Saturday 10 December 2011

भारत महान देश आहे!


संसदीय लोकशाहीची वैशिष्ठे समजून घेणे प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे. लोकशाही प्रणालीत दुसर्याला वैरी मानणे, दुसर्याचा सन्मान ना कबूल करणे, धमक्या, शिवीगाळ, आक्रमक भाषा या गोष्टी वर्ज असतात. मानवी विकासाचा वा मानवाच्या संस्कृतीच्या उत्क्रांतीमध्ये सर्वाधिक उत्क्रांत झालेली राजकीय प्रणाली म्हणजे लोकशाही! भविष्यात लोकशाही पेक्षाही अधिक सुसंस्कृत व उन्नत राजकीय प्रणाली उदयाला येवू शकेल पण आज मात्र लोकशाही हीच केवळ उन्नत प्रणाली आहे. लोकशाही व्यवस्था कितीही बिघडली तरी तिला उपचार म्हणून लोकशाहीचाच अधिक डोस द्यावा लागतो. उदा. पं. इंदिरा गांधी यांनी देशातली लोकशाही रद्दबातल केली होती, परंतु ५ लाख लोकांनी सत्याग्रह करून कारावास भोगला, क्लेश सहन करून जनतेला लोकशाहीचे महत्व पटवून दिले त्यामुळे १९७७ साली लोकशाहीची पुन्हा स्थापना झाली. हुकुमशाहीच्या प्रणालीत असे घडत नाही. हुकुमशाही घालविण्यासाठी रक्तपात करणे अपरिहार्य असते. हुकुमशाहीचा अंत हुमुंशाहाचा अंत झाला तरच होतो. लोकशाहीची गम्मत हि आहे कि, इंदिरा गांधीच्या विरोधकांनी तिच्यावर हिंसक हल्ला केला नाही आणि इंदिरा गांधींनी देखील सत्ता सोडताना हिंसाचाराचा मार्ग अवलंबला नाही. विरोधकांना गोळ्या घातल्या नाहीत. हि लोकशाहीच्या सभ्यतेची कीर्ती आहे. जगातल्या प्रत्येक हुकुमाशाहाचा मृत्यू झाल्यानंतरच हुकुमशाहीचा अंत झाला आहे.

जो कोणी अन्य लोकांचा सन्मान मनोमनी कबूल करतो, तोच लोकशाही मध्ये सन्मानास पात्र होतो. आण्णा हजारे अन्य कोणाचाच सन्मान काबुल करीत नाहीत. प्रत्येक विरोधकाला वैरी मानतात, स्वतःच्या काम्पुमधील गुंड व भ्रष्ट प्रवृत्तीच्या लोकांवर पांघरून घालतात. मी त्यांचा मान ठेवून त्यांनी या दोषातून मुक्त व्यावे अशी त्यांना विनंती करतो. त्यांनी आक्रोश करून देशामध्ये वैरात्वाचे वातावरण वाढवू नये. त्यांना भ्रष्टाचाराचे निर्मुलन करायचे आहे कि कोणाच्या वतीने कोणाला गारद करायचे आहे कि काय अशी शंका येते. अण्णा हजारे यांचा मी मन: पूर्वक सन्मान करतो; पण  त्यांच्या चुका दाखविण्यात मी कचरलो तर तो माझा दोष असेल असे मला वाटते. लोकशाही मध्ये सर्वांना अभय वाटले पाहिजे. 

लोकपाल बिल लोकसभेत येणारच नाही असा आक्रोश चालू होता. पण ते बिल संसदेमध्ये मांडण्यात आले आहे. आता भाजप सारख्या विरोधी पक्षाने आपल्या बौद्धिक कौशल्याने सभागृहाला पटवून त्या कायद्याला आकार द्यायचा आहे. पण ते जबाबदारीपासून पलायन करीत आहेत. संसदेवर रोज बहिष्कार टाकल्याने भाजप लोकप्रिय होत आहे असे मानण्याचे कारण नाही. 

जुन्या जमान्यात 'सिकंदर दि ग्रेट' असा एक विक्प्रचार होता. सध्या 'अण्णा दि ग्रेट' असा वाक्प्रचार रुजू लागला आहे. अण्णांच्या मागे भाजप जय्यत तयारीनिशी उभा आहे. व्यापारी वर्गांच्या हातातला अण्णा हा 'थ्रो बॉल' आहे. त्यासाठी व्यापारी वर्ग कितीही पैसा खर्च करायला तयार आहे. फक्त त्यांना भेसळ, मापात गडबड, शेतकऱ्यांचे दलालांमार्फत शोषण आणि ग्राहकांची फसवणूक या बाबतीत अण्णांनी वरदान दिले पाहिजे. अण्णांनी म. गांधीना सोडले आणि शिवाजी महाराजांना पकडले तर ते मराठ्यांपेक्षा ब्राह्मणांमध्ये अधिक प्रिय होतील. कारण ते आपली लढाई शिवाजी महाराजांच्या आडूनच करीत असतात. शिवाजी महाराज आणि म. गांधी आपापल्या काळातले महापुरुष आहेत. अण्णांच्या बोलण्यामुळे संभ्रम निर्माण होत आहे. म. गांधी आणि शिवाजी महाराज एकाच काळाची अपत्ये आहेत असे वाटू लागते. काळाचे संधर्भ महत्वाचे असतात. रा, स्व. संघाचे लोक म्हणतात कि "शिवाजी महाराज विचार - विनिमय अश्या भानगडीत पडत नसत. ते सरळ शाहिस्तेखानची बोटे कापत आणि अफजल खानाचा कोथळा बाहेर काढत." संघाला भूतकाळ वर्तमान काळावर लादायचा आहे. नथुराम गोडसेचा हिंसाचार आणि नरेंद्र मोदीचा नरसंहार याचे समर्थन करायचे आहे. अण्णा शिवाजीचे अवतार आहेत हा भ्रम पसरविल्या नंतर मराठा समाज हिंदुत्ववादी होण्याची शक्यता वाढते. आणि मराठा समाज हिंदुत्ववादी होणे म्हणजे ब्राह्मणांचे वर्चस्व मान्य करणे आहे. म्हणूनच अण्णा ब्राह्मण प्रिय होत आहेत आणि ते गो ब्राह्मण प्रतिपालक आहेत असा गोड गैरसमज ब्राह्मणांनी करून घेतला आहे. पण आता शिवाजी महाराजांवर संसदीय लोकशाही आणि म. गांधीचे विचार याचा परिणाम होवून त्यांनी त्या काळात तसे वर्तन केले असते असा विचार हे बालबुद्धीचे लक्षण आहे. याचा अर्थ शिवाजी महाराजांनी संसदेमध्ये शाहिस्तेखान व अफजल खान यांच्या विरोधात अगदी जन लोकपाल बिलाच्या शैलीत कायदा संमत केला असे म्हनाण्याचेही लोक धाडस करतील. त्याचप्रमाणे म. गांधी तालावर घेवून, घोड्यावर बसून ब्रिटीश राज्यकर्ते अंधारात, गाढ निद्रेत असतात गांधी सपासप वार करीत आहेत. आणि ब्रिटीश जागे होण्याच्या आधी निघून जात आहेत असेही संघवाले उद्या सांगू शकतील. त्यांच्या व अण्णांच्या दुर्दैवाने अनंत लोक बाल बुद्धीचे नाहीत म्हणूनच म्हणायचे आहे कि, भारत महान देश आहे! 

2 comments:

  1. very well.. I fully agree with u Sir

    ReplyDelete
  2. good one?????????
    totally bias
    where was this man hiding when our politicians were commenting rudly and some time shamelessly against every one and specialy against "AAM JANATA" insulting them again and again
    Hope you will have you eye on them as well Dr. Saptarshi.
    and you will try to teach them the meaning of Democracy as well -----

    ReplyDelete