Saturday 22 October 2011

निर्मल नाही जीवन, काय करील निरमा साबण...?



हिस्सार च्या घटनेनंतर कोन्ग्रेस पक्षाचे नेते गंभीर झाले. निवडणुकीत आह्वान देणार्यांना कोन्ग्रेस वाले गांभीर्याने घेतात. अन्य क्षेत्रात त्यांच्यावर टीका केली तरी त्यांना बाधा होत नाही. हिस्सार चा पराभव मनाला लागल्यानंतर अण्णा टीमची जशी वॉर रूम आहे तशी कोन्ग्रेस ने देखील त्यांची वॉर रूम सुरु केलेली दिसते. कोन्ग्रेस ची रणनीती अण्णा टीम च्या रणनीती पेक्षा सध्यातरी वरचढ दिसते. त्या रणनीतीचा मुख्य गाभा हा आहे कि, अण्णा हजारेंना उपोषणाच्या धमक्या देण्यापासून रोखणे. शिताफीने कोन्ग्रेस ची एक टीम राळेगण टीम वर प्रयोग करीत होती. अण्णांना मौनाच्या गुहेत ढकलणे शक्य झाले. आता काही दिवस उपोषणाची घोषणा होणार नाही. या मिळवलेल्या शांततेच्या काळात अन्न टीम मधील एकेकाला एकटे गाठून हाताळायचे असा डावपेच दिसतोय. अण्णा टीम मधील इतर लोक उच्च्य व हाय फाय जगणारे आहेत. त्यांना क्यामेरासमोर चप्पल खाणे, मारहाण होणे, भ्रष्टाचाराचे आरोप होणे याची सवय नाही. ती बिचकतील अशी कोन्ग्रेस वाल्यांना आशा आहे. उदा. प्रशांत भूषण यांना एकदा मारलेली चप्पल प्रसार माध्यमांनी अहोरात्र दाखवली. देशातील लहान मुले म्हणू लागली कि, 'रोज प्रशांत भूषण यांना २०-२५ वेळा मारहाण होते.' या मंडळींनी प्रसारमाध्यमांचा अनुकूल भाग भोगला होता. त्यांना प्रसिद्धीची चातक लागली होती. आत्ता तीच प्रसार माध्यमे जेवा मारहाणीचे प्रदर्शन करतात तेंवा त्यांना मेल्याहून मेल्यासारखे होते. आपण जन आंदोलनाच्या फंदात पडलो नसतो तर आपल्यावर हि पाली आली नसती असेही त्यांना वाटत असेल. एक म्हण आहे, ' बोकेने घी देखा था, लेकीन बडगा नही देखा था' तसाच हा प्रकार झाला.

किरण बेदी यांचे दर्शन उपोषण पर्वाच्या काळात अखिल विश्वाला रात्रंदिवस होत होते. त्या पुढार्यांच्या नाकाला करू शकतात. त्यांनी गोपीनाथ मुंढेंची नक्कल केली. भारताचा राष्ट्रध्वज घुमावण्याची त्यांनी शैली हि आधुनिक होती. सर्व देशात लहान मुले टोपी घालून तिरंगा घुमवीत नाचतात. तिरंगा घुमाविण्याची त्यांची शैली अंगात आल्यासारखी होती. त्यामुळे त्यांच्या अंगात भारत मत येते असा समाज पसरला. त्या टी व्ही वर दिसल्या कि भोळीभाबडी जनता त्यांना नमस्कार करते. देवी अंगात आलेल्या बाईच्या लोक पाया पडतात. कारण तो नमस्कार त्या बाई ला नसतो तर बाई च्या अंगात प्रवेश केलेल्या देवीला असतो. साक्षात भारत मत किरण बेदी यांच्या शरीरात प्रवेश करते असा अंदाज त्यांच्या विशिष्ठ देहबोलीतून पसरला. अंगात आल्यानंतर सामान्य बाईच्या तोंडूनही सुभाषिते बाहेर पडतात. त्या म्हणल्या कि संसद आणि भारत राष्ट्रापेक्षा अण्णा मोठे आहेत. पराशाक्तीचा संचार झाल्यानंतर त्या व्यक्तीची शक्ती नॉर्मल राहत नाही. ती थोड्यावेले पुरती अचाट बनते. देव ऋषी अंगातली पराशक्ती काढण्यासाठी छडीचा मार देतो. अंगातले कसे उतरायचे या ज्ञानाचा कोन्ग्रेस पक्षाने किरण बेदीवर प्रयोग केला. त्या स्वत: भ्रष्ट आहेत असे ठरविण्यासाठी त्या खोटे हिशोब मांडतात हे त्यांनी पुराव्यानिशी सिद्ध केले. किरण बेदींच्या जीवाला वाईट वाटले. पण हा झटका बसल्यानंतर त्य अघोरी वाणीचा प्रयोग करणार नाहीत आणि बहुदा त्यांच्या अंगातही येणार नाही. यांचे म्हणणे असे होते कि मी होशोबातल्या लाबदीतून धापलेला पैसा सत्कर्मासाठी वापरते. त्यांच्या या वक्तव्यामुळे अधिक गुंता गुंतीचे नैतिक प्रश्न निर्माण झाले आहेत. कोणतीही लबाडी सत्कर्मासाठी केली तर तिचे पुण्यात रुपांतर होते काय ? सत्कर्म कोणते ? हे कोण ठरविणार ? त्यांच्या म्हणण्यानुसार त्या ज्यांना वाढवून आपला प्रवास खर्च सांगतात त्यांना किरण बेदी कल्पना देतात. म्हणजे हा उभयपक्षी मान्य असलेला घोटाळा आहे. मग प्रश्न निर्माण होतो कि, किरण बेदी त्या कंपनीला त्या प्रवासाची खोटी बिले देण्या एवजी सरळ देणगी का मागत नाहीत. किरण बेदींचा हा व्यवहार अनंत काळ पर्यंत जनतेपासून लपून राहिला असता. परंतु त्यांनी इतरांचा भ्रष्टाचार दाखविण्याच्या नादात अनेकांची अब्रू उघड केली, मग त्याच न्यायाने त्यांचीही अब्रू वेशीवर टांगण्यात आली. एक साधा नियम आहे, ज्यांच्या नाकातून शेंबूड वाहत असतो, त्याने दुसर्याचा नाकाच्या शेम्बडाकडे बोट दाखवू नये. हा मुद्धा स्पष्ट करण्यासठी मराठीत एक म्हण आहे, 'शेंबूड आपल्या नाकाला.... आपण पुसे दुसर्याच्या नाकाला'. किरण बेदी स्वत साठी आणि दुसर्यासाठी वेगवेगळे निकष का लावतात. याचे उत्तर असे आहे कि, वरचा (अभिजन) वर्ग नेहमीच स्वत: साठी सुगंधी शब्द वापरतो आणि सामान्य जनतेसाठी दुर्गंधी युक्त शब्द वापरतो. उदा. ब्राम्हण वर्गात प्रतिवर्षी एकत्र एवून जुने जानवे टाकून नवे जानवे परिधान करण्याची प्रथा आहे. या विधीला श्रावणी म्हणतात. श्रावणी काहींची नागपंचमीला असते किंवा नारळी पौर्णिमेला असते. श्रावणातला विधी म्हुणुन श्रावणी. या विधीच्या वेळी महत्वाचा कार्यक्रम म्हणजे संघटीत रित्या काही तीर्थाचे प्राशन करणे हा असतो. त्याला ब्राह्मणांच्या भाषेत 'पंचगव्य प्राशन करणे' असे म्हणतात. पंचगव्य म्हणजे दुध, दही, मध, गोमुत्र आणि शेन यांचे सम प्रमाणातील मिश्रण असते. दिवसभर श्रावणी मध्ये सहभागी झालेल्या व्यक्तीच्या तोंडाला शेणाची दुर्गंधी येत असते. परंतु तो सांगत असतो कि मी सकाळी पंचगव्य प्राशन केले आहे. म्हणून शेन खाण्याच्या क्रियेला सभ्यता प्राप्त होते. हि संकृत कृती असावी असा आभास होतो. किरण बेदी यांना एकाच म्हणावेसे वाटते. ज्यांना दुसर्याचे दोष काढायचे असतात त्यांनी स्वत: अत्यंत शुद्द वर्तन ठेवायचे असतात. आता लोक त्यांना म्हणतात 'नाही निर्मल जीवन.. काय करील निरमा साबण !'

अण्णा हजारे हे राळेगण च्या गावगाड्यात तेथील पाटील बनले. हे अद्भुत घटना आहे. विलक्षण  घटना आहे. म्हाडा तालुक्यात गणेश कुलकर्णी पारंपारिक पाटील नसलेली व्यक्ती लोकप्रिय झाली आणि उपसरपंच झाली. तर स्थानिक पाटील लोकांनी त्याला तुकडे तुकडे करून मारून टाकले. अण्णा हजारे हे तर राळेगण मधील उपरे. हा कादंबरीचा विषय आहे, अगा जे घडलेची नव्हते, ते घडले! अण्णा वर गेले, देशात पोहचले, बराक ओबामा त्यांना ओळखू लागले, परंतु त्यांच्या डोक्यातून अंधश्रद्धा गेल्या नाहीत. भारतीयांचे हेच वैशिष्ट्य आहे कि,  ते कितीही मोठ्या पदावर गेले तरी बालपणापासून बाळगलेल्या अंधश्रद्धा सोडायला तयार होत नाहीत. अण्णा टीम मध्ये नेमके दोष काय आहेत याचे वस्तुनिष्ठ आत्मपरीक्षण करण्याएवजी त्यांनी वेगळाच निष्कर्ष काडला. नव्या जागेत वास्तू दोष आहे म्हणून त्यांनी पुन्हा आपला मुक्काम यादवबाबा मंदिरात हलवला. त्यामुळेच त्यांच्या टीमला दृष्ट लागली असे त्यांना सांगण्यात आले. अण्णा वाट्टेल ते करतील पण आत्मपरीक्षण कधीच करणार नाहीत. 

Tuesday 18 October 2011

अरविंद केजरीवाल यांना केलेल्या मारहाणीचा निषेध



आण्णा हजारे यांच्या सहकार्यांच्या टीम मधील अत्यंत महत्वाचे मा. अरविंद केजरीवाल यांना ते पत्रकार परिषद घेत असताना कोणा एका तरुणाने चप्पल फेकून मारली. त्या तरुणाला पोलिसांनी पकडले. प्रथम मी युवक क्रांती दल आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधी यांच्या तर्फे अध्यक्ष या नात्याने निषेध करतो. केजरीवाल आणि त्यांचे वक्तव्य कोणाला आवडत असेल व नसेल तरी त्यांच्यावर चप्पल फेकण्याचा अधिकार कोणालाही नाही. या घटना लोकशाही प्रणालीला दुर्बल बनवीत आहेत. असे का घडत आहे याचा विचार केला तर विविध उत्तरे मिळतात. एकतर, 'टीम - आण्णा यांचा अहंकार इतका वाढला होता कि, सर्व देशाचे, १२० कोटी भारतीय जनतेचे ते प्रतिनिधित्व करतात असा त्यांचा दावा सुरु झाला होता. 'आण्णा संसदेपेक्षा श्रेष्ठ आहेत.' आण्णा म्हणजेच भारत, 'म. गांधीच्या नेतृत्वाखाली झालेल्या स्वातंत्र्य लढ्यापेक्षा, डॉ. लोहिया आणि डॉ. जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनापेक्षा आण्णा यांचे आंदोलन आगळे वेगळे आहे असा दावा हि मंडळी करीत होती. या देशाच्या इतिहासातून, स्वातंत्र्य संग्राम, जे पी आंदोलन हे सारे पुसून टाकण्याचा हा प्रयत्न मुळात अघोरी होता. जणू आण्णा हजारे हे देशाचे राष्ट्रपिता आहेत, आणि त्यांच्या पासून भारत नावाचे राष्ट्र उदयाला आले. असा भन्नाट दावा केला जात होता. यामागे हिंदुराष्ट्र या संकल्पनेचा प्रभाव उघडपणे दिसत होता. त्यांना म गांधी आणि त्यांची विचारसरणी पुसून टाकायची आहे. खोटा इतिहास लिहिणे आणि खरा इतिहास पुसून टाकणे हा खास मनुवादी डावपेच आहे. टीम - आण्णा बरोबर "राळेगण ब्रिगेड' ही प्रचंड वैचारिक धुमाकूळ घालत होती. आण्णा राळेगण चे महात्मा ठरले हे ग्रामपंचायतीच्या एका ठरावाने. या घटनेपासून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रातील ४४००० गावातील पारंपारिक पाटील वतनदार ठराव करून त्या त्या गावचे महात्मे म्हणून मिरवू लागतील. गाव गणना महात्म्याचे पिक तरारून येईल. या सार्या गोष्टी इतक्या बेताल होण्याचे कारण रामलीला मैदानावरील यश या टीम च्या डोक्यात घुसले होते. या प्रकारात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, यांच्या पैकी एकालाही संघटना बांधण्याचा खटाटोप करावयाचा नाही. जेन्वा संघटना हा आधार नसतो आणि केवळ प्रसार माध्यमे हाच आधार असतो तेंवा जेधे प्रसार माध्यमे बसली आहेत तेथे या मंडळीवर हल्ले होणार, हे गैर असले तर असे घडणार याची कल्पना येत होती.

जगात अनेकांना अग्निदिव्यातून जावे लागले आहे, जावे लागत आहे. सोने तेजाब नावाच्या भयंकर असिड मध्ये घालतात आणि त्यात त्याची घात झाली नाही तर त्यास १०० नंबरी सोने म्हणतात. आण्णा - टीम यांना अग्निदिव्यातून जावे लागणार आहे. त्यांना तेजाब मध्ये टाकले जाईल तेंवा ते उजळून बाहेर आले तर त्यांना भारताच्या इतिहासात उजळ स्थान मिळेल. पण जर त्यांच्यात घट झाली तर इतिहासाची चक्रे उलट्या दिशेने फिरू लागतात. म. गांधी पुसण्यासाठी राळेगण नावाचे केंद्र उभे करण्यात आले आहे. गांधींच्या साबरमती व वर्धा येथील आश्रमाला गौणत्व यावे यासाठी हा प्रयत्न असावा याची शक्यता नाकारता येत नाही. 

केवळ अहिंसा हा सत्याग्रहाचा पुरावा नाही. सत्याग्रहाच्या पोटात अहिंसा असतेच. पण सत्याग्रहाला अहंकार, वैरत्व, आक्रमकता या गोष्टींचे वावडे असते. स्पर्धा, वैर हे व्यापारी गुण आहेत; पण त्याला अहिंसेची व गोड बोलण्याची जोड असते. व्यापार्यांना धंद्याला हिंसा मारक व अहिंसा पोषक असते हे समीकरण कळते. गांधीजीनी सागीतालेली अहिंसा हि निर्वैरता, अहंकार मुक्तता या अन्य गुणांशी अविभाज्यपणे जोडलेली आहे. जर रामलीला मैदानावर अहिंसा श्रद्धेचा विषय म्हणून सांगितली असती तर आताचे प्रकार घडले नसते. महात्मा गांधी यांच्या छत्र छायेखाली शहीद भगत सिंग यांचे नाव घेऊन हिंसेचे समर्थन करणे हा प्रकार अजब होता. टीम- आण्णा यांच्या सभासदांवर जे हल्ले होत आहेत. त्या मागे कोन्ग्रेस आहे कि भाजप आहे ? असा प्रश्न विचारला जातो. या प्रश्नाचे उत्तर यामागे दोघेही असू शकतात असे आहे. श्रीराम सेनेने प्रशांत भूषण यांच्यावर मुस्लीम विरोधी भावनेतून हल्ला केला असेल आणि केजरीवाल कोन्ग्रेस च्या विरोधात फार बोलतात म्हणून त्यांच्यावर हल्ला केला असेल. तसेच ज्या टीम मध्ये नेमकी कोणतीही ठाम वैचारिक भूमिका नसते, तिथे प्रतिगामी आणि पुरोगामी यांचा प्रवेश होतो आणि कालांतराने अंतर्गत संघर्ष अपरिहार्य ठरतो. त्या अवस्थेमधून रामलीला मैदानावरील जन आंदोलन जात आहे. या राम लीलेमागे नेमका कोणता प्रभू आहे याचे नेमके उत्तर भविष्यात कळू शकेल. 

Sunday 16 October 2011

नियतीचा खेळ: अण्णा- अडवाणी- केजरीवाल-येडीयुरप्पा




नियती म्हणजे अद्भुत गोष्ट असते असा आपला समज आहे. खरे म्हणजे व्यक्तीच्या आयुष्याच्या बाहेर "नियती नावाची वेगळी शक्ती असते असे मानायचे कारण नाही. नियतीचे नियंत्रण व्यक्तीच्या हातात नसते एवढे मात्र खरे. पण नियती हि दैवी व अमानवी शक्ती आहे असे ठाम पाने म्हणता येणार नाही. मनुष्य रोज जी कृत्ये करतो त्यातील सारांश शिल्लक राहतो. या शिल्लक राहिलेल्या सारांशातून नियती नावाची एक अदृश्य शक्ती निर्माण होते असे म्हणावे लागेल. माणूस सत्कृते करत जातो आणि त्यांचा सारांश म्हणून त्याच्या पाठीमागे इतरांची सद्भावना व सदिच्च्या निर्माण होते. त्याने दुसर्यांना क्लेशदायक कृत्ते केली तर त्याच्या मागे व भोवती दुर्भावना पसरते. सद्भावना किंवा गुडविल यांचा संचय (यालाच काही लोक पुण्य म्हणतात ) बर्यापैकी असला त्या व्यक्तीविषयी लोक चांगले बोलतात. त्याच्याविषयीची सद्भावना गुणाकारी पद्धतीने वाढते. त्यामुळे त्याची अवघड कामे सहज यशस्वी होतात. यालाच आपण नशिबाची व नियतीची साथ असे म्हणतो. त्या व्यक्तीविषयी लोक वाईट बोलत असतील तर त्याच्या कामात त्याला पूर्व कल्पना नसलेले अनेक अडथळे येतात. याला फुटके नशीब म्हणतात. पण एक नक्की कि आयुष्यात केलेल्या कृत्यांवरूनच सकारात्मक वा नकारात्मक नियती तयार होते. नियतीवर व्यक्तीचे नयंत्रण मात्र राहत नाही. 

सध्या भाजप व अण्णा टीम यांच्या बाजूने नियती काम करीत नाही असे दिसते. लालकृष्ण अडवाणी यांनी वृद्धापकाळात देखील संकल्प शक्तीच्या आधाराने, पंतप्रधान होण्यासाठी शेवटची संधी म्हणून मोठ्या उमेदीने रथयात्रा सुरु केली. त्यांचे पूर्व कृत्य पाहता धर्मद्वेष वाढविण्यासाठीच त्याच्या रथयात्रेला यश मिळाले होते. धर्म द्वेषामुळे देशाचे आर्थिक व सामाजिक नुकसान झाले; पण भाजपला केंद्र सरकारची सत्ता मिळाली. हि नियती आत्ता अडवानिन्च्याही हातात नाही. त्यांनी भ्रष्टाचार विरोधी जन चेतना असा बोजड संकृत शब्द वापरला पण नियतीने त्यांच्या पंतप्रधान पदाच्या स्वप्नाचा घास घेतला. भाजपचे माजी मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात जावे लागले. अडवाणींची रथयात्रा भव्यपणे पंचर झाली. आता लोक म्हणताहेत, 'अडवाणीजी प्रथम तुमचे घर सुधारा. भाजपला भ्रष्टाचार मुक्त करा. त्यात तुम्हाला यश आले तर भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी भारत देश आम्ही तुमच्या हातात सोपवू. जमल्यास तुम्हाला पंतप्रधान करू. तुमची नियती व नशीब जे असेल ते घडेल. रथयात्रा मात्र थांबवा. पंचर झालेला रथ पाहून आमच्या मनात कसलीही चेतना निर्माण होत नाही. तुमची यात्रा कॉमेडी एक्स्प्रेस झाली आहे.' 

नरेंद्र मोदींची नियती पहा. गुजरात मध्ये त्यांच्या हातून घडलेला नरसंहार आणि त्यातून शेष उरलेला सारांश हा दुर्भावानेचा आहे. त्यांनी ढोल बडवीत काही तासांचे उपोषण केले. कुंभमेळ्या प्रमाणे उपवास मेळा घेतला. पण मागील कृत्यातून निर्माण झालेली नियती एका मौलानाच्या रूपाने समोर आली आणि मुसलमान ढंगाची टोपी घालण्याचा आग्रह करू लागली. नरेंद्र मोदी तर असे दाखवीत होते कि त्यांना मुसलमाना इतके जगात अन्य काहीही प्रिय नाही. नियतीने घात केला, भव्य ढोंगाचा छेद झाला आणि नाटकाचा ANTI CLIMAX झाला. 

अण्णा टीम मध्ये फक्त कोन्ग्रेस विरोधी हे तत्वज्ञान मानाण्यावरून मतभेद झाले. हिस्सार मध्ये अण्णा स्पष्टपणे कोन्ग्रेस विरोधात गेले होते. भाजपचा उमेदवार भ्रष्ट असला तरी त्याला मत द्या असाच त्यांचा पवित्रा दिसून येत होता. परंतु अण्णा टीम संतोष हेगडे यांनी या विषयी जाहीर रित्या मतभेत उघड केले. प्रशांत भूषण यांना श्रीराम सेनेने मारहाण केली. श्रीराम सेनेची भूमिका व विचारधारा पूर्णता: हिंदुत्व वाद्यांशी जुळणारी आहे. श्रीराम सेनेची हिंसेवर श्रद्धा आहे. अण्णांची अहिंसेवर श्रद्धा नाही, त्यांना डावपेच म्हणून अहिंसा मान्य आहे. म्हणून ते महात्मा गांधी शहीद भगत सिंग असे कॉकटेल तत्वज्ञान मांडत असतात. अण्णा हजारे खूपच धाडसी आहेत, त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर बोलण्यासाठी ब्लॉग सुरु केला आहे, माईक वरून जो आवाज पोहचतो तो कर्ण्याने (भोंग्याने) मोठा करणे ठीक आहे. परंतु कधी कधी माईक च्या ऐवजी कर्णेच (भोन्गेच) बोलू लागतात. अण्णांनी गाधीवादात  दुरुस्ती करण्याचेही धाडसही केले, त्याक्षणी मी मनातल्या मनात अण्णांचे पाय धरले. (तसा मी कोणा सम वयास्काच्या पायावर माथा टेकवत नाही) अण्णा प्रती गांधी होणार बनणार अशी चिन्हे होती; पण आत्ता तर ते 'सुपर गांधी' होत आहेत. ते म्हणाले 'म. गांधींच्या काळात शाब्दिक हिंसा देखील वर्ज्य होती. परंतु आता काळ बदलला आहे. म्हणून मी शाब्दिक हिंसेला मान्यता देतो. कुणाला पिडा देणारे कठोर शब्द वापरणे म्हणजे हिंसा असे जुन्या काळातले बापुजी म्हणत. सुपर गांधी म्हणत आहेत कि, 'शाब्दिक हिंसा केली पाहिजे. मी दोन वेळा मनीष तिवारीचे ऐकले. तिसर्या वेळेला मी त्याला वेड्याच्या दवाखान्यात पाठवावे अशी टीका केली.' शाब्दिक हिंसा हि सत्याग्रह शाश्त्रामध्ये अण्णांनी केलेली दुरुस्ती आहे. याला मी धाडस म्हणतो. अण्णा टीम फुटणारच. कारण ती अण्णांची पूर्व कृत्यांमधून तयार झालेली नियती आहे. असे घडू नये अशी आमच्या सारख्या अनेकांची इच्छया आहे पण नियतीपुढे आपण काय करणार.....! आता अण्णांनी नियतीचे चक्र थांबविण्यासाठी बेमुदत मौन नावाचे हत्त्यार उपसले आहे. मौन हे आत्मशुद्धी साठी असते. असे म. गांधींनी सांगून ठेवले आहे. त्यामुळे अण्णांनी गांधींच्या विचारधारेत केलेल्या दुरुस्त्या ते काढून टाकतील अशी अशा निर्माण झाली आहे. आत्म शुद्धी झाल्यावरच शुद्ध गांधीवाद उमगतो. 

...............अरविंद केजरीवाल ! हे गृहस्त आकाशायेवढे झाले आहेत. मराठीत तुकारामांचा अभंग आहे, 'तुका झाला आकाशाएवढा'. त्याचा अर्थ तुकारामाने आपले मन आकाशायेवढे मोठे केले असा होतो. केजरीवाल यांचा अहंकार आकाशाएवढा झाला होता. या तुकाराम आणि त्यांच्यात फरक आहे. केजरीवाल म्हणाले आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाच्या विरोधात काम करणार नाही. आम्ही निवडणुकीच्या काळात प्रचार दौरा करणार नाही. आमची बांधिलकी फक्त लोकपाल बिलाला आहे.' अण्णा नावाचा माणूस हाती लागल्यापासून केजरीवाल यांना अल्लाउद्दिन चा दिवा गवसल्यासारखे वाटत होते. हा आधुनिक काळातला अल्लाउद्दिन केंव्हाही अण्णा रुपी दिवा घासायचा आणि त्यातून महाकाय शक्तीचा..... निर्माण करायचा. असो .. अल्लाउद्दिन ला देखील त्याच्या कृत्यातून निर्माण झालेली नियती माफ करीत नसते.

एकाच वेळी येडीयुरप्पा अटकेत, अडवाणींची रथयात्रा पंचर, अण्णा टीम मध्ये मतभेद, केजरीवाल लघु होणे आणि अण्णांचे मौन या सार्या गोष्टी नियतीने एकाच माळेत गोवल्या आहेत. 

Friday 14 October 2011

प्रतीगाम्यांची झुंडशाही आणि विचारवंतांची अपूर्णता



प्रशांत भूषण यांना १२ ऑक्टोबर रोजी त्यांच्या चेंबर मध्ये मारहाण करण्यात आली. दुसर्या दिवशी पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये त्यांच्या अनुयायांना मारहाण करण्यात आली. मारहाण करणाऱ्या श्रीराम सेनेचे म्हणणे आहे कि प्रशांत भूषण यांनी काश्मीर बद्दल घेतलेली भूमिका त्यांना मान्य नाही. लोकशाही व्यवस्थेचा गाभा हा आहे कि त्यात प्रत्येक व्यक्तीला विचार करण्याचे आणि तो विचार इतरांना सांगण्याचे स्वातंत्र्य असणे. विचार स्वातंत्र्य व अभिव्यक्ती स्वातंत्र्य या शिवाय व्यक्तीचे स्वातंत्र्य अपूर्ण आहे. लोकशाहीत डोक्यातले विचार बदलायचे असतात, डोकी फोडायची नसतात. ज्यांना आपले विचार इतरांना पटवून देण्याची क्षमता नसते आणि ज्यांच्या मेंदूला भिन्न विचार ऐकण्याची सवय नसते तेच लोक अशा प्रकारे झुंड शाही करतात. नागरिकांची विवेकशक्ती हा लोकशाहीचा पाया आहे. काही भारतीय नागरिकांना भारतीय संविधान, त्याने दिलेले सर्वांना समान दर्ज्याचे स्थान हेच मान्य नाही. हि मंडळी भूतकाळात मनाने वावरतात. त्यांना भारत नावाचे आधुनिक राष्ट्र, या नवोदित राष्ट्राने स्वीकारलेली लोकशाही प्रणाली, सर्व नागरिकांचा समान दर्जा, स्त्री - पृरुश समानता या गोष्टी अमान्य आहेत. या गोष्ठी व त्याच्या पाठीशी असलेली जीवन मुल्ये - म्हणजे श्रेणीबद्ध समाजरचना, अश्पृश्यता, स्त्रियांची गुलामी, अंधश्रद्धा - पुन्हा प्रस्थापित करून प्राचीन समाज रचना आणायची आहे. या प्रक्रियेला प्रतिक्रांती असे म्हणतात. प्रतीक्रांतीकारकला विवेक शुण्यातेची साधना करावी लागते. विवेक शून्य माणसे एकत्र झाली कि झुंड शाही निर्माण होते. श्रीराम सेनेच्या या भ्याड कृत्याचा मी व्यक्तिश: व युवक क्रांती दलाचा अध्यक्ष व महाराष्ट्र गांधी स्मारक निधी चा अध्यक्ष या नात्याने तीव्र निषेध करीत आहे. तसेच सर्व सामान्यांनी चौकात, मित्रांबारोबारील गप्पांमध्ये, कार्यालयात, हॉटेल मध्ये चहा पितांना, प्राध्यापकांनी स्टाफ रूम मध्ये या कृत्याचा निषेध अभिव्यक्त केला पाहिजे. पोलिटिकली करेक्ट अशी भूमिका यत्र - तत्र व सर्वत्र व तिन्ही त्रिकाळ घेणे हि लोकशाहीला बळकट करण्याची सेवा आहे. 

प्रशांत भूषण यांनी म्हटले आहे कि, 'काश्मीर मधील बांधवांना भावनिक दृष्ट्या दूर लोटता कामा नये.' त्याची हि भूमिका मला तंतोतंत मान्य आहे. काश्मीर मध्ये राहणारे नागरिक भारतीय नागरिक आहेत याची जन ठेवली पाहिजे. लष्कराच्या आधारे नागरिकांना जोडून ठेवता येत नाही, समता पूर्ण न्याय व्यवहारानेच माणसे एकमेकाशी जोडली जातात. काश्मीर मधल्या हिंदू असो वा शीख वा मुस्लीम या सर्वांशी सर्व भारतीयांनी बंधुभावनेच वागले पाहिजे. जे मुस्लीम धर्माचा द्वेष करतात आणि हिंदुत्ववादाचा पुरस्कार करतात ते भारतीय राष्ट्रवादाचे नुकसान पोहोचवितात. त्यांचे म्हणणे असे आहे कि, काश्मीर मधल्या मुस्लिमांवर लष्कराचे बंधन आवश्यक आहे. जे भारताला निष्टावंत नसतील त्यांना भारतीय लष्कराने पाकिस्तानात पाठवावे किंवा गोळ्या घालून संपवावे. हा तालिबानी जातकुळीचा विचार आहे. तो अनर्थकारी व घातक आहे. आपण हिंदू म्हणून जन्मलो म्हणून भारतीय आहोत असे म्हणता येणार नाही. ५००० वर्षापासून ज्यांची ज्यांची हि जन्म भूमी आहे आणि ज्यांची स्मशानभूमी हीच आहे ते सारे भारतीयाच आहेत. मुस्लिमांना ते भारतीय आहेत किंवा नाहीत हे ठरविण्याचा नैतिक अधिकार कोणालाही नाही.

प्रशांत भूषण यांनी आणखी एक विधान केले आहे. ते म्हणाले कि, ' काश्मीर मधून भारतीय लष्कर काढून घ्यावे. तिथे सार्वमत घ्यावे. त्यांना भारतापासून अलग व्हायचे असेल तर होऊ द्यावे.' या भूमिकेशी मी बिलकुल सहमत नाही. सार्वमत घ्यायचे असेल तर काश्मीर मध्ये प्रत्येक व्यक्ती विवेकशील राहून योग्य मतदान करील असे पाहावे लागेल. त्यासाठी तेथील हिंसा शून्य पातळीवर आली पाहिजे. ज्या प्रमाणे पूर्वी काश्मिरी पंडित व काश्मिरी मुसलमान एका काश्मिरियत या सांस्कृतिक सूत्राने एकत्र बांधले होते. तसे वातावरण तयार झाल्यावर सार्वमत घेण्यात मतलब आहे. पाकिस्तानच्या लष्कराने प्रशिक्षित केलेले धर्मांध अतिरेकी काश्मीर मध्ये पाठवून मोठ्या प्रमाणावर काश्मिरी पंडितांचा व काश्मिरी लोकांचा बळी घेतला आहे. या पाकिस्तानी अतिरेक्याचे छुपे हल्ले चालूच आहेत. अशा परिस्थितीत सार्वमत घेणे गैर होईल. वाघ आणि शेळी यांच्या एकत्र राहण्याबद्दल जर सार्वमत घेतले तर काय परिणाम होईल ? शिवाय सार्वमताचा मुद्दा संयुक्त रास्थ्र संघाने संदर्भ हीन झाला असल्याचे मान्य केले आहे. पाकिस्तानचे लष्कर जो पर्यंत घुसखोरी करीत आहे तो पर्यंत भारतीय लष्कराने काश्मिरी भूमीवर उभे राहण्यात काहीही गैर नाही. या गोष्टी सूर्यप्रकाशा इतक्या स्पष्ट असताना प्रशांत भूषण विपरीत, विचित्र आणि विक्षिप्त भूमिका का घेत असावेत या बद्दल एकाच अंदाज करता येतो. विद्वत्तेच्या आधारे पोकळीमध्ये विद्वान माणसांना साक्षात्कार होतात हा भ्रम त्यांच्या मनात असावा. म्हणून विचारवंतांना झालेले दर्शन एकांगी असण्याची शक्यता असते. ते वैचारिक कसरती करतील पण सत्याला, सत्याच्या सर्व बाजू पाहण्यासाठी सत्याला प्रदिक्षणा घालणार नाहीत. अर्थात त्यांच्या बरोबर तीव्र वैचारिक मतभेत राखूनही त्यांच्यावरच्या शारीरिक हल्ल्याच्या मी त्रिवार निषेध करतो. 

Wednesday 5 October 2011

महात्मा या शब्दाचे अवमूल्यन व थिल्लरीकरण होऊ नये एवढीच अपेक्षा...


महात्मा हि पदवी भारतीय इतिहासातील सर्वात मोठी पदवी आहे. ती सर्वात अधिक लोकमान्यतेचे प्रतिक आहे. २६०० वर्षापूर्वी भगवान गौतम बुद्धापुढे त्यांना महात्मा पदवी देण्याचा प्रस्ताव आला होता. त्यांनी तो प्रस्ताव फेटाळला. महात्मा म्हणवून घेण्यास नकार दिला. महात्मा हा जनतेने दिलेला जीवन गौरव पुरस्कार आहे. मुलभूत परिवर्तन करणाऱ्यासच फक्त महात्मा म्हणतात. प्रत्येक शब्दाच्या पोटात विशिष्ट अर्थ दडलेला असतो. उदा. संत म्हणजे मानवतावादी व सभ्य माणूस, महापुरुष म्हणजे समाजाच्या किमान एका स्तराला वर आणणारा माणूस, राष्ट्रसंत म्हणजे राष्ट्रीय पातळीवर मानवतावादाचा प्रचार करणारा. तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत म्हणत. सद्या भैय्यूजी महाराजांना राष्ट्रसंत म्हणतात. परंतु महात्मा हि पदवी वा विशेषण मात्र फार थोड्या व्यक्तींसाठी राखीव आहे. महात्मा त्याला म्हणतात कि ज्याच्या कार्याच्या प्रारंभ पूर्वी असलेले सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थिती त्याच्या जीवन कार्यामुळे पूर्णतः बदललेली असते. आपला देश जाती पातींनी, सवर्ण - दलित अशा भेदा भेदांमुळे चीर्फालालेला आहे,. म्हणून तर आपला आत्मा तुकड्या तुकड्यात विखुरलेला असतो, जो आत्म्याचे fracture दुरुस्त करतो - आत्म्याचे तुकडे जोडतो, सर्व तुकड्यांमध्ये स्वत प्रवेश करतो, सर्वांचा अंश बनतो अशा आत्म्याला महान आत्मा असे म्हणतात. महान आत्मा या शब्दाचे संक्षिप्त स्वरूप म्हणजे महात्मा!


आत्ता पावेतो महात्मा गांधी व महात्मा फुले हे दोन महात्मे झाले. गौतम बुद्ध व महावीर यांना लोक भगवान म्हणू लागले. फुले यांनी स्त्रियांचा आत्मा जागविला. दलित सवर्णांची दरी कमी करून समाजाचे दोन तुकडे एकत्र जोडले. म्हणून त्यांना सत्यशोधक समाजाने महात्मा हि पदवी दिली. महात्मा गांधींनी जात, भाषा, धर्म व प्रांत यात विभागलेली, भारताच्या भूप्रदेशावर राहणारी जनता स्वतान्र्या संग्राम, सत्य - अहिंसा या तत्वाने एकत्र आणली आणि देशाचे राष्ट्रात व प्रजेचे नागरिकात रुपांतर केले. आत्मे जोडले म्हणून तो महान आत्मा.... महात्मा.


काहींना ब्रिटीश जायला नको होते, त्यांना येथेच श्रेणीबद्ध उच्चवर्णीयांचे राज्य हवे होते. ते ज्यांना दलित जाती समूह गुलामीतच राहायला हवे होते, ते ज्यांना स्त्रिया पुरुषांच्या गुलाम असाव्यात असे वाटत होते, ते ज्यांना एकाच धर्माचे राष्ट्र हवे होते अशांचा महात्मा गांधींना विरोध होता. महात्मा गांधी भारताला ज्या पद्धतीने आकार देत होते त्यामुळे त्यांच्या पारंपारिक हित संबंधाना धक्का लागणार होता. ते सर्व महात्मा गांधींचा द्वेष करीत होते, आजही करतात. ३० जानेवारी १९४७ रोजी त्यांनी गांधीजींची शारीरिक हत्या केली, पण या शक्ती गांधीजींच्या विचारांची हत्या करू शकले नाहीत, किंबहुना गांधीजींचे विचार त्यांच्या समाधीतून बाहेर येत आहेत. त्यामुळे गांधीजी पुन पुन्हा समाधीतून बाहेर येतील याचा धसका अनेकांना वाटतो. कोन्ग्रेस पक्षाच्या नेत्यांना लाज वाटते म्हणून ते महात्मा गांधींच्या विचारांची हत्या व्हावी असे स्पष्ट म्हणत नाहीत. पण त्यांनी मालमत्तेच्या नादी लागून गांधींचे कधीच विस्मरण केले आहे, 


या परिस्थितीत गांधी फक्त सामान्य भारतीय जनतेला हवे आहेत, कोणत्याही राजकीय पक्षाला नको आहेत. सत्य - अहिंसा - निर्वैरता या मुल्ल्यांचे सर्व राजकीय पक्षांनी निर्माल्य बनविले आहे. गांधीजी शरीराने अस्तीवतात नसल्याने आता परत त्यांचा खून करणार तरी कसा. म्हणून त्यांचे व त्यांच्या विचारांचे थिल्लरीकरण करण्याचा डाव आखण्यात आला आहे. या थिल्लरीकरण विरुद्ध गांधीजींच्या विचारांची श्रेष्ठता हि लढाई चालू आहे. या लढाईत आण्णा हजारेंना साधन केले जात आहे. पूर्वी किल्ल्याच्या दरवाज्याचे संरक्षण करण्यासाठी खिळे लावले जात. तो तोडण्यासाठी हत्ती त्याला धडाका मारत. हत्तींना जखमा होऊ नयेत म्हणून मध्ये उंटांना उभे करीत. तसाच आण्णांचा वापर केला जात आहे याचे मला दुख होत आहे. मनाला क्लेश होतात. 


७३ व्या घटना दुरुस्ती नंतर ग्रामसभेला खूप अधिकार मिळाले. परंतु त्या अधिकाराची मर्यादा त्या गावाच्या शिवे पर्यंत असते. एका गावाने केलेला ठराव दुसर्या गावाला लागू होत नाही. २ ऑक्टोबर रोजी राळेगण येथे अन्ना हजारेंना महात्मा म्हणावे असा ठराव पास केला. माझ्यासारख्या अनेकांना असे वाटत होते कि आण्णा अखिल भारतीय पातळीवरील व्यक्तिमत्व आहे. परंतु आमच्या भ्रमाचा भोपळा फुटला. आण्णांना फक्त गावापुरते महत्व आहे. आत्ता महाराष्ट्रात लाट येईल. ४४००० गावात स्थानिक महात्मे निर्माण होतील. गावागावात ज्वारीचे पिक येणार नाही पण महात्म्याचे पिक जोरात येईल. बारामती, अकलूज, लातूर इत्यादी गावांमध्ये महात्मा हि पदवी कोणाला मिळणार याचा अंदाज आम्हाला येतो. कारन आधीपासूनच तेथे महान माणसे आहेत. गांधीजींना त्यांच्या आश्रम वासियांनी विचारले कि बापुजी आम्ही तुम्हास महात्माजी म्हणणार आहोत. चंपारण्य च्या लढ्यापासून जनता तुम्हाला महात्मा म्हणतेच, मग आम्हाला हि संधी का नाही. तेंवा गांधीजीनी जे उत्तर दिले ते सर्व भारत वासियांनी लक्षात ठेवण्यासारखे आहे. ते म्हणाले " माणूस हा भगवान आही सैतान अशा दोन्ही प्रवृत्तीचे मिश्रण आहे, त्यामुळे आयुष्यभर देवासारखे वागला आणि अखेरच्या काळात अध पतित झाला असे घडू शकते. म्हणून केवळ मृतुच ठरवू शकतो कि तो महात्मा आहे किंवा नाही? मी मेल्याशिवाय माझा जय जय कर करायचा कि नाही याचा निर्णय घेऊ नये." त्यावर आश्रम वासीय म्हणाले, " बापुजी, तुम्ही नवे राष्ट्र जन्माला घालणार राष्ट्रपिता आहात म्हणून आम्ही तुम्हाला महात्मा म्हणू इच्छितो." त्यावर बापुजी म्हणाले, " राष्ट्र निर्मितीची प्रक्रिया हि दीर्घकाळ चालणारी आहे. हिंदू - मुस्लीम ऐक्य हा भारत नावाच्या आधुनिक राष्ट्राचा गाभा आहे. म्हणून मी जर माझ्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासाच्या वेळी "हे राम - हे रहीम" असे उद्गार काढू शकलो तर माझ्या मृतू नंतर मला महात्मा म्हणणे संयुक्तिक ठरेल. 


नथुराम गोडसेने निशस्त्र अश्या ७९ वर्षाच्या वृद्ध व्यक्ती वर गोळ्या झाडल्या. पहिली गोळी छातीत घुसली त्यावेळी गांधींच्या तोंडून " हे राम ..." हे उद्गार निघाले. नंतर नथुराम ने दुसरी गोळी घातली. त्यावेळी गांधीजींचा आवाज क्षीण झाला होता.. ते खाली कोसळले होते. त्यावेळी त्यांच्या तोंडून शब्द आहे " हे रहीम.." म्हणून ते पूर्ण महात्मा ठरले. महात्मा या शब्दाचे अवमूल्यन व थिल्लरीकरण होऊ नये एवढीच अपेक्षा...!