Tuesday, 6 March 2012

५ राज्यांमधील निवडणुकांचे निकाल



५ राज्यांमधील निवडणुकांचे निकाल 

२६ फेब्रुवारी रोजी परिवर्तनवादी युवक संमेलन पार पडले त्यातून बर्याच सकारात्मक गोष्टी कळल्या. निवडणुका पाहून ज्यांचे मन विषन्न होते अशांना आक्रमक अहिंसा, सत्य, अन्याय व भ्रष्टाचार मुक्त समाज असे शब्द कानावर पडल्यानंतर जणू रणरणत्या उन्हात वळवाच्या पावसाच्या लहरी याव्यात असे अनेकांना वाटले. 

त्यांनतर आले निवडणुकीचे निकाल निकाल ऐकून असे वाटले कि, युक्रांदला मिळणारा प्रतिसाद हा वळवाचा पाउस नसून हा तर बदलत्या काळाच्या पाऊलखुणा आहेत. उत्तरप्रदेशमध्ये मुलायमसिंग यादवांच्या समाजवादी पक्षाला, गोव्यामध्ये भाजपला, पंजाबमध्ये अकाली दलाला व मणिपूर मध्ये कॉंग्रेस पक्षाला निर्विवाद बहुमत मिळाले आहे. उत्तराखंड राज्यात कोन्ग्रेस व भाजप यांच्यात बरोबरीची टक्कर चालू आहे. या निवडणुकीतून ज्या शक्ती उभारून आले आणि जे प्रवाह उभारून आले त्यातून भारतीय लोकशाहीचे भवितव्य उज्वल आहे असे दिसून येते. सामान्य मतदार सर्वांकडून पैसे घेतो आणि मत मात्र नीट विचार करून टाकतो. पैसे देणार्याला तो मनात नाही, म्हणून पैसा वाटून कोणी सत्ता प्राप्त करू शकेल हा समाज या निवडणुकीने खोटा ठरविला. बाबरी मस्जिद पडल्यापासून देशातील 'बॉडी पोलिटिक्स' fracture झाली आहे असे दिसते. सत्तारूढ पक्ष व विरोधी पक्ष यांच्या मध्ये राष्ट्रीय हिताच्या व समाज हिताच्या एकही बाबीवर एकमत नाही. लोकशाहीमध्ये इतका विरोधाभास चालत नाही. तत्व विचारसरानिमध्ये मतभेद आहेत म्हणून एकमत होत नाही असे मानाने चुकीचे ठरेल कारण तत्व विचारसरन्या राजकीय पक्षांनी कधीच सोडून दिल्या आहे. सार्वजनिक नितीमत्ता हि चीज राजकारणातून गायब झाली आहे. म्हणून मतभेद सच्चे नाहीत. सत्तेची स्पर्धा आहे म्हणून मतभेद आहेत. चोख कारभारासाठी स्पर्धा नाही. आजच्या निवडणुकीच्या निकालापासून काय शिकायचे? 

पहिला धडा हा शिकायला हवा कि लोकांना राजकीय स्थर्य हवे आहे म्हणून एकेका राज्यात एकाच पक्षाची सत्ता आली. राज्य पूर्ण हातात दिल्यामुळे आता कुरकुर करायला जागा नाही. घराणेशाहीचा प्रभाव दिवसेंदिवस कमी होत आहे. देशाची सत्ता एका घराण्यात होती. कारण कोन्ग्रेस पक्षाची निरंकुश सत्ता देशावर होती. आता राज्यावर स्थानिक घराणेशाही निर्माण झाली आहे. राहुल गांधी यांच्या कष्टाचा प्रभाव पडला नाही याचेही कारण आहे. ते उत्तर प्रदेशातील राजघराण्यातील लोकांना घेऊन फिरत होते. बसपा हा पक्ष मुळात सरंजामशाहीच्या विरोधात दलित जनतेचा उठाव होता. युपी मध्ये राहुल गांधी राजे राजवाड्यांना सोबत घेऊन लोकांच्या मनात प्रवेश करू शकले नाहीत. जुन्या राज घराण्यांना नकार देणे हे लोकशाहीच्या प्रगतीचे लक्षण  आहे. राहुल गांधी यांना व्यक्तिश: लोकांचा नकार नाह्वता. मायावती यांचा बसपा फक्त जातीय अस्मितांचा वापर करून सत्ता प्राप्त करणारा पक्ष आहे. जणू जातीय अस्मिता ही कर्तव्यदक्षता, नितीमत्ता, प्रामाणिकपणा, सार्वजनिक चारित्र्य यांच्या पेक्षा महान गोष्ट आहे.  जातीय अस्मिता जागृत असून सुद्धा मायावतीच्या राजकीय वर्तनाचा राग लोकांनी व्यक्त केला आहे. मायावतीचा आत्मकेंद्री व भ्रष्टाचारीपानाची लोकांना शिसारी आली. मुलायम सिंग यादव हे डॉ. लोहिया याचे शिष्य. त्यांचे नेतृत्व चळवळीतून वर आलेले आहे. जेह्वा मुस्लीम मतदार व भांडवल्दारांसारखे अमरसिंग सारखे दलाल यांच्या पैकी एकाची निवड करण्याची वेळ आली असताना मुलायम सिंग यांनी मुस्लीम मतदारांची निवड केली. बाबरी मस्जिद पडण्याचा एक प्रयत्न त्यांनी मुख्यमंत्री असताना हाणून पडला होता. मायावती या अगोदर मुलायमसिंग बरोबर होत्या परंतु नंतर त्या भाजप बरोबर गेल्या. मुलायम सिंगनी आपली भूमिका उठल्पानाने कधीही बदलली नाही, त्यामुळे मायावती यांना नकार द्यायची मानसिकता तयार झाली त्यावेळी समाजवादी पास्खाशिवाय अन्य कोणताही पर्याय नाह्वता. जेवढ्या जागा बसपाच्या कमी झाल्या तेवढ्याच जागा समाजवादी पार्टीच्या वाढल्या आहेत.


पंजाबचे निकाल पहा. अकाली दल हा जात शेतकऱ्यांचा पक्ष आहे. देशातील राजकीय प्रवाह असा दिसतोय कि मधल्या जातीचे नेते सत्तेकडे खुच करीत आहेत. जातीय समीकरणाच्या नावाखाली मध्यम जातीचा नेता आणि सवर्णांचे शेपूट हा फोर्मुला यशस्वी ठरतो आहे. हाच फोर्मुला मायावती यांनी वापरला होता. दलित अस्मितेला ब्राह्मण जातीचे शेपूट चिकटविले. पंजाब मध्ये जाटांच्या सत्तेला भाजपच्या बनियाचे शेपूट आहे. तसेच बिहार मध्ये नितीश कुमार यांच्या मंडलांकित जातीसमुहाला भाजपच्या बनियांचे शेपूट आहे. जातीय समीकरणांचा सूर्य मावळतीला लागला आहे. हा संदेश हि निवडणूक देत आहे. एकाच सत्तेच्या आघाडीतील दोन पक्ष एकमेकांवर थुंकत, लाथा मारीत राज्य करू शकणार नाहीत म्हणून लोकांनी आघाडी एवजी एकाच पक्षाला बहुमत दिले आहे. महाराष्ट्रात सत्तेत एकत्र बसणारे आघाडीतील दोन पक्ष जाहीररित्या कुत्र्या मांजरा प्रमाणे एकमेकांना चावा घेवू लागले तर त्या दोघांचे राज्य लोक नाकारतील. 

मणिपूर येथे नागा अतिरेक्यांनी उच्छाद मांडला आहे. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा गेली काही महिने बंद होता. याची प्रतिक्रिया म्हणून लोकांनी राज्य सरकारपेक्षा अधिक समर्थ असलेल्या केंद्र सरकारला मत दिले आहे.  म्हणून तेथे कॉंग्रेसचे सरकार आले आहे. 

गोवा या भूमीवर सारस्वत ब्राह्मणांचे वर्चस्व राहिले आहे. ख्रीश्चानांमधील जे प्रभावी नेते आहेत ते देखील पूर्वाश्रमीचे ब्राह्मण आहेत. भाजपने ख्रिश्चन विरोधी प्रचार गोव्यात फार पूर्वीपासून चालविलेला आहे. गोवा हि संघाची प्रयोगशाळाच आहे. त्यांच्या पक्षाची सत्ता असताना त्यांनी शिक्षण क्षेत्र काबीज केले आहे. शिक्षण क्षेत्रात ते हिंदुत्वाचा विचार रुजावितात. पूर्वी गोवा हे धार्मिक सलोख्याचे आदर्श राज्य मानले जायचे. द्वेषमुलक प्रचारामुळे त्यात आता बदल झाला आहे. शिवाय कोन्ग्रेस च्या नेत्यांची प्रतिमा भ्रष्टाचाराने कलंकित झालेली आहे. कोन्ग्रेस चे माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाव हि व्यक्ती डॉन आहे हे सर्वांना ठावूक आहे. कोन्ग्रेस ला राजे राजवाडे आणि डॉन, भ्रष्टाचारी यांचा त्याग केल्याशिवाय फार भवितव्य नाही.

उत्तरखंड मध्ये जेथे साधू, संत, बाबा, महाराज यांचा ज्या भागात प्रभाव आहे तेथे भाजपचे मतदान वाढलेले दिसते.  योग गुरु बाबा रामदेव हे त्याच भागातले. परंतु तेही गढवाल व हिमालयाच्या कुशीत राहणाऱ्या लोकांनी कॉंग्रेसला मतदान केलेले दिसते. 

या निवडणुकीचा परिणाम लोकसभा निवडणुकीवर निशिचीतच होणार. सपा व कोन्गेस राजकीय दृष्ट्या एकत्र आले तर स्थिर केंद्र सरकार तयार होऊ शकते. संपूर्ण भारतावर आपलेच राज्य असावे हा विचार कोन्ग्रेस ला सोडून द्यावा लागणार. भगवान गौतम बुद्धापासून भारतीय राजकारणाचा दाखला असा आले कि, डावीकडे झुकलेल्या मध्यम मार्गाने जो राजकीय वाटचाल करील तोच यशस्वी होईल. जेह्वा कोन्ग्रेस संरंजामदार वा भांडवलदारांकडे झुकलेली असेल तेंवा ती यशस्वी होऊ शकणार नाही. 

Saturday, 25 February 2012

परिवर्तनवादी युवक संमेलनाचे आग्रहपूर्वक निमंत्रण


माझ्या प्रिय मित्रांनो,

आज बर्‍यात कालावधीनंतर आपल्याशी संवाद साधत आहे. अनेक कामांमध्ये व्यग‘ होतो. आज सर्व मित्रांना अत्यंत आग‘हाचे निमंत्रण देत आहे. रविवार दिनांक २६ फेब्रुवारी २०१२ रोजी, सकाळी १० ते सायं. ०५ या वेळात परिवर्तनवादी युवक संमेलन आयोजित केले आहे. स्थळः महाराष्ट्र गांधी स्मारक निधी, गांधीभवन परिसर, कोथरूड, पुणे.

माझे आपणा सर्वांना आवाहन आहे की, आपण मोठ्या सं‘येने या कार्यक‘मास उपस्थित रहावे. यामागील माझी भुमिका येथे देत आहे.
गेल्या काही वर्षांपासून राजकीय क्षेत्रात रोज घसरण चालू आहे. भ‘ष्टाचारी व गुंड माणसांनी राजकीय पक्षांचा ताबा घेतला आहे. राजकीय नेत्यांचा हा भ‘म आहे की ते गुंडांना मुठीत ठेवत आहेत. वास्तविक परिस्थिती उलटी आहे. ते त्यांना आज ना उद्या कळून येईल पण तो पर्यंत वेळ गेलेली असेल. यावर उपाय एकच आहे, तो म्हणजे समाजातील सत्याग‘ही शक्तीचे जोमाने संघटन करणे आणि तरूणांच्या उर्जेला योग्य दिशेने वळन लावणे. काही महिन्यांपासून अण्णा हजारे यांचा बोलबाला वाढला त्यामुळे समाज बदलतोय असा आभासही झाला. तरूण रस्त्यावर आले. पण ऐवढे मोठे आंदोलन कालांतराने भुसभुसीत ठरले. त्यामुळे जनतेमध्ये घोर निराशा पसरली. हे होणारच होते असे मी अनेक प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगत होतो. युक्रांदने बरीच सत्याग‘ही आंदोलने केली. त्यापैकी प्रत्येक आंदोलनात यश मिळाले. त्यावरून युक्रांद या संघटनेजवळ सत्याग‘ही जनआंदोलनाचे संचित किती असेल याचा आपण अंदाज घेवू शकता. मला स्वतः ला सत्याग‘ही आंदोलनात ३८ वेळा अटक झाली. कधी १ दिवसाचा तर दीड दोन वर्षाचा कारावास भोगावा लागला. कधी ना कधी, कोणत्या तरी सत्याग‘हात अटक झालेले सुमारे एक लाख युक‘ांदिय महाराष्ट्रात आहेत. म्हणून माझी अशी धारणा आहे की, समाज व्यवस्थेत परिवर्तन करण्यासाठी तरूणांची उर्जा गोळा करावी आणि तिला सत्याग‘ही जनआंदोलनाची माहिती द्यावी. गेल्या ४८ वर्षाच्या सार्वजनिक जीवनात ज्याला राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या विचारांचा स्पर्श झाला नाही असा माणूस राजकीयदृष्टया बरोबर असू शकत नाही असा अनुभव आला आहे. मग गांधींना तरूणांकडे का नेऊ नये असा मला प्रश्‍न पडला.
महाराष्ट्र गांधी स्मारक निधी या संस्थेचा मी गेल्या पाच वर्षांपासून अध्यक्ष आहे. ही महाराष्ट्रातील गांधीवाद्यांची थोरली संस्था आहे. त्यामुळे प्रयोग करून त्यातून निष्कर्ष काढून समस्त गांधीवाद्यांचे त्यावर एकमत घडवून आणणे ही माझ्यावर नैतीक जबाबदारी आहे. माझे असे मत झाले आहे की, तरूणांनी खादी घालावी की न घालावी, चहा प्यावा की न प्यावा हे प्रश्‍न अत्यंत गौण असून त्यांनी सत्य, अहिंसा व प्रामाणिकणाची कास धरावी की नाही हा खरा वर्तमानकाळातील ऐरणीवरचा प्रश्‍न आहे. राष्ट्रपित्याने एवढे विचारधन आपल्याला दिले आहे आणि आपल्या आचरणाने आपल्यात बिंबविले आहेत. त्याचा विचार करून प्रचलित परिस्थितीवर उपाय काढता येतो.
लोकनायक हे युक्रांदचे फिलोसोफर व मार्गदर्शक होते. ते नेहमी सांगत की, लोखंड तापविले तरच त्याला नवा आकार देता येतो. देश तापविणे म्हणजे तरूणांना भ‘ष्टाचार आणि अन्यायाविरूध्द संघर्ष करण्यासाठी प्ररित करणे. आताची तरूण पिढी खूपच हुशार आहे. तिला आंतरराष्ट्रीय दृष्टीकोण आहे. तिच्या संवाद संपर्काची साधणे प्रचंड सं‘येने आहेत. पण त्यांना पोकळ बुध्दीचे ठेवून आपल्या स्वार्थासाठी त्यांचा वापर करण्याचा धंदाही जोरात चालू आहे. परिवर्तनवादी युवकांचे संमेलन घेतल्याने पुढील गोष्टी सङ्गल होतील अशी अपेक्षा व आशा आहे.
०१. गडचिरोली ते कोल्हापूर, विदर्भ, मराठरावाडा, पश्‍चिम महाराष्ट्र व कोकण या विभागातील तरूणांचा एकमेकांशी संपर्क आला व त्यांचा संवाद सुरू झाला तर त्यांचे आत्मबल वाढेल.
०२. या प्रयत्नातून एक लाख सत्यवादी व अहिंसावादी तरूणांची डिरेक्टरी तयार करावयाची आहे. त्याचा उपयोग महाराष्ट्रातील सर्व प्रामाणिक नागरिकांना करता येईल. त्यामुळे महाराष्ट्रावर पसरलेले निराशेचे सावट दूर होईल.
०३. राष्ट्रपित्याच्या महानतेचे मर्म आकलन करण्याची तरूणांची शक्ती वाढेल.

तरी माझे आपणास कळकळीचे आवाहन आहे की, आपण रविवार दिनांक २६ फेब्रुवारी 2012 रोजी गांधीभवन, कोथरूड येथे आयोजित केलेल्या परिवर्तनवादी युवक संमेलनास अवश्य उपस्थित रहावे. आपली उपस्थिती हेच आमचे आत्मबळ!

आपला,

डॉ. कुमार सप्तर्षी
 

Wednesday, 14 December 2011

वैचारिक स्पष्टतेने जुळले धागे




(15-12-2011 : 21:42:18)

दैनिक लोकमत, (सखी पुरवणी) 

जीवनाच्या संध्याकाळी हसत-खेळत एकमेकांशी चर्चा करत, गप्पा मारत आपलं आयुष्य काढावं, एवढीच माफक अपेक्षा ठेवून आम्ही एकमेकांचे जोडीदार व्हायचं ठरवलं. ‘युक्रांद’चे संस्थापक कुमार सप्तर्षी आणि त्यांच्या पत्नी ऊर्मिलाताई सांगताहेत त्यांच्या सहजीवनाच्या प्रवासाविषयी..


‘वैचारिक स्पष्टता असेल, तर नातं अलवार फुलत जातं. जीवनाच्या संध्याकाळी एकमेकांशी चर्चा करत, गप्पा मारत, हसत-खेळत आपलं आयुष्य काढावं, एवढीच माफक अपेक्षा ठेवून आम्ही एकमेकांचे जोडीदार व्हायचं ठरवलं. तेही असंच एके दिवशी गप्पा मारताना. त्या वेळी एका संघटनेत आम्ही एकत्र काम करत होतो. आम्ही दोघंही ‘युक्रांद’चे संस्थापक.


‘लग्न करायचंच आहे, मग ते अनोळखी, कधीही न पाहिलेल्या व्यक्तीबरोबर कसं करणार? तुझ्याशी केलं, तर चालेल मला. बोल, तुला काय वाटतं?’ म्हणत कुमारजींना प्रश्न विचारणार्‍या ऊर्मिलाताई ‘..माझं आयुष्य म्हणजे वादळाशी झुंज आहे. विचार कर,’ असं सांगणार्‍या कुमारजींविषयी बोलत स्वत:च्या संसाराचा पट उलगडत होत्या.


त्या सांगतात, की स्वत:च्या आयुष्याची दिशा स्पष्ट असणारे कुमारजी ‘हो’ म्हणाले तो दिवस होता- २0 मार्च १९६५. प्रत्यक्ष लग्नाची तारीख वेगळी असूनही आम्ही आजही याच दिवशी लग्नाचा वाढदिवस साजरा करतो. हे सांगताना ऊर्मिलाताई मागे मागे थेट ४0-४५ वर्षांपूर्वीच्या त्या दिवसांत जाऊन पोहोचल्या.


तो काळ होता १९६४-६५ चा. ऊर्मिलाताईंच्या घरात गांधीवादी विचारांचा प्रभाव. आई-वडील दोघेही स्वातंत्र्यसैनिक. त्यामुळे घरातील वातावरण चळवळ, विधायक काम करण्यास अनुकूल. ऊर्मिलाताई सांगतात, ‘‘मुलगी म्हणून तुला हे करता येणार नाही, असं माझ्या घरात कधी झालं नाही. मी फग्यरुसन महाविद्यालयात शिकत होते त्याचबरोबर समाजासाठी काही विधायक काम करण्यासाठीच्या ग्रुपमध्येही हिरिरीने भाग घेत होते. ‘मनोहर’ मासिकाने आयोजित केलेल्या एका सर्वेक्षणानंतर पुण्यातील महाविद्यालयांतून ४0-५0 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. त्यांना एकत्र आणून विविध विषयांवर वाद-विवाद, चर्चा यांतून सामाजिक काम करणारी एक टीम उभी राहावी अशी कल्पना. यात ऊर्मिलाताई सहभागी झाल्या होत्या आणि येथेच त्यांची कुमार सप्तर्षी या तरुणाशी ओळख झाली. 


त्या सांगतात, ‘‘त्या वेळी व्यवसायाने डॉक्टर होणारा, जातपात न मानणारा, विविध चळवळी आणि विधायक काम करायचं म्हणजे नक्की काय करायचं, याबाबत वैचारिक स्पष्टता असणारा हा तरुण मला जीवनसाथी म्हणून योग्य वाटला. खेडेगावात जाऊन दवाखाने, रस्ते, आरोग्य, शेतीचे प्रश्न आदि कामांत आम्ही सहभागी होऊ लागलो. त्यापैकी चार ते पाच जणांचा ग्रुप बनला.’’ सारे ऊर्मिलाताईंच्या घरी जमत. चर्चा होत. ऊर्मिलाताई सांगतात, ‘‘आपल्या वाक्चातुर्याने सर्वांची मने जिंकणार्‍या कुमारने आमच्या घरातल्यांचे विशेषत: माझ्या आईचे मन कधीच जिंकले होते; पण आंतरजातीय विवाह असल्याने कुमारजींच्या घरून लग्नाला विरोध झाला. त्या वेळी गाजावाजा व कोणतीही उधळपट्टी न करता म्हणजे १0 मे १९६९ मध्ये आम्ही रजिस्टर पद्धतीने लग्न केले. घरी गेलो, आशीर्वाद घेतला. सुखी राहा म्हणत घरच्यांनी निरोप दिला. लग्न केले त्याच रात्री घराचा प्रश्न निर्माण झाला. त्या रात्री मित्राकडे राहिलो. एकमेकांना पूर्णपणे वैचारिक आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य देत छोटेखानी जागेत आमचा स्वतंत्र संसार सुरू झाला.’’ 


कुमारजी सांगतात, लग्नाचा निर्णय घेण्यापूर्वी आम्ही एस. एम. जोशी यांना कल्पना दिली होती. त्यांनी सांगितले, की तू डॉक्टर आहेस. स्वत:च्या पैशातून तुम्हा दोघांना पुरेसे होईल असे घर घे. नंतर खुशाल समाजकार्यासाठी स्वत:ला वाहून घे. सुरुवातीला भाड्याच्या जागेत एकाच ठिकाणी पार्टिशन करून घर आणि दवाखाना सुरू केला. प्रॅक्टिस जोरात सुरू होती; पण मन समाज आणि विधायक कामांकडे धाव घेत होते. जे गरजेचं नाही ते घ्यायचं नाही, याबाबत आम्हा दोघांमध्ये एकमत होतं. अखेरीस त्याकाळी ४0 हजार रुपये किमतीचं स्वत:चं घर घेतलं. ते ऊर्मिलाच्या नावे केलं. त्यानंतर मी समाजकार्यासाठी पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून वाहून घेतलं. ‘उंबर्‍याच्या बाहेरचा पैसा घरात आणायचा नाही आणि घरातील पैसा बाहेर न्यायचा नाही,’ या विचाराशी पक्के राहून काम केले. 


मी एम.एस्सी., एल.एल.बी., पीएच.डी.(टिश्यू कल्चर) आहे. तेव्हा मी नोकरी करत होते. ‘रांधा, वाढा, उष्टी काढा’ यापुरती मी कधीच र्मयादित राहिले नाही. कुमारजींनीही, ‘तुला ठरवायचंय मूल कधी होऊ द्यायचंय ते ठरवं असं सांगून मला मातृत्वाचं स्वातंत्र्य दिलं. लग्नानंतर दहा वर्षांनी मी आई होण्याचा निर्णय घेतला. मुलाला वाढवतानाही आम्ही निकोप दृष्टिकोन ठेवला. त्याला त्याच्या वयाच्या १८व्या वर्षी जात-धर्म स्वीकारण्याचं स्वातंत्र्य दिलं. 


युथ ऑर्गनायझेशन, ‘युक्रांद’ची स्थापना, त्यानंतर आमदार, सत्याग्रही मासिकाचा संपादक, ग्रामीण भागातील शिक्षण संस्थेचा प्रमुख, वक्ता, लेखक अशा विविध टप्प्यांवर प्रवास सुरू होता. या काळात अनेक वेळा संघर्षमय परिस्थिती निर्माण झाली. घरावर हल्लेही झाले; पण नेहमीच एकमेकांचा आदर जपल्याने आणि वैचारिक बैठक पक्की असल्याने सहजीवनाचा प्रवास आनंदमय झाला आहे. - उर्मिलाताई सांगतात.


- पल्लवी धामणे-रेखी

Saturday, 10 December 2011

भारत महान देश आहे!


संसदीय लोकशाहीची वैशिष्ठे समजून घेणे प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे. लोकशाही प्रणालीत दुसर्याला वैरी मानणे, दुसर्याचा सन्मान ना कबूल करणे, धमक्या, शिवीगाळ, आक्रमक भाषा या गोष्टी वर्ज असतात. मानवी विकासाचा वा मानवाच्या संस्कृतीच्या उत्क्रांतीमध्ये सर्वाधिक उत्क्रांत झालेली राजकीय प्रणाली म्हणजे लोकशाही! भविष्यात लोकशाही पेक्षाही अधिक सुसंस्कृत व उन्नत राजकीय प्रणाली उदयाला येवू शकेल पण आज मात्र लोकशाही हीच केवळ उन्नत प्रणाली आहे. लोकशाही व्यवस्था कितीही बिघडली तरी तिला उपचार म्हणून लोकशाहीचाच अधिक डोस द्यावा लागतो. उदा. पं. इंदिरा गांधी यांनी देशातली लोकशाही रद्दबातल केली होती, परंतु ५ लाख लोकांनी सत्याग्रह करून कारावास भोगला, क्लेश सहन करून जनतेला लोकशाहीचे महत्व पटवून दिले त्यामुळे १९७७ साली लोकशाहीची पुन्हा स्थापना झाली. हुकुमशाहीच्या प्रणालीत असे घडत नाही. हुकुमशाही घालविण्यासाठी रक्तपात करणे अपरिहार्य असते. हुकुमशाहीचा अंत हुमुंशाहाचा अंत झाला तरच होतो. लोकशाहीची गम्मत हि आहे कि, इंदिरा गांधीच्या विरोधकांनी तिच्यावर हिंसक हल्ला केला नाही आणि इंदिरा गांधींनी देखील सत्ता सोडताना हिंसाचाराचा मार्ग अवलंबला नाही. विरोधकांना गोळ्या घातल्या नाहीत. हि लोकशाहीच्या सभ्यतेची कीर्ती आहे. जगातल्या प्रत्येक हुकुमाशाहाचा मृत्यू झाल्यानंतरच हुकुमशाहीचा अंत झाला आहे.

जो कोणी अन्य लोकांचा सन्मान मनोमनी कबूल करतो, तोच लोकशाही मध्ये सन्मानास पात्र होतो. आण्णा हजारे अन्य कोणाचाच सन्मान काबुल करीत नाहीत. प्रत्येक विरोधकाला वैरी मानतात, स्वतःच्या काम्पुमधील गुंड व भ्रष्ट प्रवृत्तीच्या लोकांवर पांघरून घालतात. मी त्यांचा मान ठेवून त्यांनी या दोषातून मुक्त व्यावे अशी त्यांना विनंती करतो. त्यांनी आक्रोश करून देशामध्ये वैरात्वाचे वातावरण वाढवू नये. त्यांना भ्रष्टाचाराचे निर्मुलन करायचे आहे कि कोणाच्या वतीने कोणाला गारद करायचे आहे कि काय अशी शंका येते. अण्णा हजारे यांचा मी मन: पूर्वक सन्मान करतो; पण  त्यांच्या चुका दाखविण्यात मी कचरलो तर तो माझा दोष असेल असे मला वाटते. लोकशाही मध्ये सर्वांना अभय वाटले पाहिजे. 

लोकपाल बिल लोकसभेत येणारच नाही असा आक्रोश चालू होता. पण ते बिल संसदेमध्ये मांडण्यात आले आहे. आता भाजप सारख्या विरोधी पक्षाने आपल्या बौद्धिक कौशल्याने सभागृहाला पटवून त्या कायद्याला आकार द्यायचा आहे. पण ते जबाबदारीपासून पलायन करीत आहेत. संसदेवर रोज बहिष्कार टाकल्याने भाजप लोकप्रिय होत आहे असे मानण्याचे कारण नाही. 

जुन्या जमान्यात 'सिकंदर दि ग्रेट' असा एक विक्प्रचार होता. सध्या 'अण्णा दि ग्रेट' असा वाक्प्रचार रुजू लागला आहे. अण्णांच्या मागे भाजप जय्यत तयारीनिशी उभा आहे. व्यापारी वर्गांच्या हातातला अण्णा हा 'थ्रो बॉल' आहे. त्यासाठी व्यापारी वर्ग कितीही पैसा खर्च करायला तयार आहे. फक्त त्यांना भेसळ, मापात गडबड, शेतकऱ्यांचे दलालांमार्फत शोषण आणि ग्राहकांची फसवणूक या बाबतीत अण्णांनी वरदान दिले पाहिजे. अण्णांनी म. गांधीना सोडले आणि शिवाजी महाराजांना पकडले तर ते मराठ्यांपेक्षा ब्राह्मणांमध्ये अधिक प्रिय होतील. कारण ते आपली लढाई शिवाजी महाराजांच्या आडूनच करीत असतात. शिवाजी महाराज आणि म. गांधी आपापल्या काळातले महापुरुष आहेत. अण्णांच्या बोलण्यामुळे संभ्रम निर्माण होत आहे. म. गांधी आणि शिवाजी महाराज एकाच काळाची अपत्ये आहेत असे वाटू लागते. काळाचे संधर्भ महत्वाचे असतात. रा, स्व. संघाचे लोक म्हणतात कि "शिवाजी महाराज विचार - विनिमय अश्या भानगडीत पडत नसत. ते सरळ शाहिस्तेखानची बोटे कापत आणि अफजल खानाचा कोथळा बाहेर काढत." संघाला भूतकाळ वर्तमान काळावर लादायचा आहे. नथुराम गोडसेचा हिंसाचार आणि नरेंद्र मोदीचा नरसंहार याचे समर्थन करायचे आहे. अण्णा शिवाजीचे अवतार आहेत हा भ्रम पसरविल्या नंतर मराठा समाज हिंदुत्ववादी होण्याची शक्यता वाढते. आणि मराठा समाज हिंदुत्ववादी होणे म्हणजे ब्राह्मणांचे वर्चस्व मान्य करणे आहे. म्हणूनच अण्णा ब्राह्मण प्रिय होत आहेत आणि ते गो ब्राह्मण प्रतिपालक आहेत असा गोड गैरसमज ब्राह्मणांनी करून घेतला आहे. पण आता शिवाजी महाराजांवर संसदीय लोकशाही आणि म. गांधीचे विचार याचा परिणाम होवून त्यांनी त्या काळात तसे वर्तन केले असते असा विचार हे बालबुद्धीचे लक्षण आहे. याचा अर्थ शिवाजी महाराजांनी संसदेमध्ये शाहिस्तेखान व अफजल खान यांच्या विरोधात अगदी जन लोकपाल बिलाच्या शैलीत कायदा संमत केला असे म्हनाण्याचेही लोक धाडस करतील. त्याचप्रमाणे म. गांधी तालावर घेवून, घोड्यावर बसून ब्रिटीश राज्यकर्ते अंधारात, गाढ निद्रेत असतात गांधी सपासप वार करीत आहेत. आणि ब्रिटीश जागे होण्याच्या आधी निघून जात आहेत असेही संघवाले उद्या सांगू शकतील. त्यांच्या व अण्णांच्या दुर्दैवाने अनंत लोक बाल बुद्धीचे नाहीत म्हणूनच म्हणायचे आहे कि, भारत महान देश आहे! 

Tuesday, 29 November 2011

व्यापारी विरुद्ध भारत देश :


व्यापारी मनोवृत्ती शेकडो वर्षात तयार झालेली आहे. मनुस्मृतीने चातुर्वर्ण्य सांगितल्यामुळे व्यापार्यांच्या देशभरच्या नेट्वर्किंग ला पारंपारिक वर्णीय आणि वर्गीय मनोवृत्तीचा पाया आहे. चातुर्वर्ण्य व्यवस्थेत व्यापार्यांनी जनतेबरोबर समाजात कसे वागायचे या विषयी जन्म - बारसे, मरणोत्तर विधी या सर्व गोष्टींचे संहितीकरण केले आहे. उदा. वैश्याच्या घरी मुल जन्माला आले तर बाराव्या दिवशी त्याचे बारसे करताना त्याचे नाव काय ठेवावे, याविषयी अखिल भारतीय नियम तयार केलेले आहेत. या नियमांचे शेकडो वर्षांपासून चालू आहे. उदा. बारसे करताना वैश्य मुलाचे नाव हिरे, माणिक, रूपे, लक्ष्मी, संपत्ती या गोष्टींशी संबंधित असावे. म्हणजे त्या मुलाला कुणीही हाक मारली तरी त्याला आपल्या जीवन कार्याची व मिशन चे स्मरण व्हावे हि कल्पना होती. म्हणून आजही हिराचंद , माणिकचंद, लक्ष्मीकांत, रुपचंद, हिरालाल अशी नावे असतात. व्यापारी मुलाला असे वाटते कि, देवाने आपला जन्मच मुली लोकांच्या खिशातील पैसे आपल्या खिशात येतील यासाठी घातलेला आहे. याउलट ज्यांच्या कडून शोशानाद्वारे पैसे कमवायचे असतात त्या शुद्रांची नावे, त्यात काहीतरी न्यून आहे अशी असतात. उदा. केरू, कचरू, दगडू, धोंडू, बारकू, लहानू वगैरे . विशेष म्हणजे गरिबांच्या नावात 'दास' हा शब्द हमखास येतो. दास याचा अर्थ गुलाम असा होतो. व्यक्तीला लोक हाक मारताना दरवेळी त्या व्यक्तीची मानसिक धारणा आपल्या नावानुरूप पक्की होत जाते. 

भारतीय अर्थव्यवस्थेतील एकूण भांडवलापैकी ८० टक्के भांडवल मारवाडी लोकांच्या नियंत्रणात आहे. कोणत्या जाती बद्दल कधीच बोलू नये, पण एक समूह वर्तन नावाची गोष्ट असते. जागतिकी करणानंतर आंतरराष्ट्रीय भांडवलशाहीचा सर्व देशांमध्ये संचार होऊ लागला आहे. त्यामुळे स्थानिक व्यापारी संस्कृती व त्या त्या देशाबाहेरील संस्कृती याचा टकराव चालू आहे. तसाच भारतामध्येही मारवाडी संस्कृती आणि ज्युईश संस्कृती यांचा आपल्या अर्थव्यवस्थेत टकराव चालू आहे. त्याचेच पडसाद भारतीय संसदेत उमटत आहेत. वालमार्ट हि आंतरराष्ट्रीय रिटेल व्यापार करणारी कंपनी आहे. त्यांची शिस्त, प्रशिक्षण, सेवा तत्परता, चोख व्यवहार हि भारतीय व्यापार्यांपेक्षा कितीतरी अधिक चांगली आहे. आपल्या व्यापार्यांना जनतेला लुटायची सवय झाली आहे. सेवा देण्याची बिलकुल इच्च्या नाही, त्यांना फक्त नफा दिसतो. वाल मार्ट कंपनीचा राक्षस भारतात आला कि भारतीय व्यापार्यांना एकतर सुधारावे लागेल किंवा संपावे लागेल. व्यापारी वर्ग राहील, पण त्यांच्या मधील अप्प्रवृत्तींचे समूळ उच्चाटन होईल. व्यापारी वाल मार्ट ला जो विरोध करतात तो स्वार्थामुळे करीत आहेत, त्यामागे देश हिताचा विचार नाही.

भारतीय व्यापारी आमने सामने लढाई करीत नसतात. कोणालातरी पुढे करून ते मागे राहून डावपेच आखत राहतात. केंद्र सरकारने परदेशी कंपन्यांना रिटेल व्यापार खुला केल्यामुळे आपले व्यापारी खवळले आहेत. आता ते नक्कीच पुन्हा आण्णाला उपोषणाला बसवतील. अण्णा हजारे यांची दोरी सध्या व्यापारी वर्गाच्या हातात आहे. अण्णांच्या उपोषणाला मागच्या उपोशानापेक्षा ते अधिक पैसा पणाला लावतील. अण्णा उपोषणाने दमत नाहीत. आणि स्वार्थासाठी व्यापारी हात आखडता घेणार नाहीत, म्हणून घराघरामध्ये अण्णा आणि त्यांचा उपवास आक्रमण करणार हे नक्की. 

अरविंद केजरीवाल हे व्यापारी वर्गातर्फे नेमलेले सेनापती आहेत. अर्थात व्यापारी वर्गाचे सेनापती हे दलाल असतात. संसदेला वाकविण्याचा प्रयत्न भाजपला पुढे करून व्यापारी वर्ग करतोय असे दिसते. एक तर भांडवलशाही अर्थव्यवस्थेला कट्टर विरोध करून समाजवादी अर्थव्यवस्था मान्य करावी. एकदा जागतिकीकरणाच्या नावाखाली भांडवलशाही मान्य केल्यानंतर तांत्रिक दृष्ट्या अधिक प्रगत, अधिक सेवातत्पर व कार्यक्षम भांडवलशाही देशी व्यापारी भांडवलशाही पेक्षा  वरचढ असते. दिक्षित, बाबा रामदेव, स्वदेशी जागरण मंच याच मनोवृत्तीचे आहेत. हिंदुत्ववाद नावाचे तत्वज्ञान देखील देशी भांडवलशाही आपत्य आहे, या उलट कार्पोरेट भांडवलशाही शोषक असली तरी जाती धर्म निरपेक्ष असते. 

व्यापारी मनोवृत्ती शेकडो वर्षात तयार झालेली आहे. मनुस्मृतीने चातुर्वर्ण्य सांगितल्यामुळे व्यापार्यांच्या देशभरच्या नेट्वर्किंग ला पारंपारिक वर्णीय आणि वर्गीय मनोवृत्तीचा पाया आहे. चातुर्वर्ण्य व्यवस्थेत व्यापार्यांनी जनतेबरोबर समाजात कसे वागायचे या विषयी जन्म - बारसे, मरणोत्तर विधी या सर्व गोष्टींचे संहितीकरण केले आहे. उदा. वैश्याच्या घरी मुल जन्माला आले तर बाराव्या दिवशी त्याचे बारसे करताना त्याचे नाव काय ठेवावे, याविषयी अखिल भारतीय नियम तयार केलेले आहेत. या नियमांचे शेकडो वर्षांपासून चालू आहे. उदा. बारसे करताना वैश्य मुलाचे नाव हिरे, माणिक, रूपे, लक्ष्मी, संपत्ती या गोष्टींशी संबंधित असावे. म्हणजे त्या मुलाला कुणीही हाक मारली तरी त्याला आपल्या जीवन कार्याची व मिशन चे स्मरण व्हावे हि कल्पना होती. म्हणून आजही हिराचंद , माणिकचंद, लक्ष्मीकांत, रुपचंद, हिरालाल अशी नावे असतात. व्यापारी मुलाला असे वाटते कि, देवाने आपला जन्मच मुली लोकांच्या खिशातील पैसे आपल्या खिशात येतील यासाठी घातलेला आहे. याउलट ज्यांच्या कडून शोशानाद्वारे पैसे कमवायचे असतात त्या शुद्रांची नावे, त्यात काहीतरी न्यून आहे अशी असतात. उदा. केरू, कचरू, दगडू, धोंडू, बारकू, लहानू वगैरे . विशेष म्हणजे गरिबांच्या नावात 'दास' हा शब्द हमखास येतो. दास याचा अर्थ गुलाम असा होतो. व्यक्तीला लोक हाक मारताना दरवेळी त्या व्यक्तीची मानसिक धारणा आपल्या नावानुरूप पक्की होत जाते. 

भारतीय अर्थव्यवस्थेतील एकूण भांडवलापैकी ८० टक्के भांडवल मारवाडी लोकांच्या नियंत्रणात आहे. कोणत्या जाती बद्दल कधीच बोलू नये, पण एक समूह वर्तन नावाची गोष्ट असते. जागतिकी करणानंतर आंतरराष्ट्रीय भांडवलशाहीचा सर्व देशांमध्ये संचार होऊ लागला आहे. त्यामुळे स्थानिक व्यापारी संस्कृती व त्या त्या देशाबाहेरील संस्कृती याचा टकराव चालू आहे. तसाच भारतामध्येही मारवाडी संस्कृती आणि ज्युईश संस्कृती यांचा आपल्या अर्थव्यवस्थेत टकराव चालू आहे. त्याचेच पडसाद भारतीय संसदेत उमटत आहेत. वालमार्ट हि आंतरराष्ट्रीय रिटेल व्यापार करणारी कंपनी आहे. त्यांची शिस्त, प्रशिक्षण, सेवा तत्परता, चोख व्यवहार हि भारतीय व्यापार्यांपेक्षा कितीतरी अधिक चांगली आहे. आपल्या व्यापार्यांना जनतेला लुटायची सवय झाली आहे. सेवा देण्याची बिलकुल इच्च्या नाही, त्यांना फक्त नफा दिसतो. वाल मार्ट कंपनीचा राक्षस भारतात आला कि भारतीय व्यापार्यांना एकतर सुधारावे लागेल किंवा संपावे लागेल. व्यापारी वर्ग राहील, पण त्यांच्या मधील अप्प्रवृत्तींचे समूळ उच्चाटन होईल. व्यापारी वाल मार्ट ला जो विरोध करतात तो स्वार्थामुळे करीत आहेत, त्यामागे देश हिताचा विचार नाही.

भारतीय व्यापारी आमने सामने लढाई करीत नसतात. कोणालातरी पुढे करून ते मागे राहून डावपेच आखत राहतात. केंद्र सरकारने परदेशी कंपन्यांना रिटेल व्यापार खुला केल्यामुळे आपले व्यापारी खवळले आहेत. आता ते नक्कीच पुन्हा आण्णाला उपोषणाला बसवतील. अण्णा हजारे यांची दोरी सध्या व्यापारी वर्गाच्या हातात आहे. अण्णांच्या उपोषणाला मागच्या उपोशानापेक्षा ते अधिक पैसा पणाला लावतील. अण्णा उपोषणाने दमत नाहीत. आणि स्वार्थासाठी व्यापारी हात आखडता घेणार नाहीत, म्हणून घराघरामध्ये अण्णा आणि त्यांचा उपवास आक्रमण करणार हे नक्की. 

अरविंद केजरीवाल हे व्यापारी वर्गातर्फे नेमलेले सेनापती आहेत. अर्थात व्यापारी वर्गाचे सेनापती हे दलाल असतात. संसदेला वाकविण्याचा प्रयत्न भाजपला पुढे करून व्यापारी वर्ग करतोय असे दिसते. एक तर भांडवलशाही अर्थव्यवस्थेला कट्टर विरोध करून समाजवादी अर्थव्यवस्था मान्य करावी. एकदा जागतिकीकरणाच्या नावाखाली भांडवलशाही मान्य केल्यानंतर तांत्रिक दृष्ट्या अधिक प्रगत, अधिक सेवातत्पर व कार्यक्षम भांडवलशाही देशी व्यापारी भांडवलशाही पेक्षा  वरचढ असते. दिक्षित, बाबा रामदेव, स्वदेशी जागरण मंच याच मनोवृत्तीचे आहेत. हिंदुत्ववाद नावाचे तत्वज्ञान देखील देशी भांडवलशाही आपत्य आहे, या उलट कार्पोरेट भांडवलशाही शोषक असली तरी जाती धर्म निरपेक्ष असते. 

Thursday, 24 November 2011

शरद पवारांवरील हल्ला: समाजाचे नैतिक अध:पतन होत आहे काय?


शरद पवार यांना हरविंदर सिंग नावाच्या तरुणाने बेसावध अवस्थेत गाठून मारहाण केली. एकदा लोकशाही प्रणालीचा स्वीकार केला कि किमान सभ्यपणा अपेक्षित आहे. हा प्रकार असभ्य व रानटी आहे. शरद पवार त्यावेळी सावध असते तर त्या तरुणाने हल्ला करण्याचे धाडस केले नसते. म्हणून हा भ्याड हल्ला आहे. याच तरुणाने सुखराम यांच्यावरही हल्ला केला होता. मानसशास्त्राच्या दृष्टीने सामाजिक घटनांची अशी वैयक्तिक प्रतिक्रिया संभवत नाही. कदाचित या माणसाच्या मागे काही षडयंत्र रचणारी माणसे असू शकतात. मी प्रकारचा तीव्र निषेध करतो. कालच प्रसार माध्यमांच्या वाहिन्यांवर बोलताना मी म्हणालो होतो कि, 'दारू सोडण्यासाठी बदडून काढणे आणि पुन्हा नाकावर टिच्चून सांगणे कि ३० वर्षापूर्वी मी ज्यांना बदडले ते आज माझे उपकार मानतात. अन्यथा माझ्या आयुष्याचे वाट्टोळे झाले असते असे ते मला सांगतात' हे अण्णा हजारे यांनी सांगणे गैर आहे. परत अण्णा असे म्हणतात कि, 'मी मातृभावानेने लोकांना बदडत होतो.' अशी भूमिका असणार्यांना प्रतीगांधी हि मान्यता मिळावी हे देशाचे दुर्दैव आहे. हेच अण्णा हजारे शरद पवार यांच्यावर झालेल्या हल्ल्यावर प्रतिक्रिया देतांना फारच कुत्सित बोलले. ते असे म्हणाले कि, 'एकाच थप्पड मारली का?' म्हणजे अधिक थपडा मारायला पाहिजे होत्या अशी त्यांची अपेक्षा होती असे दिसते. 

काल मी अंदाज व्यक्त केला होता कि, जे दारूचे व्यसन सोडण्यासाठी मद्य प्रश्न करणाऱ्यांना बदडून काढण्याचा विचार मांडतात त्यांच्या मनात भ्रष्टाचारी माणसांना बदडून काढावे असाही विचार मूळ धरू लागेल. मग बदडून काढण्याची लाट येईल. मग हुकुमशाही व गुंड प्रवृत्तीचे म्हणू लागतील कि "तो अमुक आमुक दारुड्या होता किंवा भ्रष्टाचारी होता म्हणून आम्ही त्यांना बदडून काढले" हि भूमिका मुळातच विकृत आहे. 

शरद पवार हे माझे ५१ -५२ वर्षापासुनचे मित्र आहेत. त्यामुळे राजकीय घटनेपेक्षा आपल्या मित्राला अश्या प्रसंगाला तोंड द्यावे लागले याचे वाईट वाटले. विशेषता त्यांच्या आजाराच्या जागेवर आघात करण्यात आला. हे तर फारच गंभीर आहे. आम्ही राजकारणात एकमेकांच्या विरोधी भूमिका घेत असलो तरी आमच्या वैयक्तिक आपुलकी मध्ये अंतर पडलेले नाही. ७  वर्षांपूर्वी माझ्या घरावर, मी घरी नसताना बुरखाधारी सशत्र तरुणांनी जबरदस्तीने घरातल्या फर्निचर ची मोडतोड केली. माझ्या मुलाच्या शरीराला चाकू लावून हि राडेबाजी त्यांनी केली होती. त्या प्रसंगानंतर शरद पवारांचा फोन आला होता. मुख्यमंत्री सुशीलकुमार आणि छगन भुजबळ भेट द्यायला आहे होते. दीड वर्ष महाराष्ट्र सरकार तर्फे दोन सशत्र पोलिसांचे संरक्षण देण्यात आले होते. माझ्यासारख्या लहान माणसाच्या घरावर राजकीय भूमिकेखातर हल्ले होतात आणि शासन संरक्षणही देते. शरद पवार हे माझ्या तुलनेने महान राजकीय व्यक्तिमत्व आहे. म्हणून हा प्रकार फारच गंभीर वाटतो. कुणीतरी, कोणालातरी सार्वजनिक जीवनातून बाहेर फेकण्यासाठी षडयंत्र रचत आहे असा भास होतो. 

१९७८ साली शरद पवार पुलोद आघाडीच्या वतीने मुख्यमंत्री झाले. त्यावेळी मी जनता पक्षाचा आमदार होतो. आमचे राजकीय मेतकुट जमले होते. शरद पवारांनी कोन्ग्रेस व वसंत दादांशी गद्दारी केल्याचा राग इंदिरा कोन्ग्रेस च्या लोकांना आला होतो. कोन्ग्रेस चे भंडारा जिल्ह्यातील एक आमदार सुभाष कारेमोरे यांनी विधान सभेचे कामकाज चालू असताना 'गद्दार.. गद्दार ..' अशा घोषणा देवून शरद पवारांना चप्पल फेकून मारली होती. त्या प्रसंगाचा आम्ही सर्वांनी निषेध केला होता. मला वैयक्तिक दुख: झाले होते. त्या प्रसंगात शरद पवार त्यांची मनशांती ढळलेली नाही असे दाखवत होते. तथापि वरून तसे दाखवत असले तरी त्यांना अंतकरणात जखम झालेली होती. सार्वजनिक जीवनात वावरताना अशा गोष्टींना सामोरे जावे लागले कि, साहजिकच कोणाच्याही मनात विचार येतो कि आपण समाजकार्य का करावे? आपण एका व्यक्तीला नकोसे झाले आहोत कि संपूर्ण समाजाला नकोसे झालो आहोत असा मनात संभ्रम निर्माण होतो. त्यावेळी शरद पवार यांचे वय ३८ वर्षांचे होते. आज ते ७२ वर्षाचे आहे. भारतीय संस्कृतीत वयोजेष्ठतेला अपार महत्व आहे. मग सुखराम यांच्या सारख्या ८० वर्षाच्या नेत्याला मारहाण का झाली? समाजाची संस्कृती अवनत होत चालली आहे काय? असे अनंत प्रश्नाचे भोवरे मनात तयार होतात. कदाचित भविष्यकाळात जेष्ठ पुढार्यांना मारहाण करून नाउमेद व निरुत्साही करणे अशा प्रकारची लाट येण्याची शक्यता आहे. म. गांधी यांच्या सारख्या ७९ वर्षाच्या वृद्ध माणसाला गोळ्या घालण्यात फार मोठे शोर्य होते असे मानणारे नथुराम वादी मंडळी अजूनही समाजात आहेत. सुखराम यांना ज्यावेळी तरुणाने मारले त्यावेळी येवढा निषेध झाला नाही. म्हणून त्याने पुन्हा शरद पवारांना मारून प्रसिद्धी मिळवली. या प्रकारची चटक विविध पक्षातील तरुणांना नक्की लागेल. तुरुनांच्या वयोगटाला वाह्यात नेते प्रियच असतात. असेच एक वाह्यात नेते राज ठाकरे म्हणाले कि, 'शरद पवारांना कशाला मारले' शरद पवार मराठी आहेत म्हणून राज ठाकरेंना आदरणीय वाटतात. ते पुढे म्हणाले कि. 'पंतप्रधान मनमोहन सिंग यांनाच मारायला हवे होते.' इंदिरा कोन्ग्रेस चे लोक उद्या राज ठाकरे यांना मारण्यासाठी बक्षीस लावतील. हा खेळ चालू करून या देशाचे वाट्टोळे करण्यासाठी सर्वांनी चंग बांधलेला दिसतो. 

राष्ट्रवादी कोन्ग्रेस या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राडेबाजीचे बजीचे नाटक सुरु केले आहे. कारण सध्या महापालिकेच्या निवडणुकीच्या तिकिटाच्या मागणीचा मोसम सुरु आहे. साहेबांवरील हल्ल्यामुळे त्यांना झळकून घेण्याची, निष्ठेचे प्रदर्शन करण्याची ऐतीच नामी संधी प्राप्त झाली आहे. आर आर पाटील यांना तर मोठ्या व छोट्या या दोन्ही साहेबाना निष्टा दाखविण्यासाठी पोलिसांना निष्क्रिय राहण्याचा आदेश दिला आहे असे दिसते. नेमका असाच आदेश नरेंद्र मोदी यांनी गुजरात दंगली मध्ये दिला होता "... तीन दिवस निष्क्रिय राहा..!' तसाच हा प्रकार आहे. पोलिसांची निष्क्रियता पाहून अनेक भ्याड लोकांना शौर्य दाखविण्याची उबळ आलेली दिसली. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कोणाचा निषेध करणार कोणावर दगड फेकणार आणि कोणाच्या गोष्टी जाळणार. दिल्ली मध्ये केंद्र सरकार मध्ये आणि महाराष्ट्रातही ते सत्तेत आहेत. रस्ता रोको हा प्रकार शासनाच्या विरोधासाठी करतात. बस जळतात ते हि शासनाच्या निषेधासाठी. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना फक्त उपोषण करून सुताकामध्ये राहण्याचा नैतिक अधिकार आहे. रस्त्यावर येवून जनतेला त्रास देण्याचा अधिकार नाही. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जे नुकसान करतील त्याची भरपाई त्यांनी दिली पाहिजे. ज्यांनी स्वतंत्र लढ्यात भाग घेतला त्यांना स्वातंत्र्यानंतर मंत्री पदे मिळाली. जय प्रकाश नारायण यांच्या आणीबाणी च्या आंदोलनात जे लोक कारावासात गेले त्यांनाच पक्षाने तिकिटे दिली. तसे राष्ट्रवादी करणार आहे काय..? शरद पवारांना झालेल्या मारहाणीचा निषेध म्हणजे स्वातंत्र्य आंदोलन किंवा जे पी यांची चळवळ नाही. 

पुन्हा एकदा शरद पवार यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा मी निषेध व संताप व्यक्त करतो!

Wednesday, 16 November 2011

सामर्थ्य आहे चळवळीचे.....



उसाच्या भाव वाढीचे आंदोलन 

राजू शेट्टी यांनी बारामती हे मुख्य केंद्र करून सहकारी साखर कारखान्यांकडून उसाचे भाव वाढून मिळावेत यासाठी आंदोलन केले. याला माझा व युक्रांद चा पाठींबा होता. मी ११ नोव्हेंबर रोजी बरोबर दुपारी १२ वाजता बारामतीला पोहचलो. ज्या काही चार गोष्टी सांगाव्यात असे वाटत होत्या त्या राजू शेट्टी यांना सांगितल्या. तीन वाजता तिथून परत निघालो. संध्याकाळी सरकारने वाढीव दर जाहीर केले आणि राजू शेट्टी यांच्या आंदोलनाची यशस्वी सांगता झाली. सर्व शेतकरी व त्यांचे नेते राजू शेट्टी यांचे अभिनंदन!

अण्णा हजारे व राजू शेट्टी यांच्या आंदोलनाचे जवळून निरीक्षण करताना व आकलन करताना काही गोष्टी माझ्या लक्षात आल्या. चळवळ, जन आंदोलन, सत्याग्रही जन आंदोलन, राडेबाजी आंदोलन या सर्व गोष्टींच्या संकल्पना परस्परात मिसळून त्या शब्दांचे मूळ अर्थ बदलले आहेत. विशेषता अण्णा हजारे, केजरीवाल, किरण बेदी यांच्या वेगवेगळ्या वेळी प्रसिद्ध झालेल्या उक्तींमुळे आंदोलन, जन आंदोलन व सत्याग्रह या मूळ शब्दांचे अर्थ पार बदलून गेले आहे. परंतु या प्रत्येक गोष्टीचे वेगळेपण काय ते तरुणांनी जाणून घेणे आवश्यक आहे.

राजू शेट्टी यांचे आंदोलन हे एका विशिष्ट वर्गाचे आर्थिक आंदोलन होते; पण ते जन आंदोलन नव्हते. जन आंदोलनाचे हे विशेष असते कि त्यात समाजातील सर्व वर्ग, जाती व विविध धर्माचे अनुयायी सामील असतात, थोडक्यात जन आंदोलन बहुआयामी असते. ते राष्ट्र बांधणीला पुष्टी देणारे असते. हे आंदोलन शेतकरी वर्गाचे प्रस्थापित सत्ताधारी वर्गाच्या विरुद्ध वर्ग संघर्ष या स्वरूपातले होते. त्याचे युक्रांद स्वागत करते. 

त्याची कारणे पुढील प्रमाणे:
०१. हे आंदोलन पूर्णपणे अहिंसक होते. 
०२. राजू शेट्टी यांचे नेतृत्व 
०३. शेतकऱ्यांची एकजूट 

या आंदोलनाने ग्रामीण भाग ढवळून निघाला. ग्रामीण भागात या विचार मंथनाची गरज आहे. ग्रामीण भागातून आलेले पुढारीच शेतकऱ्यांचे शोषण करतात, ते अधिक ठसठसीतपणे कळले त्यातच देशाचे हित सामावलेले आहे. प्रस्थापित नेते नव भांडवलशाहीचे दलाल असल्याने 'आपण शेतकऱ्यांची मुले आहोत' हेच ते विसरून जातात. त्यांना भांडवलदारांच्या दलालीसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी लुटायला आवडते. भांडवलदारांना शेती नकोय, शेतकरी नको आहे. त्यांना फक्त जमीन दिसते. शेतकऱ्यांच्या मालाला जेन्वा योग्य भाव मिळतील तेन्वाच शेती टिकेल. जर योग्य भाव मिळाला नाही तर शेतकरी शेती करणार नाही, शेती टिकणार नाही, अन्नाकरिता भारत परावलम्बी होइल.

भावी काळात दोन राष्ट्रांच्या संघर्षात शाशत्रांच्या वापरा ऐवजी भुके मारण्याचे शास्त्र वापरले जाईल. भारताला महासत्ता होण्याचे स्वप्न पडले आहे. परंतु देश जर स्वत: च्या जनतेसाठी पुरेसे अन्न तयार करू शकला नाही तर त्याला हे स्वप्न पाहण्याचा अधिकार नाही. म्हणून जे जे शेती व शेतकरी यांना समृद्ध करील त्याला युक्रांचा पाठींबा राहील. 

राजू शेट्टी या नेत्याचा त्याग, साधेपणा व प्रामाणिकपणा पाहून त्याच्या नेतृत्वाखाली सर्व शेतकरी एकत्र आले. राजू कुशल संघटक आहे. त्यामुळे तो त्याच्या क्षेत्रातून बाहेर पडला आणि शरद पवारांच्या गुहेत शिरून आह्वान दिले. ज्याला आपल्या क्षेत्रामध्ये सघन काम करता करता विस्तारित होता येते त्या नेत्याचा भविष्यकाळ उज्वल असतो. बारामतीत येवून ठिय्या मांडून बसण्याची त्याची खेळी राजकीय दृष्ट्या अत्यंत प्रभावी होती. राजूने उपवास केला नसते तरी चालले असते. त्याच्या उपवासाने आंदोलनाला विशेष धार आली असे म्हणता येणार नाही. गरज नसताना उपोषण करण्याचे कारण अण्णा हजारे यांचा परिणाम असे दिसते. परंतु हा प्रकार रुजला तर मराठीतील एक म्हण बदलावी लागेल. आज पर्यंत म्हटले जाई कि, 'सामर्थ्य आहे चळवळीचे! जो जो करील तयाचे !' परंतु आता लोक म्हणतील कि. 'सामर्थ्य आहे उपवासाचे! जो जो उपाशी राहील तयाचे!'  सामुदाईक पुरुषार्थ नामक संकल्पनेला काजळी आणणारे हे सूत्र आहे.

अण्णा हजारे यांच्या आंदोलनात सारे काही व्यक्ती केंद्रित आहे. टीम - अण्णा हा शब्द केवळ भ्रम मूलक आहे. ज्या प्रमाणे कडू साखर अस्तित्वात नसते तशी काल टीम  अण्णा नव्हती - आज नसणार आणि उद्याही नसणार! अण्णा, अण्णा आहेत. अण्णांची टीम असा प्रकार अस्तित्वात असूच शकत नाही. अण्णा आता ५० लोकांची टीम करणार आहेत. त्या नंतर सारे काही बैजवार होणार असा प्रचार चालू आहे. हे पन्नास लोक कुठून येणार ? कोण निवडणार ? त्यासाठी अण्णांनी अर्ज मागविले आहेत. उद्या अण्णांकडून ज्ञान मिळाल्यामुळे भारतीय क्रांतीसाठी अर्ज मागविण्याचा विचार करीत आहोत. अडचण एकच आहे. रामलीला आंदोलनाला २५० कोटी खर्च आला असे म्हणतात तर क्रांतीसाठी आम्हाला निदान २५ हजार कोटींचा प्रायोजक मिळवावा लागेल. भांडवलदारांच्या मदतीने समाजवादी क्रांती करण्याचा मानस कसा पूर्ण करता येईल याचा अभ्यास करण्यासाठी युक्रांदची एक टीम राळेगणला रवाना झाली आहे.