Tuesday 6 March 2012

५ राज्यांमधील निवडणुकांचे निकाल



५ राज्यांमधील निवडणुकांचे निकाल 

२६ फेब्रुवारी रोजी परिवर्तनवादी युवक संमेलन पार पडले त्यातून बर्याच सकारात्मक गोष्टी कळल्या. निवडणुका पाहून ज्यांचे मन विषन्न होते अशांना आक्रमक अहिंसा, सत्य, अन्याय व भ्रष्टाचार मुक्त समाज असे शब्द कानावर पडल्यानंतर जणू रणरणत्या उन्हात वळवाच्या पावसाच्या लहरी याव्यात असे अनेकांना वाटले. 

त्यांनतर आले निवडणुकीचे निकाल निकाल ऐकून असे वाटले कि, युक्रांदला मिळणारा प्रतिसाद हा वळवाचा पाउस नसून हा तर बदलत्या काळाच्या पाऊलखुणा आहेत. उत्तरप्रदेशमध्ये मुलायमसिंग यादवांच्या समाजवादी पक्षाला, गोव्यामध्ये भाजपला, पंजाबमध्ये अकाली दलाला व मणिपूर मध्ये कॉंग्रेस पक्षाला निर्विवाद बहुमत मिळाले आहे. उत्तराखंड राज्यात कोन्ग्रेस व भाजप यांच्यात बरोबरीची टक्कर चालू आहे. या निवडणुकीतून ज्या शक्ती उभारून आले आणि जे प्रवाह उभारून आले त्यातून भारतीय लोकशाहीचे भवितव्य उज्वल आहे असे दिसून येते. सामान्य मतदार सर्वांकडून पैसे घेतो आणि मत मात्र नीट विचार करून टाकतो. पैसे देणार्याला तो मनात नाही, म्हणून पैसा वाटून कोणी सत्ता प्राप्त करू शकेल हा समाज या निवडणुकीने खोटा ठरविला. बाबरी मस्जिद पडल्यापासून देशातील 'बॉडी पोलिटिक्स' fracture झाली आहे असे दिसते. सत्तारूढ पक्ष व विरोधी पक्ष यांच्या मध्ये राष्ट्रीय हिताच्या व समाज हिताच्या एकही बाबीवर एकमत नाही. लोकशाहीमध्ये इतका विरोधाभास चालत नाही. तत्व विचारसरानिमध्ये मतभेद आहेत म्हणून एकमत होत नाही असे मानाने चुकीचे ठरेल कारण तत्व विचारसरन्या राजकीय पक्षांनी कधीच सोडून दिल्या आहे. सार्वजनिक नितीमत्ता हि चीज राजकारणातून गायब झाली आहे. म्हणून मतभेद सच्चे नाहीत. सत्तेची स्पर्धा आहे म्हणून मतभेद आहेत. चोख कारभारासाठी स्पर्धा नाही. आजच्या निवडणुकीच्या निकालापासून काय शिकायचे? 

पहिला धडा हा शिकायला हवा कि लोकांना राजकीय स्थर्य हवे आहे म्हणून एकेका राज्यात एकाच पक्षाची सत्ता आली. राज्य पूर्ण हातात दिल्यामुळे आता कुरकुर करायला जागा नाही. घराणेशाहीचा प्रभाव दिवसेंदिवस कमी होत आहे. देशाची सत्ता एका घराण्यात होती. कारण कोन्ग्रेस पक्षाची निरंकुश सत्ता देशावर होती. आता राज्यावर स्थानिक घराणेशाही निर्माण झाली आहे. राहुल गांधी यांच्या कष्टाचा प्रभाव पडला नाही याचेही कारण आहे. ते उत्तर प्रदेशातील राजघराण्यातील लोकांना घेऊन फिरत होते. बसपा हा पक्ष मुळात सरंजामशाहीच्या विरोधात दलित जनतेचा उठाव होता. युपी मध्ये राहुल गांधी राजे राजवाड्यांना सोबत घेऊन लोकांच्या मनात प्रवेश करू शकले नाहीत. जुन्या राज घराण्यांना नकार देणे हे लोकशाहीच्या प्रगतीचे लक्षण  आहे. राहुल गांधी यांना व्यक्तिश: लोकांचा नकार नाह्वता. मायावती यांचा बसपा फक्त जातीय अस्मितांचा वापर करून सत्ता प्राप्त करणारा पक्ष आहे. जणू जातीय अस्मिता ही कर्तव्यदक्षता, नितीमत्ता, प्रामाणिकपणा, सार्वजनिक चारित्र्य यांच्या पेक्षा महान गोष्ट आहे.  जातीय अस्मिता जागृत असून सुद्धा मायावतीच्या राजकीय वर्तनाचा राग लोकांनी व्यक्त केला आहे. मायावतीचा आत्मकेंद्री व भ्रष्टाचारीपानाची लोकांना शिसारी आली. मुलायम सिंग यादव हे डॉ. लोहिया याचे शिष्य. त्यांचे नेतृत्व चळवळीतून वर आलेले आहे. जेह्वा मुस्लीम मतदार व भांडवल्दारांसारखे अमरसिंग सारखे दलाल यांच्या पैकी एकाची निवड करण्याची वेळ आली असताना मुलायम सिंग यांनी मुस्लीम मतदारांची निवड केली. बाबरी मस्जिद पडण्याचा एक प्रयत्न त्यांनी मुख्यमंत्री असताना हाणून पडला होता. मायावती या अगोदर मुलायमसिंग बरोबर होत्या परंतु नंतर त्या भाजप बरोबर गेल्या. मुलायम सिंगनी आपली भूमिका उठल्पानाने कधीही बदलली नाही, त्यामुळे मायावती यांना नकार द्यायची मानसिकता तयार झाली त्यावेळी समाजवादी पास्खाशिवाय अन्य कोणताही पर्याय नाह्वता. जेवढ्या जागा बसपाच्या कमी झाल्या तेवढ्याच जागा समाजवादी पार्टीच्या वाढल्या आहेत.


पंजाबचे निकाल पहा. अकाली दल हा जात शेतकऱ्यांचा पक्ष आहे. देशातील राजकीय प्रवाह असा दिसतोय कि मधल्या जातीचे नेते सत्तेकडे खुच करीत आहेत. जातीय समीकरणाच्या नावाखाली मध्यम जातीचा नेता आणि सवर्णांचे शेपूट हा फोर्मुला यशस्वी ठरतो आहे. हाच फोर्मुला मायावती यांनी वापरला होता. दलित अस्मितेला ब्राह्मण जातीचे शेपूट चिकटविले. पंजाब मध्ये जाटांच्या सत्तेला भाजपच्या बनियाचे शेपूट आहे. तसेच बिहार मध्ये नितीश कुमार यांच्या मंडलांकित जातीसमुहाला भाजपच्या बनियांचे शेपूट आहे. जातीय समीकरणांचा सूर्य मावळतीला लागला आहे. हा संदेश हि निवडणूक देत आहे. एकाच सत्तेच्या आघाडीतील दोन पक्ष एकमेकांवर थुंकत, लाथा मारीत राज्य करू शकणार नाहीत म्हणून लोकांनी आघाडी एवजी एकाच पक्षाला बहुमत दिले आहे. महाराष्ट्रात सत्तेत एकत्र बसणारे आघाडीतील दोन पक्ष जाहीररित्या कुत्र्या मांजरा प्रमाणे एकमेकांना चावा घेवू लागले तर त्या दोघांचे राज्य लोक नाकारतील. 

मणिपूर येथे नागा अतिरेक्यांनी उच्छाद मांडला आहे. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा गेली काही महिने बंद होता. याची प्रतिक्रिया म्हणून लोकांनी राज्य सरकारपेक्षा अधिक समर्थ असलेल्या केंद्र सरकारला मत दिले आहे.  म्हणून तेथे कॉंग्रेसचे सरकार आले आहे. 

गोवा या भूमीवर सारस्वत ब्राह्मणांचे वर्चस्व राहिले आहे. ख्रीश्चानांमधील जे प्रभावी नेते आहेत ते देखील पूर्वाश्रमीचे ब्राह्मण आहेत. भाजपने ख्रिश्चन विरोधी प्रचार गोव्यात फार पूर्वीपासून चालविलेला आहे. गोवा हि संघाची प्रयोगशाळाच आहे. त्यांच्या पक्षाची सत्ता असताना त्यांनी शिक्षण क्षेत्र काबीज केले आहे. शिक्षण क्षेत्रात ते हिंदुत्वाचा विचार रुजावितात. पूर्वी गोवा हे धार्मिक सलोख्याचे आदर्श राज्य मानले जायचे. द्वेषमुलक प्रचारामुळे त्यात आता बदल झाला आहे. शिवाय कोन्ग्रेस च्या नेत्यांची प्रतिमा भ्रष्टाचाराने कलंकित झालेली आहे. कोन्ग्रेस चे माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाव हि व्यक्ती डॉन आहे हे सर्वांना ठावूक आहे. कोन्ग्रेस ला राजे राजवाडे आणि डॉन, भ्रष्टाचारी यांचा त्याग केल्याशिवाय फार भवितव्य नाही.

उत्तरखंड मध्ये जेथे साधू, संत, बाबा, महाराज यांचा ज्या भागात प्रभाव आहे तेथे भाजपचे मतदान वाढलेले दिसते.  योग गुरु बाबा रामदेव हे त्याच भागातले. परंतु तेही गढवाल व हिमालयाच्या कुशीत राहणाऱ्या लोकांनी कॉंग्रेसला मतदान केलेले दिसते. 

या निवडणुकीचा परिणाम लोकसभा निवडणुकीवर निशिचीतच होणार. सपा व कोन्गेस राजकीय दृष्ट्या एकत्र आले तर स्थिर केंद्र सरकार तयार होऊ शकते. संपूर्ण भारतावर आपलेच राज्य असावे हा विचार कोन्ग्रेस ला सोडून द्यावा लागणार. भगवान गौतम बुद्धापासून भारतीय राजकारणाचा दाखला असा आले कि, डावीकडे झुकलेल्या मध्यम मार्गाने जो राजकीय वाटचाल करील तोच यशस्वी होईल. जेह्वा कोन्ग्रेस संरंजामदार वा भांडवलदारांकडे झुकलेली असेल तेंवा ती यशस्वी होऊ शकणार नाही.