहे. सेवा देण्याची बिलकुल इच्च्या नाही, त्यांना फक्त नफा दिसतो. वाल मार्ट कंपनीचा राक्षस भारतात आला कि भारतीय व्यापार्यांना एकतर सुधारावे लागेल किंवा संपावे लागेल. व्यापारी वर्ग राहील, पण त्यांच्या मधील अप्प्रवृत्तींचे समूळ उच्चाटन होईल. व्यापारी वाल मार्ट ला जो विरोध करतात तो स्वार्थामुळे करीत आहेत, त्यामागे देश हिताचा विचार नाही.

भारतीय व्यापारी आमने सामने लढाई करीत नसतात. कोणालातरी पुढे करून ते मागे राहून डावपेच आखत राहतात. केंद्र सरकारने परदेशी कंपन्यांना रिटेल व्यापार खुला केल्यामुळे आपले व्यापारी खवळले आहेत. आता ते नक्कीच पुन्हा आण्णाला उपोषणाला बसवतील. अण्णा हजारे यांची दोरी सध्या व्यापारी वर्गाच्या हातात आहे. अण्णांच्या उपोषणाला मागच्या उपोशानापेक्षा ते अधिक पैसा पणाला लावतील. अण्णा उपोषणाने दमत नाहीत. आणि स्वार्थासाठी व्यापारी हात आखडता घेणार नाहीत, म्हणून घराघरामध्ये अण्णा आणि त्यांचा उपवास आक्रमण करणार हे नक्की. 

अरविंद केजरीवाल हे व्यापारी वर्गातर्फे नेमलेले सेनापती आहेत. अर्थात व्यापारी वर्गाचे सेनापती हे दलाल असतात. संसदेला वाकविण्याचा प्रयत्न भाजपला पुढे करून व्यापारी वर्ग करतोय असे दिसते. एक तर भांडवलशाही अर्थव्यवस्थेला कट्टर विरोध करून समाजवादी अर्थव्यवस्था मान्य करावी. एकदा जागतिकीकरणाच्या नावाखाली भांडवलशाही मान्य केल्यानंतर तांत्रिक दृष्ट्या अधिक प्रगत, अधिक सेवातत्पर व कार्यक्षम भांडवलशाही देशी व्यापारी भांडवलशाही पेक्षा  वरचढ असते. दिक्षित, बाबा रामदेव, स्वदेशी जागरण मंच याच मनोवृत्तीचे आहेत. हिंदुत्ववाद नावाचे तत्वज्ञान देखील देशी भांडवलशाही आपत्य आहे, या उलट कार्पोरेट भांडवलशाही शोषक असली तरी जाती धर्म निरपेक्ष असते. 

Thursday 24 November 2011

शरद पवारांवरील हल्ला: समाजाचे नैतिक अध:पतन होत आहे काय?


शरद पवार यांना हरविंदर सिंग नावाच्या तरुणाने बेसावध अवस्थेत गाठून मारहाण केली. एकदा लोकशाही प्रणालीचा स्वीकार केला कि किमान सभ्यपणा अपेक्षित आहे. हा प्रकार असभ्य व रानटी आहे. शरद पवार त्यावेळी सावध असते तर त्या तरुणाने हल्ला करण्याचे धाडस केले नसते. म्हणून हा भ्याड हल्ला आहे. याच तरुणाने सुखराम यांच्यावरही हल्ला केला होता. मानसशास्त्राच्या दृष्टीने सामाजिक घटनांची अशी वैयक्तिक प्रतिक्रिया संभवत नाही. कदाचित या माणसाच्या मागे काही षडयंत्र रचणारी माणसे असू शकतात. मी प्रकारचा तीव्र निषेध करतो. कालच प्रसार माध्यमांच्या वाहिन्यांवर बोलताना मी म्हणालो होतो कि, 'दारू सोडण्यासाठी बदडून काढणे आणि पुन्हा नाकावर टिच्चून सांगणे कि ३० वर्षापूर्वी मी ज्यांना बदडले ते आज माझे उपकार मानतात. अन्यथा माझ्या आयुष्याचे वाट्टोळे झाले असते असे ते मला सांगतात' हे अण्णा हजारे यांनी सांगणे गैर आहे. परत अण्णा असे म्हणतात कि, 'मी मातृभावानेने लोकांना बदडत होतो.' अशी भूमिका असणार्यांना प्रतीगांधी हि मान्यता मिळावी हे देशाचे दुर्दैव आहे. हेच अण्णा हजारे शरद पवार यांच्यावर झालेल्या हल्ल्यावर प्रतिक्रिया देतांना फारच कुत्सित बोलले. ते असे म्हणाले कि, 'एकाच थप्पड मारली का?' म्हणजे अधिक थपडा मारायला पाहिजे होत्या अशी त्यांची अपेक्षा होती असे दिसते. 

काल मी अंदाज व्यक्त केला होता कि, जे दारूचे व्यसन सोडण्यासाठी मद्य प्रश्न करणाऱ्यांना बदडून काढण्याचा विचार मांडतात त्यांच्या मनात भ्रष्टाचारी माणसांना बदडून काढावे असाही विचार मूळ धरू लागेल. मग बदडून काढण्याची लाट येईल. मग हुकुमशाही व गुंड प्रवृत्तीचे म्हणू लागतील कि "तो अमुक आमुक दारुड्या होता किंवा भ्रष्टाचारी होता म्हणून आम्ही त्यांना बदडून काढले" हि भूमिका मुळातच विकृत आहे. 

शरद पवार हे माझे ५१ -५२ वर्षापासुनचे मित्र आहेत. त्यामुळे राजकीय घटनेपेक्षा आपल्या मित्राला अश्या प्रसंगाला तोंड द्यावे लागले याचे वाईट वाटले. विशेषता त्यांच्या आजाराच्या जागेवर आघात करण्यात आला. हे तर फारच गंभीर आहे. आम्ही राजकारणात एकमेकांच्या विरोधी भूमिका घेत असलो तरी आमच्या वैयक्तिक आपुलकी मध्ये अंतर पडलेले नाही. ७  वर्षांपूर्वी माझ्या घरावर, मी घरी नसताना बुरखाधारी सशत्र तरुणांनी जबरदस्तीने घरातल्या फर्निचर ची मोडतोड केली. माझ्या मुलाच्या शरीराला चाकू लावून हि राडेबाजी त्यांनी केली होती. त्या प्रसंगानंतर शरद पवारांचा फोन आला होता. मुख्यमंत्री सुशीलकुमार आणि छगन भुजबळ भेट द्यायला आहे होते. दीड वर्ष महाराष्ट्र सरकार तर्फे दोन सशत्र पोलिसांचे संरक्षण देण्यात आले होते. माझ्यासारख्या लहान माणसाच्या घरावर राजकीय भूमिकेखातर हल्ले होतात आणि शासन संरक्षणही देते. शरद पवार हे माझ्या तुलनेने महान राजकीय व्यक्तिमत्व आहे. म्हणून हा प्रकार फारच गंभीर वाटतो. कुणीतरी, कोणालातरी सार्वजनिक जीवनातून बाहेर फेकण्यासाठी षडयंत्र रचत आहे असा भास होतो. 

१९७८ साली शरद पवार पुलोद आघाडीच्या वतीने मुख्यमंत्री झाले. त्यावेळी मी जनता पक्षाचा आमदार होतो. आमचे राजकीय मेतकुट जमले होते. शरद पवारांनी कोन्ग्रेस व वसंत दादांशी गद्दारी केल्याचा राग इंदिरा कोन्ग्रेस च्या लोकांना आला होतो. कोन्ग्रेस चे भंडारा जिल्ह्यातील एक आमदार सुभाष कारेमोरे यांनी विधान सभेचे कामकाज चालू असताना 'गद्दार.. गद्दार ..' अशा घोषणा देवून शरद पवारांना चप्पल फेकून मारली होती. त्या प्रसंगाचा आम्ही सर्वांनी निषेध केला होता. मला वैयक्तिक दुख: झाले होते. त्या प्रसंगात शरद पवार त्यांची मनशांती ढळलेली नाही असे दाखवत होते. तथापि वरून तसे दाखवत असले तरी त्यांना अंतकरणात जखम झालेली होती. सार्वजनिक जीवनात वावरताना अशा गोष्टींना सामोरे जावे लागले कि, साहजिकच कोणाच्याही मनात विचार येतो कि आपण समाजकार्य का करावे? आपण एका व्यक्तीला नकोसे झाले आहोत कि संपूर्ण समाजाला नकोसे झालो आहोत असा मनात संभ्रम निर्माण होतो. त्यावेळी शरद पवार यांचे वय ३८ वर्षांचे होते. आज ते ७२ वर्षाचे आहे. भारतीय संस्कृतीत वयोजेष्ठतेला अपार महत्व आहे. मग सुखराम यांच्या सारख्या ८० वर्षाच्या नेत्याला मारहाण का झाली? समाजाची संस्कृती अवनत होत चालली आहे काय? असे अनंत प्रश्नाचे भोवरे मनात तयार होतात. कदाचित भविष्यकाळात जेष्ठ पुढार्यांना मारहाण करून नाउमेद व निरुत्साही करणे अशा प्रकारची लाट येण्याची शक्यता आहे. म. गांधी यांच्या सारख्या ७९ वर्षाच्या वृद्ध माणसाला गोळ्या घालण्यात फार मोठे शोर्य होते असे मानणारे नथुराम वादी मंडळी अजूनही समाजात आहेत. सुखराम यांना ज्यावेळी तरुणाने मारले त्यावेळी येवढा निषेध झाला नाही. म्हणून त्याने पुन्हा शरद पवारांना मारून प्रसिद्धी मिळवली. या प्रकारची चटक विविध पक्षातील तरुणांना नक्की लागेल. तुरुनांच्या वयोगटाला वाह्यात नेते प्रियच असतात. असेच एक वाह्यात नेते राज ठाकरे म्हणाले कि, 'शरद पवारांना कशाला मारले' शरद पवार मराठी आहेत म्हणून राज ठाकरेंना आदरणीय वाटतात. ते पुढे म्हणाले कि. 'पंतप्रधान मनमोहन सिंग यांनाच मारायला हवे होते.' इंदिरा कोन्ग्रेस चे लोक उद्या राज ठाकरे यांना मारण्यासाठी बक्षीस लावतील. हा खेळ चालू करून या देशाचे वाट्टोळे करण्यासाठी सर्वांनी चंग बांधलेला दिसतो. 

राष्ट्रवादी कोन्ग्रेस या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राडेबाजीचे बजीचे नाटक सुरु केले आहे. कारण सध्या महापालिकेच्या निवडणुकीच्या तिकिटाच्या मागणीचा मोसम सुरु आहे. साहेबांवरील हल्ल्यामुळे त्यांना झळकून घेण्याची, निष्ठेचे प्रदर्शन करण्याची ऐतीच नामी संधी प्राप्त झाली आहे. आर आर पाटील यांना तर मोठ्या व छोट्या या दोन्ही साहेबाना निष्टा दाखविण्यासाठी पोलिसांना निष्क्रिय राहण्याचा आदेश दिला आहे असे दिसते. नेमका असाच आदेश नरेंद्र मोदी यांनी गुजरात दंगली मध्ये दिला होता "... तीन दिवस निष्क्रिय राहा..!' तसाच हा प्रकार आहे. पोलिसांची निष्क्रियता पाहून अनेक भ्याड लोकांना शौर्य दाखविण्याची उबळ आलेली दिसली. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कोणाचा निषेध करणार कोणावर दगड फेकणार आणि कोणाच्या गोष्टी जाळणार. दिल्ली मध्ये केंद्र सरकार मध्ये आणि महाराष्ट्रातही ते सत्तेत आहेत. रस्ता रोको हा प्रकार शासनाच्या विरोधासाठी करतात. बस जळतात ते हि शासनाच्या निषेधासाठी. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना फक्त उपोषण करून सुताकामध्ये राहण्याचा नैतिक अधिकार आहे. रस्त्यावर येवून जनतेला त्रास देण्याचा अधिकार नाही. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जे नुकसान करतील त्याची भरपाई त्यांनी दिली पाहिजे. ज्यांनी स्वतंत्र लढ्यात भाग घेतला त्यांना स्वातंत्र्यानंतर मंत्री पदे मिळाली. जय प्रकाश नारायण यांच्या आणीबाणी च्या आंदोलनात जे लोक कारावासात गेले त्यांनाच पक्षाने तिकिटे दिली. तसे राष्ट्रवादी करणार आहे काय..? शरद पवारांना झालेल्या मारहाणीचा निषेध म्हणजे स्वातंत्र्य आंदोलन किंवा जे पी यांची चळवळ नाही. 

पुन्हा एकदा शरद पवार यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा मी निषेध व संताप व्यक्त करतो!

Wednesday 16 November 2011

सामर्थ्य आहे चळवळीचे.....



उसाच्या भाव वाढीचे आंदोलन 

राजू शेट्टी यांनी बारामती हे मुख्य केंद्र करून सहकारी साखर कारखान्यांकडून उसाचे भाव वाढून मिळावेत यासाठी आंदोलन केले. याला माझा व युक्रांद चा पाठींबा होता. मी ११ नोव्हेंबर रोजी बरोबर दुपारी १२ वाजता बारामतीला पोहचलो. ज्या काही चार गोष्टी सांगाव्यात असे वाटत होत्या त्या राजू शेट्टी यांना सांगितल्या. तीन वाजता तिथून परत निघालो. संध्याकाळी सरकारने वाढीव दर जाहीर केले आणि राजू शेट्टी यांच्या आंदोलनाची यशस्वी सांगता झाली. सर्व शेतकरी व त्यांचे नेते राजू शेट्टी यांचे अभिनंदन!

अण्णा हजारे व राजू शेट्टी यांच्या आंदोलनाचे जवळून निरीक्षण करताना व आकलन करताना काही गोष्टी माझ्या लक्षात आल्या. चळवळ, जन आंदोलन, सत्याग्रही जन आंदोलन, राडेबाजी आंदोलन या सर्व गोष्टींच्या संकल्पना परस्परात मिसळून त्या शब्दांचे मूळ अर्थ बदलले आहेत. विशेषता अण्णा हजारे, केजरीवाल, किरण बेदी यांच्या वेगवेगळ्या वेळी प्रसिद्ध झालेल्या उक्तींमुळे आंदोलन, जन आंदोलन व सत्याग्रह या मूळ शब्दांचे अर्थ पार बदलून गेले आहे. परंतु या प्रत्येक गोष्टीचे वेगळेपण काय ते तरुणांनी जाणून घेणे आवश्यक आहे.

राजू शेट्टी यांचे आंदोलन हे एका विशिष्ट वर्गाचे आर्थिक आंदोलन होते; पण ते जन आंदोलन नव्हते. जन आंदोलनाचे हे विशेष असते कि त्यात समाजातील सर्व वर्ग, जाती व विविध धर्माचे अनुयायी सामील असतात, थोडक्यात जन आंदोलन बहुआयामी असते. ते राष्ट्र बांधणीला पुष्टी देणारे असते. हे आंदोलन शेतकरी वर्गाचे प्रस्थापित सत्ताधारी वर्गाच्या विरुद्ध वर्ग संघर्ष या स्वरूपातले होते. त्याचे युक्रांद स्वागत करते. 

त्याची कारणे पुढील प्रमाणे:
०१. हे आंदोलन पूर्णपणे अहिंसक होते. 
०२. राजू शेट्टी यांचे नेतृत्व 
०३. शेतकऱ्यांची एकजूट 

या आंदोलनाने ग्रामीण भाग ढवळून निघाला. ग्रामीण भागात या विचार मंथनाची गरज आहे. ग्रामीण भागातून आलेले पुढारीच शेतकऱ्यांचे शोषण करतात, ते अधिक ठसठसीतपणे कळले त्यातच देशाचे हित सामावलेले आहे. प्रस्थापित नेते नव भांडवलशाहीचे दलाल असल्याने 'आपण शेतकऱ्यांची मुले आहोत' हेच ते विसरून जातात. त्यांना भांडवलदारांच्या दलालीसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी लुटायला आवडते. भांडवलदारांना शेती नकोय, शेतकरी नको आहे. त्यांना फक्त जमीन दिसते. शेतकऱ्यांच्या मालाला जेन्वा योग्य भाव मिळतील तेन्वाच शेती टिकेल. जर योग्य भाव मिळाला नाही तर शेतकरी शेती करणार नाही, शेती टिकणार नाही, अन्नाकरिता भारत परावलम्बी होइल.

भावी काळात दोन राष्ट्रांच्या संघर्षात शाशत्रांच्या वापरा ऐवजी भुके मारण्याचे शास्त्र वापरले जाईल. भारताला महासत्ता होण्याचे स्वप्न पडले आहे. परंतु देश जर स्वत: च्या जनतेसाठी पुरेसे अन्न तयार करू शकला नाही तर त्याला हे स्वप्न पाहण्याचा अधिकार नाही. म्हणून जे जे शेती व शेतकरी यांना समृद्ध करील त्याला युक्रांचा पाठींबा राहील. 

राजू शेट्टी या नेत्याचा त्याग, साधेपणा व प्रामाणिकपणा पाहून त्याच्या नेतृत्वाखाली सर्व शेतकरी एकत्र आले. राजू कुशल संघटक आहे. त्यामुळे तो त्याच्या क्षेत्रातून बाहेर पडला आणि शरद पवारांच्या गुहेत शिरून आह्वान दिले. ज्याला आपल्या क्षेत्रामध्ये सघन काम करता करता विस्तारित होता येते त्या नेत्याचा भविष्यकाळ उज्वल असतो. बारामतीत येवून ठिय्या मांडून बसण्याची त्याची खेळी राजकीय दृष्ट्या अत्यंत प्रभावी होती. राजूने उपवास केला नसते तरी चालले असते. त्याच्या उपवासाने आंदोलनाला विशेष धार आली असे म्हणता येणार नाही. गरज नसताना उपोषण करण्याचे कारण अण्णा हजारे यांचा परिणाम असे दिसते. परंतु हा प्रकार रुजला तर मराठीतील एक म्हण बदलावी लागेल. आज पर्यंत म्हटले जाई कि, 'सामर्थ्य आहे चळवळीचे! जो जो करील तयाचे !' परंतु आता लोक म्हणतील कि. 'सामर्थ्य आहे उपवासाचे! जो जो उपाशी राहील तयाचे!'  सामुदाईक पुरुषार्थ नामक संकल्पनेला काजळी आणणारे हे सूत्र आहे.

अण्णा हजारे यांच्या आंदोलनात सारे काही व्यक्ती केंद्रित आहे. टीम - अण्णा हा शब्द केवळ भ्रम मूलक आहे. ज्या प्रमाणे कडू साखर अस्तित्वात नसते तशी काल टीम  अण्णा नव्हती - आज नसणार आणि उद्याही नसणार! अण्णा, अण्णा आहेत. अण्णांची टीम असा प्रकार अस्तित्वात असूच शकत नाही. अण्णा आता ५० लोकांची टीम करणार आहेत. त्या नंतर सारे काही बैजवार होणार असा प्रचार चालू आहे. हे पन्नास लोक कुठून येणार ? कोण निवडणार ? त्यासाठी अण्णांनी अर्ज मागविले आहेत. उद्या अण्णांकडून ज्ञान मिळाल्यामुळे भारतीय क्रांतीसाठी अर्ज मागविण्याचा विचार करीत आहोत. अडचण एकच आहे. रामलीला आंदोलनाला २५० कोटी खर्च आला असे म्हणतात तर क्रांतीसाठी आम्हाला निदान २५ हजार कोटींचा प्रायोजक मिळवावा लागेल. भांडवलदारांच्या मदतीने समाजवादी क्रांती करण्याचा मानस कसा पूर्ण करता येईल याचा अभ्यास करण्यासाठी युक्रांदची एक टीम राळेगणला रवाना झाली आहे. 

Monday 7 November 2011

देशको हिलाने वाला खुद न हिले !






अण्णा हजारे यांनी उभे केलेले आंदोलन सपशेल पराभूत व्हावे अशी काहींची इच्चा आहे. तसेच अण्णा हजारे यशस्वी होवोत वा अपयशी ठरोत, आगामी निवडणुकांमध्ये कोन्ग्रेस पक्ष पराभूत होऊन भाजप प्रणीत आघाधीचे सरकार केंद्रात यावे अशी तीव्र इच्छा असलेला एक वर्ग आहे. देशाची वैचारिक फाळणी झालेली आहे. या चर्चेत जन आंदोलन या कल्पनेपेक्षा अण्णा हजारे यांचे नेतृव, त्यांची क्षमता, बौद्धिक झेप, या गोष्टींना उगाचच प्राधान्य मिळाले आहे. सध्या देशासमोर खरा प्रश्न वेगळाच आहे. सर्व राजकीय पक्षांचा जन्म लोक्भावानेतून होतो. कोन्ग्रेस ने स्वातंत्र्य संग्रामाचा लढा दीर्घकाळ अत्यंत दमदार पद्धतीने चालविला. स्वातंत्र्याच्या त्या चळवळी मधून लोकमान्य टिळक, पंडित नेहरू, सुभाष चंद्र बोस, मौलाना आझाद, सरदार पटेल आणि महात्मा गांधी अशी असंख्य गुणवान माणसे सार्वजनिक जीवनात आली. त्यांनी काही मुल्ये भारतीय जनमानसात रुजविली. प्रचलित परिस्थिती उलटी आहे. सध्या कोणत्याही राजकीय पक्षात नव्याने भारती कशी होते, ते आपल्या पक्षाच्या उमेदवारी कोणाला देतात हे पहिले तर, सर्वच पक्षांना धनदांडगे लोक, गुन्हेगारी प्रवृतीचे लोक जवळचे वाटतात. नव्हे; एखादा गुन्हेगार आपल्या पक्षात यावा यासाठी चाधावोड चालते. सध्या सर्वात जास्त गुन्हेगारी मालमत्तेच्या खरेदी- विक्री व्यवहारात चालते. रियल एस्टेत हे या धंद्याचे नाव. एखादा मंत्री, खासदार- आमदार किंवा नगरसेवक जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार करीत नसेल तर त्याचे नाव गिनीज बुकात घ्यावे लागेल. या परीस्थित परिवर्तन करण्याची शक्ती अण्णा हजारे प्रणीत आंदोलनात आहे काय ? हा खरा प्रश्न आहे.


अण्णा हजारे प्रणीत आंदोलन हे अस्सल जन आंदोलन होते कि ती जन आंदोलनाची आपल्या परीने केलेली नक्कल होती ? जन आंदोलनाचे भवितव्य ठरविताना काही वस्तू निष्ठ निकष आहेत. ते सर्व निकष थोड्या काळापुरते बाजूला ठेवूया. फक्त एकाच निकष लक्षात घेऊ .... जन आंदोलन हे राष्ट्र बांधणीचे मध्यम आहे यावर हे आंदोलन चालविणाऱ्या नेतृत्वाची ठाम श्रद्धा आहे का ..? हा निकष अत्यंत महत्वाचा आहे.



राष्ट्र उभारणीसाठी 'डावीकडे झुकलेला मध्यम मार्ग' याला पर्याय नाही. डावी कडे झुकलेला म्हणजे नाहीरे वर्गाविषयी संवेदनशील असलेला मार्ग. मध्यम मार्ग म्हणजे 'आंदोलनामुळे राष्ट्रात कोणत्याही दोन गटात वैरभाव, द्वेष भावना वाढणार नाही याची काळजी घेणे. म्हणून आंदोलनाचे नेतृत्व करणारी टीम अण्णा किंवा स्वतः अण्णा यांच्यासाठी एकाच वस्तुनिष्ठ निकष आहे कि त्यांच्यामध्ये कोणाविषयी द्वेष, वैरभाव आहे का याचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करणे अत्यावश्यक आहे. एक नक्की आहे, टीम अण्णा मध्ये आपापसात स्नेह भाव, बंधुत्वाची भावना फुललेली दिसत नाही. परिस्थितीने त्यांना इतिहासाने एका विशिष्ठ ठिकाणी एकत्र आणून कोंडले असावे असे दिसते. अण्णा हजारे यांचा अहंकार फुग्याप्रमाणे सातत्याने फुगतोच आहे. याचे नेमके कारण काळात नाही. अहंकारामुळे हे घडू शकते, वा अज्ञानामुळे हे घडू शकते किंवा कुसंगतीने हि घडू शकते. अण्णांच्या व्यक्तीमत्वात जे गुण दोष आहेत. त्याचा शोध घेण्याचे एरवी काहीच कारण नाही पण ते ज्या उंचीवर पोहचले आहेत तेथे त्यांचे दोष मोठ्याप्रमाणावर वाढतील कि आत्म परीक्षणाच्या माध्यमातून अण्णा स्वत चे मन दोष मुक्त करू शकतील असा हा पेच आहे. पूर्वेतिहास पाहता अण्णांना सत्संगाचे वावडे असावे असा निष्कर्ष काढण्याइतका भक्कम पुरावा आहे. एखाद्याने संसार केला नाही म्हणजे केवळ त्याच निकषावर तो माणूस उत्तुंग व्यक्तिमत्वाचा व सद्गुणांचा पुतळा होतो काय ? हा संशोधनाचा विषय आहे. प्रत्येकाने संसार करावा ही जनरीत आहे. कुटुंब सांभाळण्याच्या प्रयोगातून माणसाला अनेक गोष्टींचे भान येण्याची शक्यता असते. सर्वांना सांभाळून घ्यावे असा विचार कुटुंब प्रमुखामध्ये रुजतो. संसार न केलेल्या माणसाला संसार करणारी माणसे गौण दर्जाची वाटत असतील तर तो त्यांचे नेतृव्त कसे करू शकणार. डॉ. राम मनोहर लोहिया हे अहिंसक जन आंदोलनाचे कृतीशील विचारवंत होते. 'कोन्ग्रेस विरोध' त्यांच्या रोमारोमात भिनला होता. ढोंगाचा व ढोंगी माणसांचा ते सदैव तीव्र निषेध करीत. त्यांच्या प्रयत्नामुळे कोन्ग्रेस ने ९ राज्यात सत्ता गमावली. याच लोहियांनी आयुष्याच्या अखेरीस जय प्रकाश नारायण यांना एक पत्र लिहिले होते. "प्रिय साथी जय प्रकाश, मी देशाचा नेता बनू शकत नाही. हा देश बिगर संसारी व ब्रह्मचारी माणसाला कधीच आपला नेता मानणार नाही हे माझ्या लक्षात आले नाही. अलीकडे मलाही ते पटू लागले आहे. कुटुंब चालविण्याची जबाबदारी न घेतल्याने मनात अनेक कंगोरे निर्माण होतात. म्हणून मित्र तूच या देशाचा नेता होऊ शकतोस. परिस्थिती गंभीर आहे, देशाला हलविणाऱ्या नेत्याची गरज आहे, आणि तो नेता तू आहेस. देश को तुम हि हिला सकते हो.. सिर्फ एक शर्त है.. लेकीन हिलाने वाला खुद नही हिले !" आज डॉ. लोहिया असते तर ते अण्णा हजारेंना म्हणाले असते कि 'अण्णा आपल्या भुमिके पासून सारखे बदलू नका. स्वत चे मन स्थिर असल्याशिवाय देशाला हलविण्याच्या भानगडीत पडू नका.

Saturday 22 October 2011

निर्मल नाही जीवन, काय करील निरमा साबण...?



हिस्सार च्या घटनेनंतर कोन्ग्रेस पक्षाचे नेते गंभीर झाले. निवडणुकीत आह्वान देणार्यांना कोन्ग्रेस वाले गांभीर्याने घेतात. अन्य क्षेत्रात त्यांच्यावर टीका केली तरी त्यांना बाधा होत नाही. हिस्सार चा पराभव मनाला लागल्यानंतर अण्णा टीमची जशी वॉर रूम आहे तशी कोन्ग्रेस ने देखील त्यांची वॉर रूम सुरु केलेली दिसते. कोन्ग्रेस ची रणनीती अण्णा टीम च्या रणनीती पेक्षा सध्यातरी वरचढ दिसते. त्या रणनीतीचा मुख्य गाभा हा आहे कि, अण्णा हजारेंना उपोषणाच्या धमक्या देण्यापासून रोखणे. शिताफीने कोन्ग्रेस ची एक टीम राळेगण टीम वर प्रयोग करीत होती. अण्णांना मौनाच्या गुहेत ढकलणे शक्य झाले. आता काही दिवस उपोषणाची घोषणा होणार नाही. या मिळवलेल्या शांततेच्या काळात अन्न टीम मधील एकेकाला एकटे गाठून हाताळायचे असा डावपेच दिसतोय. अण्णा टीम मधील इतर लोक उच्च्य व हाय फाय जगणारे आहेत. त्यांना क्यामेरासमोर चप्पल खाणे, मारहाण होणे, भ्रष्टाचाराचे आरोप होणे याची सवय नाही. ती बिचकतील अशी कोन्ग्रेस वाल्यांना आशा आहे. उदा. प्रशांत भूषण यांना एकदा मारलेली चप्पल प्रसार माध्यमांनी अहोरात्र दाखवली. देशातील लहान मुले म्हणू लागली कि, 'रोज प्रशांत भूषण यांना २०-२५ वेळा मारहाण होते.' या मंडळींनी प्रसारमाध्यमांचा अनुकूल भाग भोगला होता. त्यांना प्रसिद्धीची चातक लागली होती. आत्ता तीच प्रसार माध्यमे जेवा मारहाणीचे प्रदर्शन करतात तेंवा त्यांना मेल्याहून मेल्यासारखे होते. आपण जन आंदोलनाच्या फंदात पडलो नसतो तर आपल्यावर हि पाली आली नसती असेही त्यांना वाटत असेल. एक म्हण आहे, ' बोकेने घी देखा था, लेकीन बडगा नही देखा था' तसाच हा प्रकार झाला.

किरण बेदी यांचे दर्शन उपोषण पर्वाच्या काळात अखिल विश्वाला रात्रंदिवस होत होते. त्या पुढार्यांच्या नाकाला करू शकतात. त्यांनी गोपीनाथ मुंढेंची नक्कल केली. भारताचा राष्ट्रध्वज घुमावण्याची त्यांनी शैली हि आधुनिक होती. सर्व देशात लहान मुले टोपी घालून तिरंगा घुमवीत नाचतात. तिरंगा घुमाविण्याची त्यांची शैली अंगात आल्यासारखी होती. त्यामुळे त्यांच्या अंगात भारत मत येते असा समाज पसरला. त्या टी व्ही वर दिसल्या कि भोळीभाबडी जनता त्यांना नमस्कार करते. देवी अंगात आलेल्या बाईच्या लोक पाया पडतात. कारण तो नमस्कार त्या बाई ला नसतो तर बाई च्या अंगात प्रवेश केलेल्या देवीला असतो. साक्षात भारत मत किरण बेदी यांच्या शरीरात प्रवेश करते असा अंदाज त्यांच्या विशिष्ठ देहबोलीतून पसरला. अंगात आल्यानंतर सामान्य बाईच्या तोंडूनही सुभाषिते बाहेर पडतात. त्या म्हणल्या कि संसद आणि भारत राष्ट्रापेक्षा अण्णा मोठे आहेत. पराशाक्तीचा संचार झाल्यानंतर त्या व्यक्तीची शक्ती नॉर्मल राहत नाही. ती थोड्यावेले पुरती अचाट बनते. देव ऋषी अंगातली पराशक्ती काढण्यासाठी छडीचा मार देतो. अंगातले कसे उतरायचे या ज्ञानाचा कोन्ग्रेस पक्षाने किरण बेदीवर प्रयोग केला. त्या स्वत: भ्रष्ट आहेत असे ठरविण्यासाठी त्या खोटे हिशोब मांडतात हे त्यांनी पुराव्यानिशी सिद्ध केले. किरण बेदींच्या जीवाला वाईट वाटले. पण हा झटका बसल्यानंतर त्य अघोरी वाणीचा प्रयोग करणार नाहीत आणि बहुदा त्यांच्या अंगातही येणार नाही. यांचे म्हणणे असे होते कि मी होशोबातल्या लाबदीतून धापलेला पैसा सत्कर्मासाठी वापरते. त्यांच्या या वक्तव्यामुळे अधिक गुंता गुंतीचे नैतिक प्रश्न निर्माण झाले आहेत. कोणतीही लबाडी सत्कर्मासाठी केली तर तिचे पुण्यात रुपांतर होते काय ? सत्कर्म कोणते ? हे कोण ठरविणार ? त्यांच्या म्हणण्यानुसार त्या ज्यांना वाढवून आपला प्रवास खर्च सांगतात त्यांना किरण बेदी कल्पना देतात. म्हणजे हा उभयपक्षी मान्य असलेला घोटाळा आहे. मग प्रश्न निर्माण होतो कि, किरण बेदी त्या कंपनीला त्या प्रवासाची खोटी बिले देण्या एवजी सरळ देणगी का मागत नाहीत. किरण बेदींचा हा व्यवहार अनंत काळ पर्यंत जनतेपासून लपून राहिला असता. परंतु त्यांनी इतरांचा भ्रष्टाचार दाखविण्याच्या नादात अनेकांची अब्रू उघड केली, मग त्याच न्यायाने त्यांचीही अब्रू वेशीवर टांगण्यात आली. एक साधा नियम आहे, ज्यांच्या नाकातून शेंबूड वाहत असतो, त्याने दुसर्याचा नाकाच्या शेम्बडाकडे बोट दाखवू नये. हा मुद्धा स्पष्ट करण्यासठी मराठीत एक म्हण आहे, 'शेंबूड आपल्या नाकाला.... आपण पुसे दुसर्याच्या नाकाला'. किरण बेदी स्वत साठी आणि दुसर्यासाठी वेगवेगळे निकष का लावतात. याचे उत्तर असे आहे कि, वरचा (अभिजन) वर्ग नेहमीच स्वत: साठी सुगंधी शब्द वापरतो आणि सामान्य जनतेसाठी दुर्गंधी युक्त शब्द वापरतो. उदा. ब्राम्हण वर्गात प्रतिवर्षी एकत्र एवून जुने जानवे टाकून नवे जानवे परिधान करण्याची प्रथा आहे. या विधीला श्रावणी म्हणतात. श्रावणी काहींची नागपंचमीला असते किंवा नारळी पौर्णिमेला असते. श्रावणातला विधी म्हुणुन श्रावणी. या विधीच्या वेळी महत्वाचा कार्यक्रम म्हणजे संघटीत रित्या काही तीर्थाचे प्राशन करणे हा असतो. त्याला ब्राह्मणांच्या भाषेत 'पंचगव्य प्राशन करणे' असे म्हणतात. पंचगव्य म्हणजे दुध, दही, मध, गोमुत्र आणि शेन यांचे सम प्रमाणातील मिश्रण असते. दिवसभर श्रावणी मध्ये सहभागी झालेल्या व्यक्तीच्या तोंडाला शेणाची दुर्गंधी येत असते. परंतु तो सांगत असतो कि मी सकाळी पंचगव्य प्राशन केले आहे. म्हणून शेन खाण्याच्या क्रियेला सभ्यता प्राप्त होते. हि संकृत कृती असावी असा आभास होतो. किरण बेदी यांना एकाच म्हणावेसे वाटते. ज्यांना दुसर्याचे दोष काढायचे असतात त्यांनी स्वत: अत्यंत शुद्द वर्तन ठेवायचे असतात. आता लोक त्यांना म्हणतात 'नाही निर्मल जीवन.. काय करील निरमा साबण !'

अण्णा हजारे हे राळेगण च्या गावगाड्यात तेथील पाटील बनले. हे अद्भुत घटना आहे. विलक्षण  घटना आहे. म्हाडा तालुक्यात गणेश कुलकर्णी पारंपारिक पाटील नसलेली व्यक्ती लोकप्रिय झाली आणि उपसरपंच झाली. तर स्थानिक पाटील लोकांनी त्याला तुकडे तुकडे करून मारून टाकले. अण्णा हजारे हे तर राळेगण मधील उपरे. हा कादंबरीचा विषय आहे, अगा जे घडलेची नव्हते, ते घडले! अण्णा वर गेले, देशात पोहचले, बराक ओबामा त्यांना ओळखू लागले, परंतु त्यांच्या डोक्यातून अंधश्रद्धा गेल्या नाहीत. भारतीयांचे हेच वैशिष्ट्य आहे कि,  ते कितीही मोठ्या पदावर गेले तरी बालपणापासून बाळगलेल्या अंधश्रद्धा सोडायला तयार होत नाहीत. अण्णा टीम मध्ये नेमके दोष काय आहेत याचे वस्तुनिष्ठ आत्मपरीक्षण करण्याएवजी त्यांनी वेगळाच निष्कर्ष काडला. नव्या जागेत वास्तू दोष आहे म्हणून त्यांनी पुन्हा आपला मुक्काम यादवबाबा मंदिरात हलवला. त्यामुळेच त्यांच्या टीमला दृष्ट लागली असे त्यांना सांगण्यात आले. अण्णा वाट्टेल ते करतील पण आत्मपरीक्षण कधीच करणार नाहीत. 

Tuesday 18 October 2011

अरविंद केजरीवाल यांना केलेल्या मारहाणीचा निषेध



आण्णा हजारे यांच्या सहकार्यांच्या टीम मधील अत्यंत महत्वाचे मा. अरविंद केजरीवाल यांना ते पत्रकार परिषद घेत असताना कोणा एका तरुणाने चप्पल फेकून मारली. त्या तरुणाला पोलिसांनी पकडले. प्रथम मी युवक क्रांती दल आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधी यांच्या तर्फे अध्यक्ष या नात्याने निषेध करतो. केजरीवाल आणि त्यांचे वक्तव्य कोणाला आवडत असेल व नसेल तरी त्यांच्यावर चप्पल फेकण्याचा अधिकार कोणालाही नाही. या घटना लोकशाही प्रणालीला दुर्बल बनवीत आहेत. असे का घडत आहे याचा विचार केला तर विविध उत्तरे मिळतात. एकतर, 'टीम - आण्णा यांचा अहंकार इतका वाढला होता कि, सर्व देशाचे, १२० कोटी भारतीय जनतेचे ते प्रतिनिधित्व करतात असा त्यांचा दावा सुरु झाला होता. 'आण्णा संसदेपेक्षा श्रेष्ठ आहेत.' आण्णा म्हणजेच भारत, 'म. गांधीच्या नेतृत्वाखाली झालेल्या स्वातंत्र्य लढ्यापेक्षा, डॉ. लोहिया आणि डॉ. जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनापेक्षा आण्णा यांचे आंदोलन आगळे वेगळे आहे असा दावा हि मंडळी करीत होती. या देशाच्या इतिहासातून, स्वातंत्र्य संग्राम, जे पी आंदोलन हे सारे पुसून टाकण्याचा हा प्रयत्न मुळात अघोरी होता. जणू आण्णा हजारे हे देशाचे राष्ट्रपिता आहेत, आणि त्यांच्या पासून भारत नावाचे राष्ट्र उदयाला आले. असा भन्नाट दावा केला जात होता. यामागे हिंदुराष्ट्र या संकल्पनेचा प्रभाव उघडपणे दिसत होता. त्यांना म गांधी आणि त्यांची विचारसरणी पुसून टाकायची आहे. खोटा इतिहास लिहिणे आणि खरा इतिहास पुसून टाकणे हा खास मनुवादी डावपेच आहे. टीम - आण्णा बरोबर "राळेगण ब्रिगेड' ही प्रचंड वैचारिक धुमाकूळ घालत होती. आण्णा राळेगण चे महात्मा ठरले हे ग्रामपंचायतीच्या एका ठरावाने. या घटनेपासून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रातील ४४००० गावातील पारंपारिक पाटील वतनदार ठराव करून त्या त्या गावचे महात्मे म्हणून मिरवू लागतील. गाव गणना महात्म्याचे पिक तरारून येईल. या सार्या गोष्टी इतक्या बेताल होण्याचे कारण रामलीला मैदानावरील यश या टीम च्या डोक्यात घुसले होते. या प्रकारात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, यांच्या पैकी एकालाही संघटना बांधण्याचा खटाटोप करावयाचा नाही. जेन्वा संघटना हा आधार नसतो आणि केवळ प्रसार माध्यमे हाच आधार असतो तेंवा जेधे प्रसार माध्यमे बसली आहेत तेथे या मंडळीवर हल्ले होणार, हे गैर असले तर असे घडणार याची कल्पना येत होती.

जगात अनेकांना अग्निदिव्यातून जावे लागले आहे, जावे लागत आहे. सोने तेजाब नावाच्या भयंकर असिड मध्ये घालतात आणि त्यात त्याची घात झाली नाही तर त्यास १०० नंबरी सोने म्हणतात. आण्णा - टीम यांना अग्निदिव्यातून जावे लागणार आहे. त्यांना तेजाब मध्ये टाकले जाईल तेंवा ते उजळून बाहेर आले तर त्यांना भारताच्या इतिहासात उजळ स्थान मिळेल. पण जर त्यांच्यात घट झाली तर इतिहासाची चक्रे उलट्या दिशेने फिरू लागतात. म. गांधी पुसण्यासाठी राळेगण नावाचे केंद्र उभे करण्यात आले आहे. गांधींच्या साबरमती व वर्धा येथील आश्रमाला गौणत्व यावे यासाठी हा प्रयत्न असावा याची शक्यता नाकारता येत नाही. 

केवळ अहिंसा हा सत्याग्रहाचा पुरावा नाही. सत्याग्रहाच्या पोटात अहिंसा असतेच. पण सत्याग्रहाला अहंकार, वैरत्व, आक्रमकता या गोष्टींचे वावडे असते. स्पर्धा, वैर हे व्यापारी गुण आहेत; पण त्याला अहिंसेची व गोड बोलण्याची जोड असते. व्यापार्यांना धंद्याला हिंसा मारक व अहिंसा पोषक असते हे समीकरण कळते. गांधीजीनी सागीतालेली अहिंसा हि निर्वैरता, अहंकार मुक्तता या अन्य गुणांशी अविभाज्यपणे जोडलेली आहे. जर रामलीला मैदानावर अहिंसा श्रद्धेचा विषय म्हणून सांगितली असती तर आताचे प्रकार घडले नसते. महात्मा गांधी यांच्या छत्र छायेखाली शहीद भगत सिंग यांचे नाव घेऊन हिंसेचे समर्थन करणे हा प्रकार अजब होता. टीम- आण्णा यांच्या सभासदांवर जे हल्ले होत आहेत. त्या मागे कोन्ग्रेस आहे कि भाजप आहे ? असा प्रश्न विचारला जातो. या प्रश्नाचे उत्तर यामागे दोघेही असू शकतात असे आहे. श्रीराम सेनेने प्रशांत भूषण यांच्यावर मुस्लीम विरोधी भावनेतून हल्ला केला असेल आणि केजरीवाल कोन्ग्रेस च्या विरोधात फार बोलतात म्हणून त्यांच्यावर हल्ला केला असेल. तसेच ज्या टीम मध्ये नेमकी कोणतीही ठाम वैचारिक भूमिका नसते, तिथे प्रतिगामी आणि पुरोगामी यांचा प्रवेश होतो आणि कालांतराने अंतर्गत संघर्ष अपरिहार्य ठरतो. त्या अवस्थेमधून रामलीला मैदानावरील जन आंदोलन जात आहे. या राम लीलेमागे नेमका कोणता प्रभू आहे याचे नेमके उत्तर भविष्यात कळू शकेल. 

Sunday 16 October 2011

नियतीचा खेळ: अण्णा- अडवाणी- केजरीवाल-येडीयुरप्पा




नियती म्हणजे अद्भुत गोष्ट असते असा आपला समज आहे. खरे म्हणजे व्यक्तीच्या आयुष्याच्या बाहेर "नियती नावाची वेगळी शक्ती असते असे मानायचे कारण नाही. नियतीचे नियंत्रण व्यक्तीच्या हातात नसते एवढे मात्र खरे. पण नियती हि दैवी व अमानवी शक्ती आहे असे ठाम पाने म्हणता येणार नाही. मनुष्य रोज जी कृत्ये करतो त्यातील सारांश शिल्लक राहतो. या शिल्लक राहिलेल्या सारांशातून नियती नावाची एक अदृश्य शक्ती निर्माण होते असे म्हणावे लागेल. माणूस सत्कृते करत जातो आणि त्यांचा सारांश म्हणून त्याच्या पाठीमागे इतरांची सद्भावना व सदिच्च्या निर्माण होते. त्याने दुसर्यांना क्लेशदायक कृत्ते केली तर त्याच्या मागे व भोवती दुर्भावना पसरते. सद्भावना किंवा गुडविल यांचा संचय (यालाच काही लोक पुण्य म्हणतात ) बर्यापैकी असला त्या व्यक्तीविषयी लोक चांगले बोलतात. त्याच्याविषयीची सद्भावना गुणाकारी पद्धतीने वाढते. त्यामुळे त्याची अवघड कामे सहज यशस्वी होतात. यालाच आपण नशिबाची व नियतीची साथ असे म्हणतो. त्या व्यक्तीविषयी लोक वाईट बोलत असतील तर त्याच्या कामात त्याला पूर्व कल्पना नसलेले अनेक अडथळे येतात. याला फुटके नशीब म्हणतात. पण एक नक्की कि आयुष्यात केलेल्या कृत्यांवरूनच सकारात्मक वा नकारात्मक नियती तयार होते. नियतीवर व्यक्तीचे नयंत्रण मात्र राहत नाही. 

सध्या भाजप व अण्णा टीम यांच्या बाजूने नियती काम करीत नाही असे दिसते. लालकृष्ण अडवाणी यांनी वृद्धापकाळात देखील संकल्प शक्तीच्या आधाराने, पंतप्रधान होण्यासाठी शेवटची संधी म्हणून मोठ्या उमेदीने रथयात्रा सुरु केली. त्यांचे पूर्व कृत्य पाहता धर्मद्वेष वाढविण्यासाठीच त्याच्या रथयात्रेला यश मिळाले होते. धर्म द्वेषामुळे देशाचे आर्थिक व सामाजिक नुकसान झाले; पण भाजपला केंद्र सरकारची सत्ता मिळाली. हि नियती आत्ता अडवानिन्च्याही हातात नाही. त्यांनी भ्रष्टाचार विरोधी जन चेतना असा बोजड संकृत शब्द वापरला पण नियतीने त्यांच्या पंतप्रधान पदाच्या स्वप्नाचा घास घेतला. भाजपचे माजी मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात जावे लागले. अडवाणींची रथयात्रा भव्यपणे पंचर झाली. आता लोक म्हणताहेत, 'अडवाणीजी प्रथम तुमचे घर सुधारा. भाजपला भ्रष्टाचार मुक्त करा. त्यात तुम्हाला यश आले तर भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी भारत देश आम्ही तुमच्या हातात सोपवू. जमल्यास तुम्हाला पंतप्रधान करू. तुमची नियती व नशीब जे असेल ते घडेल. रथयात्रा मात्र थांबवा. पंचर झालेला रथ पाहून आमच्या मनात कसलीही चेतना निर्माण होत नाही. तुमची यात्रा कॉमेडी एक्स्प्रेस झाली आहे.' 

नरेंद्र मोदींची नियती पहा. गुजरात मध्ये त्यांच्या हातून घडलेला नरसंहार आणि त्यातून शेष उरलेला सारांश हा दुर्भावानेचा आहे. त्यांनी ढोल बडवीत काही तासांचे उपोषण केले. कुंभमेळ्या प्रमाणे उपवास मेळा घेतला. पण मागील कृत्यातून निर्माण झालेली नियती एका मौलानाच्या रूपाने समोर आली आणि मुसलमान ढंगाची टोपी घालण्याचा आग्रह करू लागली. नरेंद्र मोदी तर असे दाखवीत होते कि त्यांना मुसलमाना इतके जगात अन्य काहीही प्रिय नाही. नियतीने घात केला, भव्य ढोंगाचा छेद झाला आणि नाटकाचा ANTI CLIMAX झाला. 

अण्णा टीम मध्ये फक्त कोन्ग्रेस विरोधी हे तत्वज्ञान मानाण्यावरून मतभेद झाले. हिस्सार मध्ये अण्णा स्पष्टपणे कोन्ग्रेस विरोधात गेले होते. भाजपचा उमेदवार भ्रष्ट असला तरी त्याला मत द्या असाच त्यांचा पवित्रा दिसून येत होता. परंतु अण्णा टीम संतोष हेगडे यांनी या विषयी जाहीर रित्या मतभेत उघड केले. प्रशांत भूषण यांना श्रीराम सेनेने मारहाण केली. श्रीराम सेनेची भूमिका व विचारधारा पूर्णता: हिंदुत्व वाद्यांशी जुळणारी आहे. श्रीराम सेनेची हिंसेवर श्रद्धा आहे. अण्णांची अहिंसेवर श्रद्धा नाही, त्यांना डावपेच म्हणून अहिंसा मान्य आहे. म्हणून ते महात्मा गांधी शहीद भगत सिंग असे कॉकटेल तत्वज्ञान मांडत असतात. अण्णा हजारे खूपच धाडसी आहेत, त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर बोलण्यासाठी ब्लॉग सुरु केला आहे, माईक वरून जो आवाज पोहचतो तो कर्ण्याने (भोंग्याने) मोठा करणे ठीक आहे. परंतु कधी कधी माईक च्या ऐवजी कर्णेच (भोन्गेच) बोलू लागतात. अण्णांनी गाधीवादात  दुरुस्ती करण्याचेही धाडसही केले, त्याक्षणी मी मनातल्या मनात अण्णांचे पाय धरले. (तसा मी कोणा सम वयास्काच्या पायावर माथा टेकवत नाही) अण्णा प्रती गांधी होणार बनणार अशी चिन्हे होती; पण आत्ता तर ते 'सुपर गांधी' होत आहेत. ते म्हणाले 'म. गांधींच्या काळात शाब्दिक हिंसा देखील वर्ज्य होती. परंतु आता काळ बदलला आहे. म्हणून मी शाब्दिक हिंसेला मान्यता देतो. कुणाला पिडा देणारे कठोर शब्द वापरणे म्हणजे हिंसा असे जुन्या काळातले बापुजी म्हणत. सुपर गांधी म्हणत आहेत कि, 'शाब्दिक हिंसा केली पाहिजे. मी दोन वेळा मनीष तिवारीचे ऐकले. तिसर्या वेळेला मी त्याला वेड्याच्या दवाखान्यात पाठवावे अशी टीका केली.' शाब्दिक हिंसा हि सत्याग्रह शाश्त्रामध्ये अण्णांनी केलेली दुरुस्ती आहे. याला मी धाडस म्हणतो. अण्णा टीम फुटणारच. कारण ती अण्णांची पूर्व कृत्यांमधून तयार झालेली नियती आहे. असे घडू नये अशी आमच्या सारख्या अनेकांची इच्छया आहे पण नियतीपुढे आपण काय करणार.....! आता अण्णांनी नियतीचे चक्र थांबविण्यासाठी बेमुदत मौन नावाचे हत्त्यार उपसले आहे. मौन हे आत्मशुद्धी साठी असते. असे म. गांधींनी सांगून ठेवले आहे. त्यामुळे अण्णांनी गांधींच्या विचारधारेत केलेल्या दुरुस्त्या ते काढून टाकतील अशी अशा निर्माण झाली आहे. आत्म शुद्धी झाल्यावरच शुद्ध गांधीवाद उमगतो. 

...............अरविंद केजरीवाल ! हे गृहस्त आकाशायेवढे झाले आहेत. मराठीत तुकारामांचा अभंग आहे, 'तुका झाला आकाशाएवढा'. त्याचा अर्थ तुकारामाने आपले मन आकाशायेवढे मोठे केले असा होतो. केजरीवाल यांचा अहंकार आकाशाएवढा झाला होता. या तुकाराम आणि त्यांच्यात फरक आहे. केजरीवाल म्हणाले आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाच्या विरोधात काम करणार नाही. आम्ही निवडणुकीच्या काळात प्रचार दौरा करणार नाही. आमची बांधिलकी फक्त लोकपाल बिलाला आहे.' अण्णा नावाचा माणूस हाती लागल्यापासून केजरीवाल यांना अल्लाउद्दिन चा दिवा गवसल्यासारखे वाटत होते. हा आधुनिक काळातला अल्लाउद्दिन केंव्हाही अण्णा रुपी दिवा घासायचा आणि त्यातून महाकाय शक्तीचा..... निर्माण करायचा. असो .. अल्लाउद्दिन ला देखील त्याच्या कृत्यातून निर्माण झालेली नियती माफ करीत नसते.

एकाच वेळी येडीयुरप्पा अटकेत, अडवाणींची रथयात्रा पंचर, अण्णा टीम मध्ये मतभेद, केजरीवाल लघु होणे आणि अण्णांचे मौन या सार्या गोष्टी नियतीने एकाच माळेत गोवल्या आहेत. 

Friday 14 October 2011

प्रतीगाम्यांची झुंडशाही आणि विचारवंतांची अपूर्णता



प्रशांत भूषण यांना १२ ऑक्टोबर रोजी त्यांच्या चेंबर मध्ये मारहाण करण्यात आली. दुसर्या दिवशी पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये त्यांच्या अनुयायांना मारहाण करण्यात आली. मारहाण करणाऱ्या श्रीराम सेनेचे म्हणणे आहे कि प्रशांत भूषण यांनी काश्मीर बद्दल घेतलेली भूमिका त्यांना मान्य नाही. लोकशाही व्यवस्थेचा गाभा हा आहे कि त्यात प्रत्येक व्यक्तीला विचार करण्याचे आणि तो विचार इतरांना सांगण्याचे स्वातंत्र्य असणे. विचार स्वातंत्र्य व अभिव्यक्ती स्वातंत्र्य या शिवाय व्यक्तीचे स्वातंत्र्य अपूर्ण आहे. लोकशाहीत डोक्यातले विचार बदलायचे असतात, डोकी फोडायची नसतात. ज्यांना आपले विचार इतरांना पटवून देण्याची क्षमता नसते आणि ज्यांच्या मेंदूला भिन्न विचार ऐकण्याची सवय नसते तेच लोक अशा प्रकारे झुंड शाही करतात. नागरिकांची विवेकशक्ती हा लोकशाहीचा पाया आहे. काही भारतीय नागरिकांना भारतीय संविधान, त्याने दिलेले सर्वांना समान दर्ज्याचे स्थान हेच मान्य नाही. हि मंडळी भूतकाळात मनाने वावरतात. त्यांना भारत नावाचे आधुनिक राष्ट्र, या नवोदित राष्ट्राने स्वीकारलेली लोकशाही प्रणाली, सर्व नागरिकांचा समान दर्जा, स्त्री - पृरुश समानता या गोष्टी अमान्य आहेत. या गोष्ठी व त्याच्या पाठीशी असलेली जीवन मुल्ये - म्हणजे श्रेणीबद्ध समाजरचना, अश्पृश्यता, स्त्रियांची गुलामी, अंधश्रद्धा - पुन्हा प्रस्थापित करून प्राचीन समाज रचना आणायची आहे. या प्रक्रियेला प्रतिक्रांती असे म्हणतात. प्रतीक्रांतीकारकला विवेक शुण्यातेची साधना करावी लागते. विवेक शून्य माणसे एकत्र झाली कि झुंड शाही निर्माण होते. श्रीराम सेनेच्या या भ्याड कृत्याचा मी व्यक्तिश: व युवक क्रांती दलाचा अध्यक्ष व महाराष्ट्र गांधी स्मारक निधी चा अध्यक्ष या नात्याने तीव्र निषेध करीत आहे. तसेच सर्व सामान्यांनी चौकात, मित्रांबारोबारील गप्पांमध्ये, कार्यालयात, हॉटेल मध्ये चहा पितांना, प्राध्यापकांनी स्टाफ रूम मध्ये या कृत्याचा निषेध अभिव्यक्त केला पाहिजे. पोलिटिकली करेक्ट अशी भूमिका यत्र - तत्र व सर्वत्र व तिन्ही त्रिकाळ घेणे हि लोकशाहीला बळकट करण्याची सेवा आहे. 

प्रशांत भूषण यांनी म्हटले आहे कि, 'काश्मीर मधील बांधवांना भावनिक दृष्ट्या दूर लोटता कामा नये.' त्याची हि भूमिका मला तंतोतंत मान्य आहे. काश्मीर मध्ये राहणारे नागरिक भारतीय नागरिक आहेत याची जन ठेवली पाहिजे. लष्कराच्या आधारे नागरिकांना जोडून ठेवता येत नाही, समता पूर्ण न्याय व्यवहारानेच माणसे एकमेकाशी जोडली जातात. काश्मीर मधल्या हिंदू असो वा शीख वा मुस्लीम या सर्वांशी सर्व भारतीयांनी बंधुभावनेच वागले पाहिजे. जे मुस्लीम धर्माचा द्वेष करतात आणि हिंदुत्ववादाचा पुरस्कार करतात ते भारतीय राष्ट्रवादाचे नुकसान पोहोचवितात. त्यांचे म्हणणे असे आहे कि, काश्मीर मधल्या मुस्लिमांवर लष्कराचे बंधन आवश्यक आहे. जे भारताला निष्टावंत नसतील त्यांना भारतीय लष्कराने पाकिस्तानात पाठवावे किंवा गोळ्या घालून संपवावे. हा तालिबानी जातकुळीचा विचार आहे. तो अनर्थकारी व घातक आहे. आपण हिंदू म्हणून जन्मलो म्हणून भारतीय आहोत असे म्हणता येणार नाही. ५००० वर्षापासून ज्यांची ज्यांची हि जन्म भूमी आहे आणि ज्यांची स्मशानभूमी हीच आहे ते सारे भारतीयाच आहेत. मुस्लिमांना ते भारतीय आहेत किंवा नाहीत हे ठरविण्याचा नैतिक अधिकार कोणालाही नाही.

प्रशांत भूषण यांनी आणखी एक विधान केले आहे. ते म्हणाले कि, ' काश्मीर मधून भारतीय लष्कर काढून घ्यावे. तिथे सार्वमत घ्यावे. त्यांना भारतापासून अलग व्हायचे असेल तर होऊ द्यावे.' या भूमिकेशी मी बिलकुल सहमत नाही. सार्वमत घ्यायचे असेल तर काश्मीर मध्ये प्रत्येक व्यक्ती विवेकशील राहून योग्य मतदान करील असे पाहावे लागेल. त्यासाठी तेथील हिंसा शून्य पातळीवर आली पाहिजे. ज्या प्रमाणे पूर्वी काश्मिरी पंडित व काश्मिरी मुसलमान एका काश्मिरियत या सांस्कृतिक सूत्राने एकत्र बांधले होते. तसे वातावरण तयार झाल्यावर सार्वमत घेण्यात मतलब आहे. पाकिस्तानच्या लष्कराने प्रशिक्षित केलेले धर्मांध अतिरेकी काश्मीर मध्ये पाठवून मोठ्या प्रमाणावर काश्मिरी पंडितांचा व काश्मिरी लोकांचा बळी घेतला आहे. या पाकिस्तानी अतिरेक्याचे छुपे हल्ले चालूच आहेत. अशा परिस्थितीत सार्वमत घेणे गैर होईल. वाघ आणि शेळी यांच्या एकत्र राहण्याबद्दल जर सार्वमत घेतले तर काय परिणाम होईल ? शिवाय सार्वमताचा मुद्दा संयुक्त रास्थ्र संघाने संदर्भ हीन झाला असल्याचे मान्य केले आहे. पाकिस्तानचे लष्कर जो पर्यंत घुसखोरी करीत आहे तो पर्यंत भारतीय लष्कराने काश्मिरी भूमीवर उभे राहण्यात काहीही गैर नाही. या गोष्टी सूर्यप्रकाशा इतक्या स्पष्ट असताना प्रशांत भूषण विपरीत, विचित्र आणि विक्षिप्त भूमिका का घेत असावेत या बद्दल एकाच अंदाज करता येतो. विद्वत्तेच्या आधारे पोकळीमध्ये विद्वान माणसांना साक्षात्कार होतात हा भ्रम त्यांच्या मनात असावा. म्हणून विचारवंतांना झालेले दर्शन एकांगी असण्याची शक्यता असते. ते वैचारिक कसरती करतील पण सत्याला, सत्याच्या सर्व बाजू पाहण्यासाठी सत्याला प्रदिक्षणा घालणार नाहीत. अर्थात त्यांच्या बरोबर तीव्र वैचारिक मतभेत राखूनही त्यांच्यावरच्या शारीरिक हल्ल्याच्या मी त्रिवार निषेध करतो. 

Wednesday 5 October 2011

महात्मा या शब्दाचे अवमूल्यन व थिल्लरीकरण होऊ नये एवढीच अपेक्षा...


महात्मा हि पदवी भारतीय इतिहासातील सर्वात मोठी पदवी आहे. ती सर्वात अधिक लोकमान्यतेचे प्रतिक आहे. २६०० वर्षापूर्वी भगवान गौतम बुद्धापुढे त्यांना महात्मा पदवी देण्याचा प्रस्ताव आला होता. त्यांनी तो प्रस्ताव फेटाळला. महात्मा म्हणवून घेण्यास नकार दिला. महात्मा हा जनतेने दिलेला जीवन गौरव पुरस्कार आहे. मुलभूत परिवर्तन करणाऱ्यासच फक्त महात्मा म्हणतात. प्रत्येक शब्दाच्या पोटात विशिष्ट अर्थ दडलेला असतो. उदा. संत म्हणजे मानवतावादी व सभ्य माणूस, महापुरुष म्हणजे समाजाच्या किमान एका स्तराला वर आणणारा माणूस, राष्ट्रसंत म्हणजे राष्ट्रीय पातळीवर मानवतावादाचा प्रचार करणारा. तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत म्हणत. सद्या भैय्यूजी महाराजांना राष्ट्रसंत म्हणतात. परंतु महात्मा हि पदवी वा विशेषण मात्र फार थोड्या व्यक्तींसाठी राखीव आहे. महात्मा त्याला म्हणतात कि ज्याच्या कार्याच्या प्रारंभ पूर्वी असलेले सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थिती त्याच्या जीवन कार्यामुळे पूर्णतः बदललेली असते. आपला देश जाती पातींनी, सवर्ण - दलित अशा भेदा भेदांमुळे चीर्फालालेला आहे,. म्हणून तर आपला आत्मा तुकड्या तुकड्यात विखुरलेला असतो, जो आत्म्याचे fracture दुरुस्त करतो - आत्म्याचे तुकडे जोडतो, सर्व तुकड्यांमध्ये स्वत प्रवेश करतो, सर्वांचा अंश बनतो अशा आत्म्याला महान आत्मा असे म्हणतात. महान आत्मा या शब्दाचे संक्षिप्त स्वरूप म्हणजे महात्मा!


आत्ता पावेतो महात्मा गांधी व महात्मा फुले हे दोन महात्मे झाले. गौतम बुद्ध व महावीर यांना लोक भगवान म्हणू लागले. फुले यांनी स्त्रियांचा आत्मा जागविला. दलित सवर्णांची दरी कमी करून समाजाचे दोन तुकडे एकत्र जोडले. म्हणून त्यांना सत्यशोधक समाजाने महात्मा हि पदवी दिली. महात्मा गांधींनी जात, भाषा, धर्म व प्रांत यात विभागलेली, भारताच्या भूप्रदेशावर राहणारी जनता स्वतान्र्या संग्राम, सत्य - अहिंसा या तत्वाने एकत्र आणली आणि देशाचे राष्ट्रात व प्रजेचे नागरिकात रुपांतर केले. आत्मे जोडले म्हणून तो महान आत्मा.... महात्मा.


काहींना ब्रिटीश जायला नको होते, त्यांना येथेच श्रेणीबद्ध उच्चवर्णीयांचे राज्य हवे होते. ते ज्यांना दलित जाती समूह गुलामीतच राहायला हवे होते, ते ज्यांना स्त्रिया पुरुषांच्या गुलाम असाव्यात असे वाटत होते, ते ज्यांना एकाच धर्माचे राष्ट्र हवे होते अशांचा महात्मा गांधींना विरोध होता. महात्मा गांधी भारताला ज्या पद्धतीने आकार देत होते त्यामुळे त्यांच्या पारंपारिक हित संबंधाना धक्का लागणार होता. ते सर्व महात्मा गांधींचा द्वेष करीत होते, आजही करतात. ३० जानेवारी १९४७ रोजी त्यांनी गांधीजींची शारीरिक हत्या केली, पण या शक्ती गांधीजींच्या विचारांची हत्या करू शकले नाहीत, किंबहुना गांधीजींचे विचार त्यांच्या समाधीतून बाहेर येत आहेत. त्यामुळे गांधीजी पुन पुन्हा समाधीतून बाहेर येतील याचा धसका अनेकांना वाटतो. कोन्ग्रेस पक्षाच्या नेत्यांना लाज वाटते म्हणून ते महात्मा गांधींच्या विचारांची हत्या व्हावी असे स्पष्ट म्हणत नाहीत. पण त्यांनी मालमत्तेच्या नादी लागून गांधींचे कधीच विस्मरण केले आहे, 


या परिस्थितीत गांधी फक्त सामान्य भारतीय जनतेला हवे आहेत, कोणत्याही राजकीय पक्षाला नको आहेत. सत्य - अहिंसा - निर्वैरता या मुल्ल्यांचे सर्व राजकीय पक्षांनी निर्माल्य बनविले आहे. गांधीजी शरीराने अस्तीवतात नसल्याने आता परत त्यांचा खून करणार तरी कसा. म्हणून त्यांचे व त्यांच्या विचारांचे थिल्लरीकरण करण्याचा डाव आखण्यात आला आहे. या थिल्लरीकरण विरुद्ध गांधीजींच्या विचारांची श्रेष्ठता हि लढाई चालू आहे. या लढाईत आण्णा हजारेंना साधन केले जात आहे. पूर्वी किल्ल्याच्या दरवाज्याचे संरक्षण करण्यासाठी खिळे लावले जात. तो तोडण्यासाठी हत्ती त्याला धडाका मारत. हत्तींना जखमा होऊ नयेत म्हणून मध्ये उंटांना उभे करीत. तसाच आण्णांचा वापर केला जात आहे याचे मला दुख होत आहे. मनाला क्लेश होतात. 


७३ व्या घटना दुरुस्ती नंतर ग्रामसभेला खूप अधिकार मिळाले. परंतु त्या अधिकाराची मर्यादा त्या गावाच्या शिवे पर्यंत असते. एका गावाने केलेला ठराव दुसर्या गावाला लागू होत नाही. २ ऑक्टोबर रोजी राळेगण येथे अन्ना हजारेंना महात्मा म्हणावे असा ठराव पास केला. माझ्यासारख्या अनेकांना असे वाटत होते कि आण्णा अखिल भारतीय पातळीवरील व्यक्तिमत्व आहे. परंतु आमच्या भ्रमाचा भोपळा फुटला. आण्णांना फक्त गावापुरते महत्व आहे. आत्ता महाराष्ट्रात लाट येईल. ४४००० गावात स्थानिक महात्मे निर्माण होतील. गावागावात ज्वारीचे पिक येणार नाही पण महात्म्याचे पिक जोरात येईल. बारामती, अकलूज, लातूर इत्यादी गावांमध्ये महात्मा हि पदवी कोणाला मिळणार याचा अंदाज आम्हाला येतो. कारन आधीपासूनच तेथे महान माणसे आहेत. गांधीजींना त्यांच्या आश्रम वासियांनी विचारले कि बापुजी आम्ही तुम्हास महात्माजी म्हणणार आहोत. चंपारण्य च्या लढ्यापासून जनता तुम्हाला महात्मा म्हणतेच, मग आम्हाला हि संधी का नाही. तेंवा गांधीजीनी जे उत्तर दिले ते सर्व भारत वासियांनी लक्षात ठेवण्यासारखे आहे. ते म्हणाले " माणूस हा भगवान आही सैतान अशा दोन्ही प्रवृत्तीचे मिश्रण आहे, त्यामुळे आयुष्यभर देवासारखे वागला आणि अखेरच्या काळात अध पतित झाला असे घडू शकते. म्हणून केवळ मृतुच ठरवू शकतो कि तो महात्मा आहे किंवा नाही? मी मेल्याशिवाय माझा जय जय कर करायचा कि नाही याचा निर्णय घेऊ नये." त्यावर आश्रम वासीय म्हणाले, " बापुजी, तुम्ही नवे राष्ट्र जन्माला घालणार राष्ट्रपिता आहात म्हणून आम्ही तुम्हाला महात्मा म्हणू इच्छितो." त्यावर बापुजी म्हणाले, " राष्ट्र निर्मितीची प्रक्रिया हि दीर्घकाळ चालणारी आहे. हिंदू - मुस्लीम ऐक्य हा भारत नावाच्या आधुनिक राष्ट्राचा गाभा आहे. म्हणून मी जर माझ्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासाच्या वेळी "हे राम - हे रहीम" असे उद्गार काढू शकलो तर माझ्या मृतू नंतर मला महात्मा म्हणणे संयुक्तिक ठरेल. 


नथुराम गोडसेने निशस्त्र अश्या ७९ वर्षाच्या वृद्ध व्यक्ती वर गोळ्या झाडल्या. पहिली गोळी छातीत घुसली त्यावेळी गांधींच्या तोंडून " हे राम ..." हे उद्गार निघाले. नंतर नथुराम ने दुसरी गोळी घातली. त्यावेळी गांधीजींचा आवाज क्षीण झाला होता.. ते खाली कोसळले होते. त्यावेळी त्यांच्या तोंडून शब्द आहे " हे रहीम.." म्हणून ते पूर्ण महात्मा ठरले. महात्मा या शब्दाचे अवमूल्यन व थिल्लरीकरण होऊ नये एवढीच अपेक्षा...!